शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

रेल्वे प्रवाशांच्या मुळावर उठले महापालिकेचे सुशोभीकरण, शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 01:15 IST

Mira Bhayander News : भाईंदर रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेस ये-जा करणाऱ्या प्रवाशांची रोजची संख्या काही हजारांच्या घरात असताना महापालिकेने सत्ताधारी भाजपच्या आग्रहाखातर तब्बल आठ कोटी रुपये खर्चाचे सुशोभिकरणाचे कंत्राट देऊन काम सुरू केले.

मीरा रोड  - सर्वांसाठी लोकलची दारे  १ फेब्रुवारीपासून खुली झाल्यानंतर प्रवाशांची संख्या वाढली आहे. भाईंदर स्थानकातून पश्चिमेस बाहेर येणारा मुख्य पूल खुला केला आहे; परंतु पालिकेने केलेल्या सुशोभिकरणाच्या कामामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत असल्याने बांधकाम तोडा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.भाईंदर रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेस ये-जा करणाऱ्या प्रवाशांची रोजची संख्या काही हजारांच्या घरात असताना महापालिकेने सत्ताधारी भाजपच्या आग्रहाखातर तब्बल आठ कोटी रुपये खर्चाचे सुशोभिकरणाचे कंत्राट देऊन काम सुरू केले. मुळात येथे आधीच जागा कमी असून, सार्वजनिक व खासगी बस, रिक्षा, दुचाकी व चारचाकी वाहनांची संख्या प्रचंड आहे; परंतु प्रवाशांच्या गैरसोयीचा आणि प्रत्यक्ष स्थितीचा कोणताच सारासार विचार न करता तब्बल आठ कोटी रुपयांचे सुशोभिकरण पालिकेने सुरू करून रस्त्याचा व रेल्वेचे जिने - तिकीट घर यांचा समतोल न राखताच पाच फुटांपेक्षा जास्त उंचीचा पाया बांधला आहे. त्यामुळे रेल्वेपुलावर तसेच तिकीट खिडकीकडे ये - जा करण्यासाठी प्रवाशांचे हाल होत आहेत. वृद्ध, महिला यांना तर हे जोखमीचे झाले आहे.या कामामुळे मधल्या जिन्याकडे ये - जा करण्यासाठीचा मार्गही चिंचोळा झाला असून, तेथे फेरीवाले आणि दुचाकीचे अतिक्रमण त्रासात भर घालत आहे. या बांधकामामुळे मुख्य रस्ता अतिशय अरुंद झाला आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल हाेत आहेत. महापालिकेने चालविलेले हे सुशोभिकरण नव्हे, तर लोकांचे हाल करणारे काम आहे. नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी केली जाते, याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. हे काम बंद करायला लावले आहे; पण झालेले बांधकाम काढून नागरिकांसाठी रेल्वे परिसर मोकळा केला नाही तर अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून बडतर्फ करण्यासाठी सरकारकडे तक्रार करू.- गीता जैन, आमदार सत्ताधारी भाजपने मनमानी करून नागरिकांचा छळ चालविला आहे. भाईंदर रेल्वे स्थानकाबाहेरील हे बांधकाम हटवले नाही तर शिवसेना आंदोलन करेल.- कॅटलीन परेरा, माजी महापौर

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक