शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

मुंबईकरांना मिळणार मुबलक पाणी, तानसा धरण कोणत्याही क्षणी भरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 11:34 IST

पावसाचा जोर कायम असल्याने भातसा, बारवीच्या पाणीसाठ्यातही वाढ

ठाणे-वासिंद : मुंबई, ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कायम असल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. यातील तानसा धरण लवकरच भरण्याची शक्यता आहे,  तर भातसा, बारवी, आंध्रा, मोडकसागर, मध्य वैतरणा, अपर वैतरणा आदी धरणांच्या पाणीसाठ्यातही वाढ होत आहे. 

सर्वांत मोठ्या  भातसा धरणाची सध्याची पाणी पातळी १२४.२८ मीटर असून ५२६.८० दशलक्ष घनमीटर (दलघमी) पाणी साठा आहे. या धरणात आज रोजी तब्बल ५६ टक्के पाणीसाठा झाला आहे. मोडकसागर धरणाची पाणी पातळी १५९.६९ मीटर झाली असून, या धरणात ७८.२६ टक्के पाणीसाठा झाला आहे, तर बारवी धरणाची सध्याची पाणी पातळी ६८.५२ मीटर झाली आहे. या धरणात ६८.२४ टक्के पाणीसाठा आहे. 

तानसा धरणात आज १२९.५१ (८९.२७ टक्के) दलघमी साठा तयार झाला आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जाेर कायम राहिल्यास कोणत्याही क्षणी धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सध्या या धरणाची पाणी पातळी   १२७.८१ मीटर झाली आहे. 

भातसा धरणात ५५.९१ टक्केच पाणी

शहापूर तालुक्यातील मुंबईला सर्वाधिक पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरण परिसरात हवा तसा पाऊस झालेला नाही. धरणाची भरून वाहण्याची पातळी १४२ मीटर आहे. सद्य:स्थितीत पाणीपातळी १२४.२८ म्हणजेच ५५.९१ टक्के आहे. 

गावांना सतर्कतेचा इशारा

तानसा धरण भरून वाहण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे  धरणाखालील व नदीकाठावरील गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. तानसा धरण ओसंडून वाहण्याची पातळी १२८.६३ मीटर टीएसडीहून जास्त झाली आहे. पाण्याचा विसर्ग होत असताना ग्रामस्थांनी काळजी घ्यावी. महसूल व पोलिस प्रशासनानेही दक्ष राहावे, अशा सूचना दिल्या आहेत.

टॅग्स :RainपाऊसWaterपाणी