शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

उल्हास नदीत जाणारे सांडपाणी थांबवण्याचा पालिकेचा प्रयत्न, अमृत अभियानात 34 कोटींच्या निधीला मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2017 18:32 IST

बदलापूर: उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यात बदलापूर नगरपालिका अपयशी ठरली होती. कोट्यवधीची भुयारी गटार योजनेचे काम करून सुद्धा आजही सांडपाणी हे थेट नदीत सोडण्यात येत आहे.

बदलापूर: उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यात बदलापूर नगरपालिका अपयशी ठरली होती. कोट्यवधीची भुयारी गटार योजनेचे काम करून सुद्धा आजही सांडपाणी हे थेट नदीत सोडण्यात येत आहे. हे प्रदूषण रोखण्यासाठी अमृत योजनेतून भुयारी गटाराच्या दुस-या टप्प्याचे काम पालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे. या 34 कोटींच्या योजनेला पालिकेने मंजुरी दिली आहे.बदलापूर शहराचे सांडपाणी तीन वेगवेगळ्या ठिकाणी उल्हास नदीपात्रात सोडण्यात येते आहे. शहरात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला मात्र अद्यापही पूर्ण क्षमतेने सुरू नसलेला भुयारी गटार प्रकल्प कोटयवधींचे पैसे खर्चूनही अपूर्ण आहेत. यात 22 एमएलडी क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया केंद्रही उभारण्यात आले आहे. मात्र शहरातील भुयारी गटार वाहिन्यांना रहिवाशी सांडपाण्याच्या वाहिनी जोडल्या गेल्या नसल्याने अवघे 5 दशलक्ष लिटर्स ऐवढेच सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. जोडण्या पूर्ण न झाल्याने आजही विविध नाल्यातून उल्हास नदी पात्रात सांडपाणी जाऊन प्रदूषण होते आहे. यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कुळगाव बदलापूर नगरपालिकेला नोटीस पाठवली होती. त्यावर प्रदूषण रोखण्यासाठीच्या उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन देऊन पालिकेने वेळ मारून नेली.मात्र अद्यापही सांडपाणी नदीपात्रात सोडले जाते आहे. यावर उपाय म्हणून आता अतिरिक्त 70 कोटींच्या अमृत अभियानाच्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली होती. यात उल्हास नदीपात्रात सांडपाणी जाणा-या तीन ठिकाणी मुख्य सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडे वळवले जाणार आहे. तर त्यातल्या दोन ठिकाणी छोटे प्रक्रिया प्रकल्पही उभारले जाणार आहेत.नदीत जाणारे हे सांडपाणी रोखण्यासाठी वाहिन्या टाकल्या जाणार आहेत. मात्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून तपासणी झालेल्या या प्रकल्पासाठी 34 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत याविषयी चर्चा करण्यात आली होती. यासाठी सात ठिकाणच्या जागांचा विचार करण्यात आला असून त्या ताब्यात आल्या की कामाला सुरूवात होणार आहे. मात्र हे काम कधीर्पयत पूर्ण होणार याची निश्चिती पालिकेनेही दिलेली नाही. त्यामुळे ही योजना देखील आधीच्या योजनेप्रमाणो रखडणार का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

टॅग्स :badlapurबदलापूर