शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

ठाण्यात मनसेची कार्यशाळा; राज ठाकरे घेणार पदाधिकाऱ्यांची शिकवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 08:26 IST

लोकसभा निवडणुकीनंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा आज ठाण्यामध्ये होणार आहे.

ठाणे - लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे न करता सर्वाधिक चर्चा झाली ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनाच थेट टार्गेट केल्यामुळे संपूर्ण निवडणुकीचा प्रचार मनसे आणि भाजपाच्या आरोप-प्रत्यारोपामुळे गाजला. लोकसभा निवडणुकीनंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा आज ठाण्यामध्ये होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यावेळी विधानसभा निवडणुकीसाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे. 

लोकसभा निवडणुकीत मोदी-शहा मुक्त भारतची घोषणा देत भाजपाविरोधात प्रचाराची रणधुमाळी गाजवल्यानंतर राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना नेमकं काय मार्गदर्शन करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. मनसेच्या राज्यभरातील सर्व पदाधिकाऱ्यांना या कार्यशाळेसाठी ठाण्यात बोलवण्यात आलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मनसेच्या या कार्यशाळेला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. तसेच राज्यातील पदाधिकाऱ्यांना दुष्काळाबाबतची संबंधित जिल्ह्याची माहितीसोबत घेऊन येण्याची सूचना केली आहे. त्यामुळे आगामी काळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे दुष्काळावरुन राज्य सरकारला धारेवर धरणार असल्याचीही चर्चा आहे. 

या कार्यशाळेच्या निमित्ताने राज ठाकरे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून, आगामी विधानसभा निवडणुकीत कशाप्रकारे प्रचार केला पाहिजे. कोणते मुद्दे घेतले पाहिजेत. तसेच संघटनात्मक पातळीवर नेतृत्व बदलाच्या हालचालीबाबतही कार्यशाळेत चर्चा केली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभरातील मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण केलं होतं. मनसे कार्यकर्त्यांचा हा उत्साह कायम ठेवण्याचा राज ठाकरे यांचा प्रयत्न आहे. 

मनसेच्या या कार्यशाळेसाठी मनसेचे नेते, पक्षाचे उपाध्यक्ष, सरचिटणीस,  जिल्हाध्यक्ष, उपजिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, महापालिका-नगरपालिका क्षेत्रातील शहराध्यक्ष, मुंबई, पुणे, नाशिक शहरातील विभाग अध्यक्ष, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य या सर्वांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच ग्रामीण भागातून येणाऱ्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या जिल्ह्यातील सध्याची दुष्काळाची स्थिती काय आहे याची माहिती देण्यात सांगितली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाण्यात काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेthaneठाणेElectionनिवडणूक