शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक मनसे लढविणार; राज ठाकरे यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 08:06 IST

ठाणे-पालघरमधील पदाधिकाऱ्यांची घेतली बैठक

ठाणे : कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढविणार असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी येथे जाहीर केले. ठाण्यातील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात आगामी कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढविण्याबाबत ठाकरे यांनी ठाणे-पालघर जिल्ह्यांतील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.

निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर टीकास्त्र सोडताना राज म्हणाले की, रविवारी वर्ल्ड कप फायनल आहे. दुसरी सेमिफायनल गुरुवारी आहे. आज सेमिफायनल खेळणाऱ्या दोन्ही टीमना तुमच्यापैकी जो जिंकेल आणि फायनलला जाईल त्यांना ‘साहब ने बोला है, हारने को,’ असे सांगितले जाऊ शकते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळातील भाजप वेगळी होती. आताची भाजप वेगळी आहे. छापे घालून दबाव टाकण्याचे राजकारण जास्त काळ टिकणार नाही, असेही ते म्हणाले.

पदवीधर मतदार संघातून प्रमोद नवलकर जेव्हा उभे होते, तेव्हा त्यांनी उमेदवारी अर्ज दाखवला होता. त्याखाली सही किंवा अंगठा असे लिहिलेले होते. पदवीधरांनी ज्या उमेदवाराला मतदान करायचे तो शिकलेला असला पाहिजे, अशी अट नाही. पदवीधरांच्या मतांवर आमदार होणारा पदवीधर नसला तरी चालेल, अशी ही निवडणूक आहे, अशा शब्दांत राज यांनी नाराजी व्यक्त केली.

मराठी पाट्यांसाठी हात-पाय हलवावे लागतील

फटाके कधी लावायचे, सण कसे साजरे करायचे हे कोर्ट ठरवणार. कोर्टाचे आदेश पाळले जात नाहीत, त्याकडे मात्र कोर्ट लक्ष देणार नाही. मराठी पाट्यांसाठी आंदोलने झाली, मराठी पाट्यांच्या विरोधात व्यापारी कोर्टात गेले. महाराष्ट्र ज्यांना पोसतोय ते व्यापारी कोर्टात जातात; परंतु, सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानायला हवेत, प्रादेशिक भाषांमध्ये दुकानांच्या पाट्या असाव्यात, असे आदेश न्यायालयाने दिले. परंतु, सरकारकडून त्याची अंमलबजावणी होत नाही. कदाचित आम्हालाच पुन्हा हात-पाय हलवावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला.

राष्ट्रवादीवर टीका

महाराष्ट्रात १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर दुसऱ्या जातींबद्दल द्वेषाचे राजकारण सुरू झाले, या आरोपाचा राज यांनी पुनरुच्चार केला. मनोज जरांगे-पाटील यांच्यामागून कोण बोलत आहे, हे काही काळानंतर उघड होईल, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे