शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

18 गावांची कल्याण उपनगरपरिषद स्थापन करण्याच्या हालचाली सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2020 20:45 IST

नगरपरिषद स्थापन करण्यासंदर्भात हरकती सूचना मागवून त्यावर सुनावणी घ्यावी आणि त्याबाबतचा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात यावा

कल्याण:  केडीएमसीतील 27 गावांमधून वगळण्यात आलेल्या 18 गावांची कल्याण उपनगर नगरपरिषद या नावाने नगरपरिषद घटीत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असताना आता पुढील कार्यवाहीला सुरूवात झाली आहे. नगरपरिषद स्थापन करण्यासंदर्भात हरकती सूचना मागवून त्यावर सुनावणी घ्यावी आणि त्याबाबतचा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात यावा असे आदेश नगरविकास विभागाचे अवर सचिव नवनाथ वाठ यांनी ठाणो जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना दिले आहेत.27 गावांमधील 18 गावे वगळण्याबाबत आणि नऊ गावे केडीएमसीत  ठेवण्यात येत असल्याची घोषणा 14 मार्चच्या विधीमंडळ अधिवेशनात झाली होती. वगळलेल्या 18 गावांची कल्याण उपनगर परिषद असेल अशी अधिसूचना 24 जूनला काढली आहे. या वगळलेल्या गावांमध्ये घेसर, हेदुटणो, उंबार्ली, भाल, द्वारली, माणोरे, वसार, आशेळे, नांदीवलीतर्फे अंबरनाथ, आडीवली-ढोकळी, दावडी, चिंचपाडा, पिसवली, गोळीवली, माणगाव, निळजे, सोनारपाडा, कोळे या गावांचा समावेश आहे.  परंतू 27 गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेसाठी लढा देणा-या सर्वपक्षिय हकक संरक्षण संघर्ष समितीने सरकारच्या या कृतीवर तीव्र नाराजी व्यक्त करीत 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका झालीच पाहिजे असा आग्रह धरला आहे. त्यात 27 गावांच्या नगर परिषदेबाबत पुनर्विचार करा असे निवेदन मनसे आमदार प्रमोद पाटील यांनीही ठाणे जिल्हाधिकारी नार्वेकर यांना सादर केले असताना दुसरीकडे कोरोनाच्या साथीमुळे 18 गावे केडीएमसीतून वगळू नयेत अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे.दरम्यान राज्य सरकारने गावे वगळण्याच्या घेतलेल्या निर्णयानंतर 18 गावांची कल्याण उपनगर नगरपरिषद स्थापन करण्याच्या कार्यवाहीला प्रारंभ केला आहे. शुक्रवारी नगरविकास विभागाचे अवर सचिव वाठ यांनी ठाणे जिल्हाधिकारी नार्वेकर यांना पत्र पाठवून कल्याण उपनगर नगरपरिषद या नावाने नगरपरिषद स्थापन करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यासाठी लेखी हरकती व सूचनांवर सुनावणी घेण्यासाठी जिल्हाधिका-यांना सूचना करण्यात आल्या आहेत. प्राप्त हरकती आणि सूचनांवर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती काळजी घेऊन सुनावणी घ्यावी व अहवाल सरकारला सादर करण्यात यावा असेही स्पष्ट करण्यात आले आहे.