शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

भार्इंदरमध्ये मोबाईल चोरांचा सुळसुळाट; चोरीसाठी अल्पवयीन मुलांचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2017 17:35 IST

भार्इंदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात मोबाईल चोरांचा सुळसुळाट झाला असताना स्थानिक पोलिसांना मात्र मोबईल अथवा चोर सापडत नसल्याने स्थानिकांत चिंतेचे वातावरण पसरले आहे.

भाईंदर - भार्इंदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात मोबाईल चोरांचा सुळसुळाट झाला असताना स्थानिक पोलिसांना मात्र मोबईल अथवा चोर सापडत नसल्याने स्थानिकांत चिंतेचे वातावरण पसरले आहे. अशा चो-यांसाठी अल्पवयीन मुलांचा वापर होत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.भार्इंदर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बाजारांसह शाळेचा परिसर प्रचंड गर्दीचा ठरत असल्याने त्या गर्दीचा फायदा चोर घेत असतात. पोलिस ठाण्यालगतच असलेल्या नाझरेथ शाळा व समोरील भाजी बाजारात लोकांची नेहमीच मोठी गर्दी असते. त्याचा फायदा घेत चोर बेसावध लोकांच्या खिशासह वस्तुंवर डल्ला मारतात. यात मोबाईल चोरींचे प्रमाण जास्त असुन त्यांच्या तक्रारीवर मात्र पोलिस ठाण्यांत तक्रार घेण्याव्यतिरीक्त कोणतीही कार्यवाही केली जात नसल्याची आरोप पिडीतांकडुन केला जात आहे. सध्या पोलिस ठाण्यांत आॅनलाईन तक्रार केली जाते. त्यानंतर स्थानिक पोलिस ठाण्यातील संबंधित कर्मचारी आपल्या सोईनुसार मोबाईलचा ईएमईआय क्रमांक ट्रेसिंगसाठी आपल्या यंत्रावर टाकतात. दरम्यान मोबाईल चोर, चोरीचा मोबाईल इतर क्षेत्रात विकुन दुसऱ्या चोरीच्या मागे लागतो. त्यातच सध्या कित्येक मोबाईल धारकांनी विमा काढल्याने ते चोरी झालेल्या मोबाईलच्या शोधासाठी पोलिसांकडे पाठपुरावा करीत नसल्याचे दिसुन आले आहे. परिणामी पोलिसांना चोर अथवा मोबाईल सापडत नसल्याचे पिडीतांकडुन सांगण्यात येते. सोमवारी देखील पोलिस ठाण्यासमोरील भाजी बाजारात राजू काळे यांचा सॅमसंग ए८आय हा मोबाईल चोरीला गेला असताना त्याचा ईएमईआय क्रमांक ट्रेसिंगला टाकण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्याने सुरुवातीला टाळाटाळ करुन अखेर वरीष्ठांच्या आदेशानुसार कार्यवाही करण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्यांना चारवेळा पोलिस ठाण्यात फेऱ्या माराव्या लागल्याचे त्यांनी सांगितले.२०१५ मध्ये चोरीला गेलेल्या सॅमसंग नोट २ मोबईलची तक्रार पोलिसांत केल्यानंतरही अद्याप मोबाईल अथवा चोर पोलिसांना सापडलेला नाही. त्यामुळे चोरांना पोलिसांच्या तपासाची माहिती असल्यानेच असे प्रकार वारंवार घडत आहेत.- स्थानिक रहिवासी प्रकाश नागणेचोरीला गेलेल्या मोबाईलचा ईएमईआय क्रमांक साधारणत: चार ते पाच दिवसांनी ट्रेसिंगसाठी टाकला जातो. लगेचच तो चालू होण्याची शक्यता कमी असल्याने तो त्वरीत ट्रेसिंगसाठी टाकला जात नाही. तरी देखील याची तक्रार कोणाकडेही केल्यास मला फरक पडत नाही.- भार्इंदर पोलिस ठाण्यातील कर्मचारी उथळेमोबाईल सांभाळताना घाई केली जात नाही तेवढी पोलिस ठाण्यात आल्यानंतर त्याच्या शोधासाठी घाई केली जाते. संबंधित कर्मचाय््रााला मोबाईलचा ईएमईआय क्रमांक ट्रेसिंगसाठी टाकण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचा शोध घेण्याची जबाबदारी माझी राहिल.- पोलिस निरीक्षक राजेंद्र कांबळे

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरRobberyदरोडा