शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

मुंबईच्या अप्पर वैतरणाचे पाणी कोका-कोला कंपनीसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 04:38 IST

कारवाईची मागणी : टेंभा ग्रामपंचायत सरपंचाची तक्रार

कसारा : शहापूर तालुक्यातील धरणालगतच्या शेकडो गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई असताना, अप्पर वैतरणा धरणातून वाडा तालुक्यातील कोका-कोला कंपनीला केल्या जाणाऱ्या पाण्याच्या विक्रीवर टेंभा ग्रामपंचायतीने आक्षेप नोंदवला आहे.

अप्पर वैतरणा धरण हे मुंबई महानगरपालिकेचे आहे. येथील पाणी मध्य वैतरणा धरणात सोडून, तेथून मोडकसागरमध्ये सोडले जाते. मोडकसागरमध्ये २० पंप लावून हे पाणी वाडा तालुक्यातील गांधारे येथील बंधाऱ्यात सोडण्यात येते. गांधारे बंधाºयातून हे पाणी कोका-कोला या वाडास्थित कंपनीला व्यावसायिक हेतूने विकले जाते. वास्तविक गांधारे बंधारा हा वाडा तालुक्यातील कुडूस गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी बांधण्यात आला आहे. दुसरीकडे कुडूससह शहापूर तालुक्यातील धरणालगतच्या टेंभा, वैतरणा, अजनुप, उठावासह शेकडो गावे पाणीबाणीने त्रस्त आहेत.मोडकसागर धरण ज्या ग्रामपंचायतीमध्ये आहे, त्या ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई आहे. याप्रकरणी टेंभा ग्रामपंचायतीच्या सरपंच रेश्मा आमले यांनी मुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्याकडे तक्रार केली आहे. धरण परिसरातील गावे तहानलेली असताना व्यावसायिक वापरासाठी पाणी देणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थ अनिल घोडविंदे यांनी केली आहे.धरण क्षेत्रातील पाणी कोणत्या ना कोणत्या कारणाने वाडा तालुक्यातील गांधारे बंधाºयात सोडण्यात येते. या बंधाºयातून ते पाणी कोका-कोलाला पुरवले जाते. याप्रकरणी कारवाई व्हावी.- एकनाथ कोरे, उपसरपंच, टेंभा

टॅग्स :Damधरणthaneठाणे