शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

मनसेचा गोरगरीबांना मदतीचा हात; आतापर्यंत २ हजाराहून अधिक नागरीकांना केली मोलाची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 15:27 IST

मागील १३ मे पासून मनसेचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या वतीने मोफत अन्न धान्याचे किट वापट केले जात आहेत.

ठाणे  : कोरोनामुळे हातावरचे पोट असणाऱ्यांचे प्रंचड प्रमाणात नुकसान झाले आहे, कोणाची नोकरी गेली तर कोणाच्या हाती रोजीरोटी नाही. त्यामुळे अशा गरजु आणि गोरगरीब नागरीकांसाठी ठाणे  शहर मनसे धावून आली आहे. त्यानुसार रिक्षा चालक, रिक्षा चालक महिला, घरकाम करणाऱ्या महिला, तृतीय पंथी आदींसह झोपडपटटी भागात वास्तव्यास असलेल्या नागरीकांसाठी मागील १३ मे पासून मनसेचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या वतीने मोफत अन्न धान्याचे किट वापट केले जात आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या  लाटेत अनेकांचे संसार उघडय़ावर पडले आहेत. खास करुन रिक्षा चालक, नोकरदार वर्ग, घरकाम करणा:या महिलांसह झोपडपट्टी भागातील नागरीकांना किराणा सामान घेण्यासही हाती पैसा नाही. अशा नागरीकांसाठी १३ मे पासून मनसेच्या वतीने मोफत अन्नधान्य वाटप योजना हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार आतापर्यंत समाजातील ६ गटातील नागरीकांना अन्नधान्याचा मदतीचा हात देण्यात आला आहे.

यामध्ये रिक्षा चालक, घरकाम, चित्रपट काम करणारे बॅक स्टेज कलाकार, महिला रिक्ष चालक, तृतीय पंथ आणि झोपडपटटीत वास्तव्यास असलेल्या सुमारे २ हजार नागरीकांना आतार्पयत अन्नधान्याचे वाटप करण्यात आले आहे.  यामध्ये तीन ते पाच किलो तांदूळ, तीन किलो गहू किंवा पीठ, अर्धा अर्धा किलो कडधान्य, डाळी, एक किलो साखर, मसाल्याची पाकीटे, चहा पावडर, एक एक किलो कांदे बटाटे, मीठ, तेल आदी साहित्य दिले गेले आहे.

 कोरोनामुळे गोरगरीब तसेच हातावरचे पोट असणाऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशांना हा मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. त्यांना मनसेच्या वतीने एक महिन्याचे अन्नधान्य देण्यात आले आहे. यापुढेही अशा प्रकारे मदतीचा ओघ हा सुरुच राहणार आहे. (अविनाश जाधव - ठाणे, पालघर जिल्हाध्यक्ष - मनसे)

टॅग्स :Avinash Jadhavअविनाश जाधवMNSमनसेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे