शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस; यंत्रणांनी सज्ज राहावे -  पालकमंत्री 

By सुरेश लोखंडे | Updated: June 10, 2024 19:35 IST

 पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज मान्सूनपूर्व आढावा बैठक दूरदृश्यप्रणालीद्वारे आयोजित करण्यात आली होती. 

ठाणे : पावसाळ्याच्या कालावधीत कोणतीही आपत्ती उद्भवू नये, यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार या पावसाळ्यात जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस अपेक्षित आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने पाणी साचणे, नाले तुंबणे आदी ठिकाणे शोधून तेथे उपाययोजना कराव्यात, अशा सूचना उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज दिले.  पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज मान्सूनपूर्व आढावा बैठक दूरदृश्यप्रणालीद्वारे आयोजित करण्यात आली होती. 

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, तहसीलदार संजय भोसले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. अनिता जवंजाळ सहभागी झाले होते. ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलास शिंदे, जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डी. एस. स्वामी यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच मीरा भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी, कल्याण डोंबिवली या महापालिकांचे आयुक्त, अंबरनाथ व बदलापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, ठाणे व नवी मुंबई पोलीस आयुक्त, रेल्वे, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, एसटी महामंडळ, पशुसंवर्धन, कृषी, जलसंपदा आदी  उपस्थित होते.  

जिल्ह्यातील मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेऊन  देसाई म्हणाले की, पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागात नाले तुंबणे, पाणी साचणे असे प्रकार होतात. अशा ठिकाणी महानगरपालिका, नगर पालिका यांनी पाणी साचणाऱ्या ठिकाणी पाण्याचा उपसा करण्यासाठी पंपांची व्यवस्था करावी. महापालिका, नगरपरिषदांनी आतापर्यंत नालेसफाई पूर्ण केली आहे. परंतु काही वेळेस एकदम येणाऱ्या पावसामुळे अनेकवेळेस गटारीमध्ये घाण साचून नाले तुंबतात. या पाण्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होवून नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागू शकते. नाल्यांच्या स्वच्छतेकडे नियमित लक्ष ठेवावे.  धोकादायक इमारतींमधील नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर करण्याचे काम पडल्यास. ही तात्पुरती निवारा केंद्र सुविधांनी सज्ज असावी. या ठिकाणी पिण्याचे पाणी, वीजेची सुविधा असावी,  अशा सूचनाही मंत्री. देसाई यांनी दिल्या. नागरी व ग्रामीण भागातील रूग्णालयांमध्ये औषधसाठा पुरेसा उपलब्ध करून ठेवावा. साथरोग नियंत्रणासाठी आरोग्य विभागाने सतर्क असावे. साथरोगावरील औषधांची उपलब्धता निश्चित करावी, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेRainपाऊस