शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात मनसेची कार्यशाळा; राज ठाकरे घेणार पदाधिकाऱ्यांची शिकवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 08:26 IST

लोकसभा निवडणुकीनंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा आज ठाण्यामध्ये होणार आहे.

ठाणे - लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे न करता सर्वाधिक चर्चा झाली ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनाच थेट टार्गेट केल्यामुळे संपूर्ण निवडणुकीचा प्रचार मनसे आणि भाजपाच्या आरोप-प्रत्यारोपामुळे गाजला. लोकसभा निवडणुकीनंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा आज ठाण्यामध्ये होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यावेळी विधानसभा निवडणुकीसाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे. 

लोकसभा निवडणुकीत मोदी-शहा मुक्त भारतची घोषणा देत भाजपाविरोधात प्रचाराची रणधुमाळी गाजवल्यानंतर राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना नेमकं काय मार्गदर्शन करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. मनसेच्या राज्यभरातील सर्व पदाधिकाऱ्यांना या कार्यशाळेसाठी ठाण्यात बोलवण्यात आलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मनसेच्या या कार्यशाळेला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. तसेच राज्यातील पदाधिकाऱ्यांना दुष्काळाबाबतची संबंधित जिल्ह्याची माहितीसोबत घेऊन येण्याची सूचना केली आहे. त्यामुळे आगामी काळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे दुष्काळावरुन राज्य सरकारला धारेवर धरणार असल्याचीही चर्चा आहे. 

या कार्यशाळेच्या निमित्ताने राज ठाकरे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून, आगामी विधानसभा निवडणुकीत कशाप्रकारे प्रचार केला पाहिजे. कोणते मुद्दे घेतले पाहिजेत. तसेच संघटनात्मक पातळीवर नेतृत्व बदलाच्या हालचालीबाबतही कार्यशाळेत चर्चा केली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभरातील मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण केलं होतं. मनसे कार्यकर्त्यांचा हा उत्साह कायम ठेवण्याचा राज ठाकरे यांचा प्रयत्न आहे. 

मनसेच्या या कार्यशाळेसाठी मनसेचे नेते, पक्षाचे उपाध्यक्ष, सरचिटणीस,  जिल्हाध्यक्ष, उपजिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, महापालिका-नगरपालिका क्षेत्रातील शहराध्यक्ष, मुंबई, पुणे, नाशिक शहरातील विभाग अध्यक्ष, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य या सर्वांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच ग्रामीण भागातून येणाऱ्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या जिल्ह्यातील सध्याची दुष्काळाची स्थिती काय आहे याची माहिती देण्यात सांगितली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाण्यात काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेthaneठाणेElectionनिवडणूक