शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
3
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
4
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
5
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
6
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
7
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
8
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
9
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
10
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
11
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
12
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
13
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
14
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
15
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
16
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
17
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
18
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
19
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
20
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     

मुंबईच्या अप्पर वैतरणाचे पाणी कोका-कोला कंपनीसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 04:38 IST

कारवाईची मागणी : टेंभा ग्रामपंचायत सरपंचाची तक्रार

कसारा : शहापूर तालुक्यातील धरणालगतच्या शेकडो गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई असताना, अप्पर वैतरणा धरणातून वाडा तालुक्यातील कोका-कोला कंपनीला केल्या जाणाऱ्या पाण्याच्या विक्रीवर टेंभा ग्रामपंचायतीने आक्षेप नोंदवला आहे.

अप्पर वैतरणा धरण हे मुंबई महानगरपालिकेचे आहे. येथील पाणी मध्य वैतरणा धरणात सोडून, तेथून मोडकसागरमध्ये सोडले जाते. मोडकसागरमध्ये २० पंप लावून हे पाणी वाडा तालुक्यातील गांधारे येथील बंधाऱ्यात सोडण्यात येते. गांधारे बंधाºयातून हे पाणी कोका-कोला या वाडास्थित कंपनीला व्यावसायिक हेतूने विकले जाते. वास्तविक गांधारे बंधारा हा वाडा तालुक्यातील कुडूस गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी बांधण्यात आला आहे. दुसरीकडे कुडूससह शहापूर तालुक्यातील धरणालगतच्या टेंभा, वैतरणा, अजनुप, उठावासह शेकडो गावे पाणीबाणीने त्रस्त आहेत.मोडकसागर धरण ज्या ग्रामपंचायतीमध्ये आहे, त्या ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई आहे. याप्रकरणी टेंभा ग्रामपंचायतीच्या सरपंच रेश्मा आमले यांनी मुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्याकडे तक्रार केली आहे. धरण परिसरातील गावे तहानलेली असताना व्यावसायिक वापरासाठी पाणी देणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थ अनिल घोडविंदे यांनी केली आहे.धरण क्षेत्रातील पाणी कोणत्या ना कोणत्या कारणाने वाडा तालुक्यातील गांधारे बंधाºयात सोडण्यात येते. या बंधाºयातून ते पाणी कोका-कोलाला पुरवले जाते. याप्रकरणी कारवाई व्हावी.- एकनाथ कोरे, उपसरपंच, टेंभा

टॅग्स :Damधरणthaneठाणे