शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

मनसेला ३१ डिसेंबरचे सेलिब्रेशन हवे जोशात; संचारबंदी उठवण्याची केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2020 07:08 IST

अन्यथा रस्त्यावर उतरून जल्लोष

ठाणे : नवीन वर्षाचे स्वागत जल्लोषात व्हावे आणि तरुणांना याचा आनंद घेता यावा, यासाठी सरकारने लादलेल्या संचारबंदीच्या अटी ३१ डिसेंबरपुरत्या तरी शिथिल कराव्यात, अशी मागणी मनसेने केली आहे. अन्यथा, आम्ही रस्त्यावर उतरून नवीन वर्षाचे स्वागत जल्लोषात करू, असे उघड आव्हान मनसेने सरकारला दिले आहे.

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळल्याने २१ डिसेंबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी बैठक घेतली. त्यात राज्यात २२ डिसेंबर ते ५ जानेवारीपर्यंत मनपा क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. परंतु, तिला मनसेने विरोध केला आहे. अनेक तरुण व हौशी लोकांनी मनसेकडे नववर्षासाठी अटी शिथिल करण्याची मागणी केली आहे. ती लक्षात घेता तसेच वर्षभर सण-उत्सव हे निर्बंधातच गेल्याने आता ३१ डिसेंबरला एका दिवसापुरते हे निर्बंध उठवावेत, अशी मागणी मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केली आहे. 

रात्रीच फिरल्यावर कोरोना होताे का? 

दिवसा एकत्र फिरल्यावर कोरोना होत नाही आणि रात्रीचा संचार केल्यावरच तो होतो, हा कोणता शोध राज्य सरकारने लावला आहे, असा सवाल जाधव यांनी केला. कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याचा दावा करून ३१ डिसेंबरला रात्रीची संचारबंदी उठवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाMNSमनसेAvinash Jadhavअविनाश जाधव