शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

शरीरापेक्षा मनावरील घाव महिलांना असह्य करतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 04:14 IST

समाजात महिलांवरील अत्याचार ही समाजापुढील मोठी समस्या झाली आहे.

अंबरनाथ : समाजात महिलांवरील अत्याचार ही समाजापुढील मोठी समस्या झाली आहे. महिलांना समान हक्क असले, तरी समाजातील अपप्रवृत्ती आजही महिलांवर अन्याय आणि अत्याचार करत आहेत. कौटुंबिक वादातूनही महिलांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. शरीरापेक्षा मनावरील घाव महिलांना असह्य करतात, असे मत अभिनेत्री अलका कुबल यांनी व्यक्त केले.अंबरनाथ नगरपालिकेच्या महिला बालकल्याण आणि तालुका विधी सहायक समितीच्या पुढाकाराने महिला अत्याचार रोखण्यासाठी ‘महिला सक्षमीकरण’ या विषयावर चर्चासत्र झाले. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून कुबल, सहायक पोलीस आयुक्त सुनील पाटील, नगराध्यक्षा मनीषा वाळेकर, सभापती रेश्मा काळे आणि पालिकेच्या विधी सल्लागार अ‍ॅड. साधना निंबाळकर उपस्थित होते. अंबरनाथ रोटरी क्लबच्या खुल्या सभागृहात बुधवारी हा कार्यक्रम झाला.कुबल यांनी चित्रपटांतील भूमिका आणि वास्तवातील भूमिका यात काही फरक जाणवत नाहीत, असे सांगितले. अनेक चित्रपटांत महिलांवरील अत्याचारांच्या भूमिका आपण केल्या आहेत. समाजातही महिलांवर अन्याय होतो. त्यामुळे आता समाजाची प्रवृत्ती बदलण्याची गरज आहे. महिला सर्व क्षेत्रांत पुढे असल्या, तरी आजही मुलीच्या जन्माचे हवे त्या मानाने स्वागत केले जात नाही. मुलीचा जन्म झाल्यावर मुलगा हवा होता, ही प्रतिक्रिया स्वत: महिलाच देतात. महिलाच जर मुलीच्या जन्माचा सन्मान करत नसतील, तर मग समाज सुधारण्याची इच्छा कुणाकडे व्यक्त करावी, असा प्रश्न पडतो. मुलगा आणि मुलीमधील भेद कमी झाला, तर समाजात काही प्रमाणात बदल घडतील. आज अनेक वृद्ध आईवडील वृद्धाश्रमात आपले जीवन जगत आहे. ती परिस्थिती पाहिल्यावर असे वाटते की, वंशाच्या दिव्यापेक्षा प्रकाश देणारी पणतीच बरी, असे त्यांनी सांगितले.कुटुंबव्यवस्था सांभाळण्यासाठी घरातील महिलांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडणे गरजेचे आहे, असे नगराध्यक्षा वाळेकर यांनी सांगितले. अनेक वाद सामंजस्याने घेतल्यास ते पोलीस ठाण्यापर्यंत येणारही नाहीत. घरातल्या घरातही वाद मिटवणे शक्य आहे. घरात वाद मिटत नसतील, तर तालुका विधी सहायक समितीच्या पीव्हीएल सदस्यांच्या सहकार्याने हे वाद मिटवणे शक्य आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.पालिकेच्या विधी सल्लागार अ‍ॅड. साधना निंबाळकर यांनी महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये होणारी वाढ ही सामाजिक समस्या झाली आहे, असे सांगितले. कौटुंबिक वादातून होणारे अत्याचार असो वा समाजात वावरत असताना महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना, या कमी करण्यासाठी कायद्यात अनेक दुरुस्त्या केल्या आहेत.या कार्यक्रमाला आमदार डॉ. बालाजी किणीकर, सभापती रेश्मा काळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशिनाथ चव्हाण, स्नेहल उपासनी, गुलाब जाधव, राजेश चव्हाण, सुप्रिया देसाई, विजय पवार, निखिल वाळेकर आणि सुभाष साळुंखे आदी पदाधिकारी उपस्थित होते.>महिलांनी तक्रारीसाठी पुढे येणे गरजेचे!महिलांना कायदेविषयक आणि पोलिसांची भूमिका याची माहिती सहायक पोलीस आयुक्त सुनील पाटील यांनी दिली. महिलांच्या सुरक्षेसाठी कायद्यात अनेक बदल करण्यात आले आहेत. महिलांनी या बदललेल्या कायद्यांची माहिती घेणे गरजेचे आहे. आज कायदा हा महिलांना संरक्षण देत आहे. मात्र, या कायद्याचा गैरवापर होता कामा नये. आज महिलांकडे चुकीच्या नजरेने पाहणाºयालाही शिक्षा होऊ शकते. अत्याचारांच्या घटनांत पूर्वी सात वर्षांची शिक्षा होती. मात्र, आता त्यात बदल केले असून अत्याचार प्रकरणात २० वर्षांची शिक्षा आणि गंभीर स्वरूपाच्या अत्याचारांच्या घटनांत जन्मठेप आणि फाशीची शिक्षाही देण्याची तरतूद आहे. कायद्यात झालेले हे बदल महिलांना संरक्षण देण्यासाठीच केले आहे. महिलांनी तक्रारीसाठी पुढे येणे गरजेचे असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.