शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

शासन आदेशानंतर देखील बहुतांश शाळांमध्ये तक्रार पेट्या नाहीत  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2018 20:05 IST

मीरा भार्इंदर मधील बहुतांशी पुर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक पर्यंतच्या शाळां मध्ये शासन आदेशा नुसार विद्यार्थ्यांसाठी तक्रारपेट्याच लावण्यात आल्या नसुन या प्रकरणी प्रशासनाने केवळ सुचनांचे सोपस्कार उरकले आहेत. विशेष म्हणजे या मध्ये पालिका शाळांचा देखील समावेश आहे.

मीरारोड - मीरा भार्इंदर मधील बहुतांशी पुर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक पर्यंतच्या शाळां मध्ये शासन आदेशा नुसार विद्यार्थ्यांसाठी तक्रारपेट्याच लावण्यात आल्या नसुन या प्रकरणी प्रशासनाने केवळ सुचनांचे सोपस्कार उरकले आहेत. विशेष म्हणजे या मध्ये पालिका शाळांचा देखील समावेश आहे.शाळांच्या दर्शनी भागात शाळा व्यवस्थापनाने तक्रार पेटी ठेवणे बंधनकारक आहे. या बाबत शासनाने तक्रार पेटी ठेवण्याचे मे २०१७ मध्ये आदेश दिले असुन या तक्रार पेट्या शाळेचे मुख्याध्यापक तसेच विद्यार्थी व पालक प्रतिनिधी आणि पोलीस यांच्या समोर आठवड्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी उघडायच्या आहेत.विद्यार्थ्याांच्या आलेल्या तक्रारींवर सदर समितीने आवश्यक कार्यवाही करायची आहे. विद्यार्थी यांच्यावर होणारे लैंगिक अत्याचार, दमदाटी, मारहाण आदी प्रकारच्या घटनांना वाचा फोडण्यासाठी तसेच विद्यार्थी आदिंच्या अन्य प्रकारच्या तक्रारी समजुन घेण्यासाठी तक्रारपेट्या उपयुक्त ठरण्याची आशा आहे.परंतु शासन आदेशा नंतर देखील शाळां कडुन अशा प्रकारे तक्रार पेट्या लावण्यास टोलवाटोलवी केली जात आहे. शहरातील २२० प्राथमिक शाळां मध्ये ३६ शाळा ह्या महापालिकेच्या आहेत. त्या पालिकेच्या अखत्यारीत येतात. पण माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मात्र ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागा कडे येतात.या प्रकरणी मनविसेचे शान पवार यांनी पालिका प्रशासनासह आपलं सरकार पोर्टल वर तक्रार चालवली होती. त्या अनुषंगाने शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी सुरेश देशमुख यांनी , तक्रार पेटी ठेवण्याच्या सुचना सर्व मुख्याध्यापकांना दिल्या असुन पेट्या लावल्या बाबत आढावा घेतला जाईल. ज्यांनी पेट्या लावल्या नसतील त्यांना तसे आदेश दिले जातील असे उत्तर दिले आहे. 

टॅग्स :SchoolशाळाMira Bhayanderमीरा-भाईंदर