शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
6
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
7
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
8
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
9
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
10
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
11
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
12
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
13
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
14
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
15
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
16
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
17
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
18
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
19
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
20
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा

Mumbai Rain : वाचवा वाचवा... माजी आमदाराने मध्यरात्री दोरीच्या सहाय्याने कुटुंबाला वाचवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 10:30 IST

Mumbai Rain : परांजपेनगर चेरपोली हायवेलगतच्या मैदानावरील एका घरात 3 लहान मुले व त्यांचे आई वडील पाण्यात घर बुडाल्यामुळे अडकून पडले होते. याबाबत माजी आमदार पांडुरंग बरोरा यांना माहिती मिळताच, त्यांनी घटनास्थळावर धाव घेतली.

ठळक मुद्देपरांजपेनगर चेरपोली हायवेलगतच्या मैदानावरील एका घरात 3 लहान मुले व त्यांचे आई वडील पाण्यात घर बुडाल्यामुळे अडकून पडले होते. याबाबत माजी आमदार पांडुरंग बरोरा यांना माहिती मिळताच, त्यांनी घटनास्थळावर धाव घेतली.

ठाणे - ठाणे जिल्ह्यात बुधवारी रात्रीही मुसळधार पाऊस सुरूच होता. मध्य रेल्वेच्या उंबरमाळी आणि कसारा स्थानकारदरम्यान, तसंच अंबरनाथ आणि वांगणी रेल्वे स्थानकादरम्यान ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं लोकल सेवा थांबवण्यात आली. तर, जिल्ह्यातील अनेक भागात पावसामुळे घराबाहेर पडणेही अवघड होऊन बसले होते. शहापूर तालुक्यातील परांजपेनगर भागात एक कुटुंब घरात अडकले होते. घराच्या चोहोबाजूंनी पाण्याने वेढल्याने ते कुटुंबा मदतीसाठी वाचवा... वाचवा... अशी साद घालत होते. त्यावेळी, शिवसेना नेते माजी आमदार पांडुरंग बोरकर यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने तेथे धाव घेतली. 

परांजपेनगर चेरपोली हायवेलगतच्या मैदानावरील एका घरात 3 लहान मुले व त्यांचे आई वडील पाण्यात घर बुडाल्यामुळे अडकून पडले होते. याबाबत माजी आमदार पांडुरंग बरोरा यांना माहिती मिळताच, त्यांनी घटनास्थळावर धाव घेतली. आपल्या काही कार्यकर्त्यांना सोबत घेऊन दोराच्या सहाय्याने त्यांनी या कुटुंबाला सुखरुपपणे बाहेर काढले. त्यामुळे, शिवसेना नेते पांडुरंग बरोरा यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक होते आहे. याबाबत स्वत: बरोरा यांनीही फेसबुक पेजवरुन घटनेची माहिती दिली आहे. रात्रीचे १२ वाजले होते, पाऊस मुसळधार पडत होता, वीजही गेली होती. एवढा मोठा पाऊस मी यापूर्वीही कधी पाहिला नव्हता. मी रहात असलेल्या परांजपेनगर येथील माझ्या घराच्या बाजूचा नाला तुडुंब भरुन वाहत होता. तर, माझ्या घराच्या पायरीलाही पाणी लागले होते. त्यामुळे बाहेर आलो तर समोर वाचवा वाचवा असा आवाज येऊ लागला. त्यावेळी, समोरच्या मोकळ्या मैदानात असलेल्या घराला पाण्याने वेढा मारला होता. समोरच्या घरातून इशारा करण्यासाठी बॅटरी मारत होते. तात्काळ पोलिस प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन यांना याबाबत कळविले. परंतु, त्या घरात पाणी वाढत असल्याने सातत्याने वाचविण्यासाठी टाहो फोडत होते. रवि मडके त्यांचे काही सहकारी आले, त्यांना सोबत घेऊन दोराच्या सहाय्याने त्या घरातील पती पत्नी व 3 लहान बालके यांना सुखरूप पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले, अशी माहिती पांडुरंग बरोरा यांनी दिली आहे. 

लोकल वाहतुकीला पावसाचा फटका 

मध्य रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार कल्याण ते कर्जत आणि कल्याण ते कसारा या दोन्ही मार्गावरील वाहतुकीला मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. कसारा परिसरात केवळ ४ तासांमध्ये १३९ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. तर दुसरीकडे उंबरमाळी रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्मपर्यंत पाणी साचल्याचं दिसून आलं आहे. याशिवाय कसारा येथेही ट्रॅकवर पाणी साचलं असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, बुधवारी रात्री सव्वादहा वाजल्यापासून इगतपुरी ते खर्डीदरम्यानची वाहतूकही थांबवण्यात आली असल्याचं रेल्वे प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. मुंबईतही मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतूककोंडी झाली होती. 

टॅग्स :thaneठाणेRainपाऊसShiv SenaशिवसेनाMLAआमदार