शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

ड्रग्ज विक्रेत्यास अटक करताना जमावाचा पोलिसांवर हल्ला; भाईंदरमधील उत्तन येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2024 12:38 IST

एका महिला पोलिसाचे केस ओढून बांबू मारला व विनयभंग केला. उत्तन पोलिसांनी याप्रकरणी एका अल्पवयीन मुलासह अन्य तिघा हल्लोखोरांना अटक केली आहे.

मीरा रोड : अमली पदार्थ विकणाऱ्या आरोपीला अटक करून नेत असताना अमली पदार्थविरोधी शाखेच्या पोलिस पथकावर १३ ते १८ जणांच्या जमावाने बांबू आणि काठ्यांनी हल्ला चढवला. एका महिला पोलिसाचे केस ओढून बांबू मारला व विनयभंग केला. उत्तन पोलिसांनी याप्रकरणी एका अल्पवयीन मुलासह अन्य तिघा हल्लोखोरांना अटक केली आहे.

मीरा भाईंदर-वसई विरार पोलिस आयुक्तालयाच्या अमली पदार्थविरोधी शाखेचे पोलिस निरीक्षक अमर मराठे व ५ पोलिस कर्मचारी असे ६ जण २० फेब्रुवारीला रात्री भाईंदरच्या उत्तन येथील सरकारी जागेत बेकायदा वसलेल्या धावगी झोपडपट्टी येथे कारवाईसाठी गेले होते. तेथे  हनीफ शेख नावाच्या अमली पदार्थ माफियाला पकडून त्याच्याकडून ३२ ग्रॅम अमली पदार्थ जप्त केला. पोलिस पथक हनीफ याला पकडून नेत असताना नशा केलेले काही तरुण आणि महिला अशा १३ ते १८ जणांच्या जमावाने पोलिसांना घेराव घातला. त्यावेळी जमावाने पोलिसांना धक्काबुक्की, शिवीगाळ केली. काहींनी बांबूने पोलिसांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात जमावाने महिला पोलिस लतादेवी एक्कलदेवी यांना बांबूने मारहाण करून जखमी केले, त्यांचे केस ओढले व विनयभंग केला.

आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी

या घटनेप्रकरणी उत्तन सागरी पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचे गांभीर्य पाहता वरिष्ठ पोलिस निरीक्षक दादाराम करांडे व पथकाने कारवाई करत अब्बास अली केसर हुसेन मिर्झा (३८), अंकुरकुमार वीरेंद्र भारती (२४) व राजू जयंत्री गौतम (१९) या तिघांना अटक केली असून त्यांना ठाणे न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तर, पोलिसांनी एक अल्पवयीन आरोपी सुद्धा ताब्यात घेतले आहेत. अन्य पुरुष व महिला आरोपींचा पोलिस शोध घेत असून लवकरच उर्वरित आरोपींना अटक केली जाईल, असे दादाराम करांडे यांनी सांगितले.

टॅग्स :Policeपोलिस