शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
6
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
7
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
8
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
9
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
10
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
11
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
12
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
13
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
14
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
15
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
16
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
17
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

मुंबईकरांना मिळणार मुबलक पाणी, तानसा धरण कोणत्याही क्षणी भरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 11:34 IST

पावसाचा जोर कायम असल्याने भातसा, बारवीच्या पाणीसाठ्यातही वाढ

ठाणे-वासिंद : मुंबई, ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कायम असल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. यातील तानसा धरण लवकरच भरण्याची शक्यता आहे,  तर भातसा, बारवी, आंध्रा, मोडकसागर, मध्य वैतरणा, अपर वैतरणा आदी धरणांच्या पाणीसाठ्यातही वाढ होत आहे. 

सर्वांत मोठ्या  भातसा धरणाची सध्याची पाणी पातळी १२४.२८ मीटर असून ५२६.८० दशलक्ष घनमीटर (दलघमी) पाणी साठा आहे. या धरणात आज रोजी तब्बल ५६ टक्के पाणीसाठा झाला आहे. मोडकसागर धरणाची पाणी पातळी १५९.६९ मीटर झाली असून, या धरणात ७८.२६ टक्के पाणीसाठा झाला आहे, तर बारवी धरणाची सध्याची पाणी पातळी ६८.५२ मीटर झाली आहे. या धरणात ६८.२४ टक्के पाणीसाठा आहे. 

तानसा धरणात आज १२९.५१ (८९.२७ टक्के) दलघमी साठा तयार झाला आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जाेर कायम राहिल्यास कोणत्याही क्षणी धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सध्या या धरणाची पाणी पातळी   १२७.८१ मीटर झाली आहे. 

भातसा धरणात ५५.९१ टक्केच पाणी

शहापूर तालुक्यातील मुंबईला सर्वाधिक पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरण परिसरात हवा तसा पाऊस झालेला नाही. धरणाची भरून वाहण्याची पातळी १४२ मीटर आहे. सद्य:स्थितीत पाणीपातळी १२४.२८ म्हणजेच ५५.९१ टक्के आहे. 

गावांना सतर्कतेचा इशारा

तानसा धरण भरून वाहण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे  धरणाखालील व नदीकाठावरील गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. तानसा धरण ओसंडून वाहण्याची पातळी १२८.६३ मीटर टीएसडीहून जास्त झाली आहे. पाण्याचा विसर्ग होत असताना ग्रामस्थांनी काळजी घ्यावी. महसूल व पोलिस प्रशासनानेही दक्ष राहावे, अशा सूचना दिल्या आहेत.

टॅग्स :RainपाऊसWaterपाणी