शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

नगरपरिषद निवडणूक : अंबरनाथमधील नवमतदार राहणार वंचित; २४ मार्चला अंतिम यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 12:14 AM

आयोगाची मतदारयादी पालिकेकडे हस्तांतरित

पंकज पाटीलअंबरनाथ : ३१ जानेवारीपर्यंतची मतदारयादी गृहीत धरून त्याच यादीनुसार प्रभागाची स्वतंत्र यादी तयार करण्यात येणार आहे. या यादीसाठी आवश्यक असलेली मुख्य मतदारयादी ही निवडणूक आयोगाने पालिकेकडे हस्तांतरित केली आहे. या यादीवरून नव्या मतदारयादी तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

अंबरनाथ नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने मतदारयादी तयार करण्याचे काम सुरू केले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे देण्यात आलेली मतदारयादी ही राज्य निवडणूक आयोगाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आली आहे. या मतदारयादीत ३१ जानेवारीपर्यंत ज्या मतदारांचे नाव समाविष्ट करण्यात आले होते, त्यानुसारच यादी निश्चित करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्यामुळे ३१ जानेवारीच्या यादीनुसार राज्य निवडणूक आयोगाने मतदारयादी पालिकेकडे हस्तांतरित केली आहे.या मतदारयादीमधील बुथ क्रमांकानुसार प्रभागातील नावे निश्चित करण्यात येत आहेत. २०१५च्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाल्याने यंदा पालिकेने मोठ्या प्रमाणात दक्षता घेतली आहे. २०१५ची मतदारयादी आणि ३१ जानेवारीपर्यंत असलेली यादी यांच्यातील नावांची छाननी केल्यावर प्रत्येक प्रभागनिहाय यादी तयार करण्यात येणार आहे. २०१५च्या मतदारयादीत अनेक नावे दुसऱ्या प्रभागातील असल्याने त्यावरही काम करण्यात येत आहे, तसेच २०१५ नंतर मतदारयादीत जी नावे समाविष्ट झाली आहेत, ती नावे कोणत्या प्रभागातील आहे याचा शोध घेऊन ती नावे निश्चित केलेल्या प्रभागात समाविष्ट करण्यात येणार आहेत.

मतदारयादीची फोड आणि प्रभागनिहाय नोंदणी करण्याचे काम पालिकेने सुरू केले आहे. १३ मार्चपासून ते काम सुरू करण्यात येणार आहे. मतदारयादीमध्ये जी नावे समाविष्ट आहेत, ती नावे आपल्या प्रभागातच आहेत की नाही, याची तपासणी करण्याची संधीही मतदारांना मिळणार आहे. २४ मार्च रोजी निश्चित केलेली यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून त्यावर हरकती मागवण्यात येणार आहेत. या हरकतींवर सुनावणी घेतली जाणार आहे.३१ जानेवारी २०२० पर्यंतची मतदारयादी घेण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर मतदान नोंदणी कार्यक्रमच न झाल्याने आॅक्टोबर २०१९ ते ३१ जानेवारी २०२० पर्यंतचे एकही नाव यादीत येणार नाही. त्यातच विधानसभा निवडणुका झाल्यावर अनेक राजकीय पुढाऱ्यांनी पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात बोगस आणि बाहेरील मतदारांचा समावेश यादीत करण्याचा प्रयत्न केला आहे. आयोगाच्या आदेशानंतर बोगस नावांचा समावेश नव्याने होणार नसला तरी जे खरोखरच मतदार आहेत त्यांची नोंदणीही या यादीमध्ये होणार नाही. शहरात अवघ्या तीन महिन्यांत सात हजारांहून अधिक मतदारांची नोंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने प्रशासनही सतर्क झाले आहे. त्यातच प्रत्येक मतदाराची नोंदणी करताना त्याचे नाव इतर मतदारसंघातही तपासण्यात येत आहे, त्यामुळे नव्या नावांचा समावेश अशक्य झाल्याचे दिसत आहे.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगVotingमतदान