शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

18 गावांची कल्याण उपनगरपरिषद स्थापन करण्याच्या हालचाली सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2020 20:45 IST

नगरपरिषद स्थापन करण्यासंदर्भात हरकती सूचना मागवून त्यावर सुनावणी घ्यावी आणि त्याबाबतचा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात यावा

कल्याण:  केडीएमसीतील 27 गावांमधून वगळण्यात आलेल्या 18 गावांची कल्याण उपनगर नगरपरिषद या नावाने नगरपरिषद घटीत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असताना आता पुढील कार्यवाहीला सुरूवात झाली आहे. नगरपरिषद स्थापन करण्यासंदर्भात हरकती सूचना मागवून त्यावर सुनावणी घ्यावी आणि त्याबाबतचा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात यावा असे आदेश नगरविकास विभागाचे अवर सचिव नवनाथ वाठ यांनी ठाणो जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना दिले आहेत.27 गावांमधील 18 गावे वगळण्याबाबत आणि नऊ गावे केडीएमसीत  ठेवण्यात येत असल्याची घोषणा 14 मार्चच्या विधीमंडळ अधिवेशनात झाली होती. वगळलेल्या 18 गावांची कल्याण उपनगर परिषद असेल अशी अधिसूचना 24 जूनला काढली आहे. या वगळलेल्या गावांमध्ये घेसर, हेदुटणो, उंबार्ली, भाल, द्वारली, माणोरे, वसार, आशेळे, नांदीवलीतर्फे अंबरनाथ, आडीवली-ढोकळी, दावडी, चिंचपाडा, पिसवली, गोळीवली, माणगाव, निळजे, सोनारपाडा, कोळे या गावांचा समावेश आहे.  परंतू 27 गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेसाठी लढा देणा-या सर्वपक्षिय हकक संरक्षण संघर्ष समितीने सरकारच्या या कृतीवर तीव्र नाराजी व्यक्त करीत 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका झालीच पाहिजे असा आग्रह धरला आहे. त्यात 27 गावांच्या नगर परिषदेबाबत पुनर्विचार करा असे निवेदन मनसे आमदार प्रमोद पाटील यांनीही ठाणे जिल्हाधिकारी नार्वेकर यांना सादर केले असताना दुसरीकडे कोरोनाच्या साथीमुळे 18 गावे केडीएमसीतून वगळू नयेत अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे.दरम्यान राज्य सरकारने गावे वगळण्याच्या घेतलेल्या निर्णयानंतर 18 गावांची कल्याण उपनगर नगरपरिषद स्थापन करण्याच्या कार्यवाहीला प्रारंभ केला आहे. शुक्रवारी नगरविकास विभागाचे अवर सचिव वाठ यांनी ठाणे जिल्हाधिकारी नार्वेकर यांना पत्र पाठवून कल्याण उपनगर नगरपरिषद या नावाने नगरपरिषद स्थापन करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यासाठी लेखी हरकती व सूचनांवर सुनावणी घेण्यासाठी जिल्हाधिका-यांना सूचना करण्यात आल्या आहेत. प्राप्त हरकती आणि सूचनांवर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती काळजी घेऊन सुनावणी घ्यावी व अहवाल सरकारला सादर करण्यात यावा असेही स्पष्ट करण्यात आले आहे.