शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

भार्इंदरमध्ये मोबाईल चोरांचा सुळसुळाट; चोरीसाठी अल्पवयीन मुलांचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2017 17:35 IST

भार्इंदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात मोबाईल चोरांचा सुळसुळाट झाला असताना स्थानिक पोलिसांना मात्र मोबईल अथवा चोर सापडत नसल्याने स्थानिकांत चिंतेचे वातावरण पसरले आहे.

भाईंदर - भार्इंदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात मोबाईल चोरांचा सुळसुळाट झाला असताना स्थानिक पोलिसांना मात्र मोबईल अथवा चोर सापडत नसल्याने स्थानिकांत चिंतेचे वातावरण पसरले आहे. अशा चो-यांसाठी अल्पवयीन मुलांचा वापर होत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.भार्इंदर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बाजारांसह शाळेचा परिसर प्रचंड गर्दीचा ठरत असल्याने त्या गर्दीचा फायदा चोर घेत असतात. पोलिस ठाण्यालगतच असलेल्या नाझरेथ शाळा व समोरील भाजी बाजारात लोकांची नेहमीच मोठी गर्दी असते. त्याचा फायदा घेत चोर बेसावध लोकांच्या खिशासह वस्तुंवर डल्ला मारतात. यात मोबाईल चोरींचे प्रमाण जास्त असुन त्यांच्या तक्रारीवर मात्र पोलिस ठाण्यांत तक्रार घेण्याव्यतिरीक्त कोणतीही कार्यवाही केली जात नसल्याची आरोप पिडीतांकडुन केला जात आहे. सध्या पोलिस ठाण्यांत आॅनलाईन तक्रार केली जाते. त्यानंतर स्थानिक पोलिस ठाण्यातील संबंधित कर्मचारी आपल्या सोईनुसार मोबाईलचा ईएमईआय क्रमांक ट्रेसिंगसाठी आपल्या यंत्रावर टाकतात. दरम्यान मोबाईल चोर, चोरीचा मोबाईल इतर क्षेत्रात विकुन दुसऱ्या चोरीच्या मागे लागतो. त्यातच सध्या कित्येक मोबाईल धारकांनी विमा काढल्याने ते चोरी झालेल्या मोबाईलच्या शोधासाठी पोलिसांकडे पाठपुरावा करीत नसल्याचे दिसुन आले आहे. परिणामी पोलिसांना चोर अथवा मोबाईल सापडत नसल्याचे पिडीतांकडुन सांगण्यात येते. सोमवारी देखील पोलिस ठाण्यासमोरील भाजी बाजारात राजू काळे यांचा सॅमसंग ए८आय हा मोबाईल चोरीला गेला असताना त्याचा ईएमईआय क्रमांक ट्रेसिंगला टाकण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्याने सुरुवातीला टाळाटाळ करुन अखेर वरीष्ठांच्या आदेशानुसार कार्यवाही करण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्यांना चारवेळा पोलिस ठाण्यात फेऱ्या माराव्या लागल्याचे त्यांनी सांगितले.२०१५ मध्ये चोरीला गेलेल्या सॅमसंग नोट २ मोबईलची तक्रार पोलिसांत केल्यानंतरही अद्याप मोबाईल अथवा चोर पोलिसांना सापडलेला नाही. त्यामुळे चोरांना पोलिसांच्या तपासाची माहिती असल्यानेच असे प्रकार वारंवार घडत आहेत.- स्थानिक रहिवासी प्रकाश नागणेचोरीला गेलेल्या मोबाईलचा ईएमईआय क्रमांक साधारणत: चार ते पाच दिवसांनी ट्रेसिंगसाठी टाकला जातो. लगेचच तो चालू होण्याची शक्यता कमी असल्याने तो त्वरीत ट्रेसिंगसाठी टाकला जात नाही. तरी देखील याची तक्रार कोणाकडेही केल्यास मला फरक पडत नाही.- भार्इंदर पोलिस ठाण्यातील कर्मचारी उथळेमोबाईल सांभाळताना घाई केली जात नाही तेवढी पोलिस ठाण्यात आल्यानंतर त्याच्या शोधासाठी घाई केली जाते. संबंधित कर्मचाय््रााला मोबाईलचा ईएमईआय क्रमांक ट्रेसिंगसाठी टाकण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचा शोध घेण्याची जबाबदारी माझी राहिल.- पोलिस निरीक्षक राजेंद्र कांबळे

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरRobberyदरोडा