शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

महिला पोलिसांचा विनयभंग: ठाण्याचे राखीव निरीक्षक शिंदे यांना अटक करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 20:19 IST

ठाणे मुख्यालयाचे निलंबित राखीव पोलीस निरीक्षक यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल होऊनही त्यांना अद्याप अटक झालेली नाही. त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला जाण्यासाठी ठाणे पोलिसांनी न्यायालयात प्रयत्न करावेत, अशी मागणी शिवसेना उपनेत्या नीलम गो-हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्दे शिवसेना उपनेत्या निलम गो-हे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणीनिलंबन झाले पण अटकेची कारवाई नाही महिला आयपीएस अधिका-यामार्फतही चौकशी समिती नेमावी

ठाणे: दोन महिला पोलिसांचा विनयभंग प्रकरणात अंतरिम अटकपूर्व जामीन मिळालेल्या ठाणे मुख्यालयाचे राखीव पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्यावर अटकेची कारवाई व्हावी, अशी मागणी शिवसेना उपनेत्या तथा विधानपरिषदेच्या प्रतोद नीलम गो-हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. वरिष्ठ महिला आयपीएस अधिका-याच्या समितीमार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात गो-हे यांनी म्हटले आहे की, महिला पोलिसांच्या विनयभंग प्रकरणात शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली असली तरी देखील शिंदे यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. हा जामीन अर्ज फेटाळण्यासंदर्भात शासनाने न्यायालयाकडे सरकारी वकीलामार्फत मागणी करावी. शिंदे यांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज न्यायालयाने फेटाळण्यासंदर्भात ठाणे पोलीस आयुक्तालयाकडून कोणतीच कारवाई न होता, वेळ काढूपणा केला जात असल्याची शंका असल्याचाही त्यांनी आरोप केला आहे.तक्र ारदार महिला पोलीस कर्मचा-यांचे समुपदेशन करण्यात यावे तसेच या महिलांची तात्पुरती दुसºया विभागात बदली केली असली तरी शिंदे यांना अटक न झाल्यामुळे मुख्यालयातील महिलांमध्ये घबराट आणि अस्वस्थता आहे. त्यामुळे ताबडतोब अटकेची कारवाई करावी.या प्रकरणात आणखीन कोणत्या अधिका-यांचा समावेश आहे का? याचीही सखोल चौकशी होण्यासाठी वरिष्ठ महिला आयपीएस अधिकारी यांची चौकशी समिती स्थापन करून या प्रकरणाची गंभीर दखल घेतली जावी, असेही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

 

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसMolestationविनयभंग