शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शरीरापेक्षा मनावरील घाव महिलांना असह्य करतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 04:14 IST

समाजात महिलांवरील अत्याचार ही समाजापुढील मोठी समस्या झाली आहे.

अंबरनाथ : समाजात महिलांवरील अत्याचार ही समाजापुढील मोठी समस्या झाली आहे. महिलांना समान हक्क असले, तरी समाजातील अपप्रवृत्ती आजही महिलांवर अन्याय आणि अत्याचार करत आहेत. कौटुंबिक वादातूनही महिलांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. शरीरापेक्षा मनावरील घाव महिलांना असह्य करतात, असे मत अभिनेत्री अलका कुबल यांनी व्यक्त केले.अंबरनाथ नगरपालिकेच्या महिला बालकल्याण आणि तालुका विधी सहायक समितीच्या पुढाकाराने महिला अत्याचार रोखण्यासाठी ‘महिला सक्षमीकरण’ या विषयावर चर्चासत्र झाले. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून कुबल, सहायक पोलीस आयुक्त सुनील पाटील, नगराध्यक्षा मनीषा वाळेकर, सभापती रेश्मा काळे आणि पालिकेच्या विधी सल्लागार अ‍ॅड. साधना निंबाळकर उपस्थित होते. अंबरनाथ रोटरी क्लबच्या खुल्या सभागृहात बुधवारी हा कार्यक्रम झाला.कुबल यांनी चित्रपटांतील भूमिका आणि वास्तवातील भूमिका यात काही फरक जाणवत नाहीत, असे सांगितले. अनेक चित्रपटांत महिलांवरील अत्याचारांच्या भूमिका आपण केल्या आहेत. समाजातही महिलांवर अन्याय होतो. त्यामुळे आता समाजाची प्रवृत्ती बदलण्याची गरज आहे. महिला सर्व क्षेत्रांत पुढे असल्या, तरी आजही मुलीच्या जन्माचे हवे त्या मानाने स्वागत केले जात नाही. मुलीचा जन्म झाल्यावर मुलगा हवा होता, ही प्रतिक्रिया स्वत: महिलाच देतात. महिलाच जर मुलीच्या जन्माचा सन्मान करत नसतील, तर मग समाज सुधारण्याची इच्छा कुणाकडे व्यक्त करावी, असा प्रश्न पडतो. मुलगा आणि मुलीमधील भेद कमी झाला, तर समाजात काही प्रमाणात बदल घडतील. आज अनेक वृद्ध आईवडील वृद्धाश्रमात आपले जीवन जगत आहे. ती परिस्थिती पाहिल्यावर असे वाटते की, वंशाच्या दिव्यापेक्षा प्रकाश देणारी पणतीच बरी, असे त्यांनी सांगितले.कुटुंबव्यवस्था सांभाळण्यासाठी घरातील महिलांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडणे गरजेचे आहे, असे नगराध्यक्षा वाळेकर यांनी सांगितले. अनेक वाद सामंजस्याने घेतल्यास ते पोलीस ठाण्यापर्यंत येणारही नाहीत. घरातल्या घरातही वाद मिटवणे शक्य आहे. घरात वाद मिटत नसतील, तर तालुका विधी सहायक समितीच्या पीव्हीएल सदस्यांच्या सहकार्याने हे वाद मिटवणे शक्य आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.पालिकेच्या विधी सल्लागार अ‍ॅड. साधना निंबाळकर यांनी महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये होणारी वाढ ही सामाजिक समस्या झाली आहे, असे सांगितले. कौटुंबिक वादातून होणारे अत्याचार असो वा समाजात वावरत असताना महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना, या कमी करण्यासाठी कायद्यात अनेक दुरुस्त्या केल्या आहेत.या कार्यक्रमाला आमदार डॉ. बालाजी किणीकर, सभापती रेश्मा काळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशिनाथ चव्हाण, स्नेहल उपासनी, गुलाब जाधव, राजेश चव्हाण, सुप्रिया देसाई, विजय पवार, निखिल वाळेकर आणि सुभाष साळुंखे आदी पदाधिकारी उपस्थित होते.>महिलांनी तक्रारीसाठी पुढे येणे गरजेचे!महिलांना कायदेविषयक आणि पोलिसांची भूमिका याची माहिती सहायक पोलीस आयुक्त सुनील पाटील यांनी दिली. महिलांच्या सुरक्षेसाठी कायद्यात अनेक बदल करण्यात आले आहेत. महिलांनी या बदललेल्या कायद्यांची माहिती घेणे गरजेचे आहे. आज कायदा हा महिलांना संरक्षण देत आहे. मात्र, या कायद्याचा गैरवापर होता कामा नये. आज महिलांकडे चुकीच्या नजरेने पाहणाºयालाही शिक्षा होऊ शकते. अत्याचारांच्या घटनांत पूर्वी सात वर्षांची शिक्षा होती. मात्र, आता त्यात बदल केले असून अत्याचार प्रकरणात २० वर्षांची शिक्षा आणि गंभीर स्वरूपाच्या अत्याचारांच्या घटनांत जन्मठेप आणि फाशीची शिक्षाही देण्याची तरतूद आहे. कायद्यात झालेले हे बदल महिलांना संरक्षण देण्यासाठीच केले आहे. महिलांनी तक्रारीसाठी पुढे येणे गरजेचे असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.