शहरं
Join us  
Trending Stories
1
Nagpur Rains: विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
FD पेक्षा जास्त परतावा, पण शेअर बाजाराचा धोका नको? आता 'हा' फंड देणार दुप्पट परतावा?
5
'...तर मी राजकारण सोडेन', नितीश कुमारांबाबत प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी
6
२० रुग्णालये, १३,००० कर्मचारी हे आहेत भारतातील सर्वात श्रीमंत डॉक्टर, एवढी आहे संपत्ती
7
हनुमान चालीसा बोलायचा राशिद, गर्लफ्रेंड झाली फिदा; पण तिथूनच सुरू झाला नवा कांड, युवती...
8
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
9
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
10
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
11
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
12
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
13
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
14
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
15
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
18
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
19
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
20
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट

आईच्या माराचा धाक : कल्याणचा सौरभ सापडला ठाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 02:36 IST

न सांगता मित्रांसोबत मासे पकडण्यासाठी गेलेल्या सौरभने (नाव बदलले आहे) हा प्रकार आईला समजल्यावर ती मारेल, या भीतीने घरातून पळ काढला. मात्र, आता तो ठाणे पोलिसांमुळे पुन्हा घरी परतला आहे.

ठाणे : न सांगता मित्रांसोबत मासे पकडण्यासाठी गेलेल्या सौरभने (नाव बदलले आहे) हा प्रकार आईला समजल्यावर ती मारेल, या भीतीने घरातून पळ काढला. मात्र, आता तो ठाणे पोलिसांमुळे पुन्हा घरी परतला आहे. कल्याणनजीकच्या अरवलीगावाचे नाव उच्चारताना तो ऐरोलीगाव असे करत असल्याने पोलिसांना त्याच्या घराचा पत्ता शोधण्यात अडथळा आला होता. मात्र, त्याच्यावरही मात करून दोनतीन दिवसांत त्या मायलेकाची पुनर्भेट घडवून आणण्यात पोलिसांना यश आले आहे.पितृछत्र हरपलेला सौरभ हा आई आणि मोठ्या बहिणीसह कल्याण, अरवलीगाव येथे राहतो. त्याची आई बिगारी काम करून त्या दोघा मुलांचे पालनपोषण करत आहे. ११ वर्षीय सौरभ हा इयत्ता सहावीत शिकत आहे. ३१ जुलै रोजी तो मित्रांसोबत मासे पकडण्यासाठी गेला. तेथे मासे पकडून झाले. मात्र, आपण आईला न सांगता आल्यामुळे आता घरी परत गेल्यानंतर आईचा मार खावा लागेल, अशी भीती सौरभला वाटली. त्यामुळे तो मासे तेथेच टाकून कोणालाही काही न सांगता पायी थेट कल्याण रेल्वे स्थानकात आला. तेथे फिरत असताना तो समतोल फाउंडेशन या लहान मुलांसाठी काम करणाºया संस्थेच्या पदाधिकाºयांच्या निदर्शनास आला. तेथून त्याची रवानगी ठाण्यातील संस्थेत झाली.याची माहिती ठाणे चाइल्ड प्रोटेक्शन युनिटला समजल्यावर पोलीस नाईक प्रमोद पालांडे यांनी सहायक पोलीस आयुक्त भरत शेळके, पोलीस उपनिरीक्षक ए.एस. चौरे आणि वाय.एस. सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला. चौकशीत सौरभ याने आपण टाटा पॉवर हाउस, ऐरोलीगाव येथे राहत असल्याचे सांगितले. त्यानुसार, तेथील स्थानिक पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल आहे का, याची चाचपणी केली. मात्र, तशी तक्रार नसल्याचे नवी मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले. पुन्हा, त्याची विचारपूस केल्यावर त्याने हिंदी हायस्कू ल आणि घरापासून रेल्वेस्थानक पाऊण तासावर असल्याचे सांगितले. त्यानुसार, टाटा पॉवर हाउस कुठे आहे, याचा शोध घेतल्यावर कल्याण येथे चौकशी केली. त्या वेळी त्याची ओळख पुढे आली. त्याच्या घराचा पत्ता शोधण्यात मानपाडा पोलिसांची मदत झाली. अशा प्रकारे त्या मायलेकाची पुनर्भेट झाल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली.अवघ्या चारच दिवसांत ठाणे पोलिसांच्या चाइल्ड प्रोटेक्शन युनिटने या मुलाची आईशी भेट घडवून आणली. या स्तुत्य कामगिरीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. घरातून पळून गेलेली किंवा हरवलेल्या अशा अनेक मुलांना ठाणे पोलिसांनी गेल्या काही दिवसांत आपापल्या घरी सुखरूप पोहोचवले आहे.