शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
5
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
6
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
7
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
8
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
9
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
10
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
11
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
12
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
13
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
14
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
15
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
16
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
17
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
18
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
19
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
20
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...

राबोडीतील दीड हजारांहून अधिक मतदार राहिले वंचित

By admin | Updated: February 22, 2017 06:19 IST

ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी महापालिकेबरोबर सर्व पक्षांनी खबरदारी

ठाणे : ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी महापालिकेबरोबर सर्व पक्षांनी खबरदारी घेतली होती. परंतु, तरीही राबोडी भागात काही विचित्रच परिस्थिती पाहण्यास मिळाली. येथील बहुतेक सोसायटींचे मतदान केंद्र हे सरस्वती स्कूलमध्ये होते. परंतु, मतदान करण्यासाठी गेलेल्या सुमारे दीड हजार नागरिकांना आपला हक्क बजावता न आल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. मागील विधानसभा निवडणुकीतही मतदान केले असतांना अचानक यादीतून नाव गायब झालेच कसे, असा सवाल उपस्थित करुन त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना जाबदेखील विचारला. परंतु, त्यांच्या पदरी निराशाच आली. विशेष म्हणजे यामध्ये मराठी मतांचा टक्का हा अधिक असल्याची माहिती समोर आली आहे.ठाणे महापालिका हद्दीत असलेला राबोडी हा भाग येथे घडलेल्या दंगलीमुळे फारच चर्चेत आला होता. त्यामुळे हा भाग विशेष करुन निवडणुकीतही रडारवर येण्याची शक्यता असल्याने तो संवेदशनील मतदान केंद्र म्हणूनच घोषित करण्यात आला होता. मंगळवारी सकाळी येथील विविध केंद्रावर मतदानाची प्रक्रिया सुरु होती. काही ठिकाणी आईवडिलांची नावे गहाळ झाली होती तर त्यांच्या मुलाचे नाव यादीत होते, काही ठिकाणी तर अख्या कुटुंबाचेच नाव यादीतून गायब झाले होते. शिवाय मतदार यादींमधील घोळामुळेदेखील मतदार अधिकच हैराण झाल्याचे चित्र होते. दरम्यान दुपारी ११.४५ च्या सुमारास सरस्वती शाळेत अनेक जण मतदान करण्यासाठी जात होते. परंतु,त्यांचे नावच यादीत न सापडल्याने त्यांनी परतीचा मार्ग स्वीकारला. हा आकडा हळूहळू दीड हजारांच्या घरात गेला. मागील कित्येक वर्षे मतदान करीत असतांना अचानकपणे मतदार यादीतून नाव गहाळ झालेच कसे याचा जाब विचारण्यासाठी आकाशगंगामधील ४०० च्या आसपास मतदारांसह तुकाराम पार्क, लक्ष्मी पाटील रोड आदी भागातील रहिवासी मतदान केंद्रावर धडकले. त्यांना निवडणूक अधिकाऱ्यांकडूनदेखील अरेरावीची उत्तरे मिळाली. त्यामुळे हे मतदार आणखीनच हैराण झाले होते. अखेर याठिकाणी एसआरपीएफ आणि पोलिसांच्या एका तुकडीला पाचारण करण्यात आले. त्यानंतर मतदारांची समजूत काढण्यात आली. परंतु, त्यांच्या पदरी निराशाच आली, आणि या मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले. (प्रतिनिधी)मागील ६० वर्षे मी मतदान करीत आहे, परंतु, आज मतदान करण्यासाठी आलो असता माझे नावच यादीत नव्हते. त्यामुळे मला मतदानपासून वंचित राहावे लागले.- नलिनी धुरी, ८० वर्षीय वृद्धामागील लोकसभा, विधानसभेला मतदान केले असतांनादेखील मला आता अचानक मतदार यादीत नाव नसल्याचा धक्का बसला अशा पद्धतीने जर काम होत असेल तर याला जबाबदार कोण.- प्रमिला पाटील, मतदार, राबोडीकुटुंबातील इतर सदस्यांची नावे आहेत. मुलाचेही नाव आहे, पण आमची नावे मतदार यादीत नाही.- नंदकुमार भोसले, मतदारमतदार यादीतून दीड हजाराहून नावे गहाळ झाली असून मी गेली २५ ते ३० वर्षापासून मतदान करीत आहे. माझा मतदानाचा हक्क हिरावून घेण्यात आला असून याला जबाबदार शासन असून, त्यांनी जाणूनबूजून मतदारांना मतदानापासून वंचित ठेवले आहे.- केदार दिघे, शिवसेनेचे पदाधिकारी प्रारुप मतदार यादी जाहीर झाल्यानंतर सात दिवसांचा अवधी देण्यात आला होता. त्यानुसार प्रत्येक मतदात्याने याद्यांमध्ये आपले नाव आहे किंवा नाही याची खात्री करणे गरजेचे होते. परंतु, त्यांच्याकडून हे झाले नसल्याने असा प्रकार घडला असावा.- संदीप माळवी, उपायुक्त, महापालिका, ठाणे