शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

भार्इंदरमध्ये मोबाईल चोरांचा सुळसुळाट; चोरीसाठी अल्पवयीन मुलांचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2017 17:35 IST

भार्इंदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात मोबाईल चोरांचा सुळसुळाट झाला असताना स्थानिक पोलिसांना मात्र मोबईल अथवा चोर सापडत नसल्याने स्थानिकांत चिंतेचे वातावरण पसरले आहे.

भाईंदर - भार्इंदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात मोबाईल चोरांचा सुळसुळाट झाला असताना स्थानिक पोलिसांना मात्र मोबईल अथवा चोर सापडत नसल्याने स्थानिकांत चिंतेचे वातावरण पसरले आहे. अशा चो-यांसाठी अल्पवयीन मुलांचा वापर होत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.भार्इंदर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बाजारांसह शाळेचा परिसर प्रचंड गर्दीचा ठरत असल्याने त्या गर्दीचा फायदा चोर घेत असतात. पोलिस ठाण्यालगतच असलेल्या नाझरेथ शाळा व समोरील भाजी बाजारात लोकांची नेहमीच मोठी गर्दी असते. त्याचा फायदा घेत चोर बेसावध लोकांच्या खिशासह वस्तुंवर डल्ला मारतात. यात मोबाईल चोरींचे प्रमाण जास्त असुन त्यांच्या तक्रारीवर मात्र पोलिस ठाण्यांत तक्रार घेण्याव्यतिरीक्त कोणतीही कार्यवाही केली जात नसल्याची आरोप पिडीतांकडुन केला जात आहे. सध्या पोलिस ठाण्यांत आॅनलाईन तक्रार केली जाते. त्यानंतर स्थानिक पोलिस ठाण्यातील संबंधित कर्मचारी आपल्या सोईनुसार मोबाईलचा ईएमईआय क्रमांक ट्रेसिंगसाठी आपल्या यंत्रावर टाकतात. दरम्यान मोबाईल चोर, चोरीचा मोबाईल इतर क्षेत्रात विकुन दुसऱ्या चोरीच्या मागे लागतो. त्यातच सध्या कित्येक मोबाईल धारकांनी विमा काढल्याने ते चोरी झालेल्या मोबाईलच्या शोधासाठी पोलिसांकडे पाठपुरावा करीत नसल्याचे दिसुन आले आहे. परिणामी पोलिसांना चोर अथवा मोबाईल सापडत नसल्याचे पिडीतांकडुन सांगण्यात येते. सोमवारी देखील पोलिस ठाण्यासमोरील भाजी बाजारात राजू काळे यांचा सॅमसंग ए८आय हा मोबाईल चोरीला गेला असताना त्याचा ईएमईआय क्रमांक ट्रेसिंगला टाकण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्याने सुरुवातीला टाळाटाळ करुन अखेर वरीष्ठांच्या आदेशानुसार कार्यवाही करण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्यांना चारवेळा पोलिस ठाण्यात फेऱ्या माराव्या लागल्याचे त्यांनी सांगितले.२०१५ मध्ये चोरीला गेलेल्या सॅमसंग नोट २ मोबईलची तक्रार पोलिसांत केल्यानंतरही अद्याप मोबाईल अथवा चोर पोलिसांना सापडलेला नाही. त्यामुळे चोरांना पोलिसांच्या तपासाची माहिती असल्यानेच असे प्रकार वारंवार घडत आहेत.- स्थानिक रहिवासी प्रकाश नागणेचोरीला गेलेल्या मोबाईलचा ईएमईआय क्रमांक साधारणत: चार ते पाच दिवसांनी ट्रेसिंगसाठी टाकला जातो. लगेचच तो चालू होण्याची शक्यता कमी असल्याने तो त्वरीत ट्रेसिंगसाठी टाकला जात नाही. तरी देखील याची तक्रार कोणाकडेही केल्यास मला फरक पडत नाही.- भार्इंदर पोलिस ठाण्यातील कर्मचारी उथळेमोबाईल सांभाळताना घाई केली जात नाही तेवढी पोलिस ठाण्यात आल्यानंतर त्याच्या शोधासाठी घाई केली जाते. संबंधित कर्मचाय््रााला मोबाईलचा ईएमईआय क्रमांक ट्रेसिंगसाठी टाकण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचा शोध घेण्याची जबाबदारी माझी राहिल.- पोलिस निरीक्षक राजेंद्र कांबळे

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरRobberyदरोडा