शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
2
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
3
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
4
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
5
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
6
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
7
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
8
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
9
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
10
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
11
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
12
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
13
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
14
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
15
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
16
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
17
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
18
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
19
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
20
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड

उपोषण आपलं काम नव्हे! टोल दरवाढीवरून मनसे प्रमुख राज ठाकरे राज्य सरकारवर बरसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2023 12:10 IST

टोल भरूनही रस्त्यावर खड्डे असतील तर टोल का भरायचे?, रोड टॅक्सही भरायचा आणि टोलही भरायचा मग पैसे जातात कुठे? टोलविरोधात एकनाथ शिंदे यांनीही याचिका दाखल केली होती. ही याचिका मागे का घेतली? असा सवाल राज ठाकरेंनी विचारला.

ठाणे – टोल दरवाढीवरून मनसे नेते अविनाश जाधव यांच्यासह कार्यकर्ते गेल्या ४ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. तेव्हा उपोषण आपलं काम नव्हे. लवकरच टोलबाबतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा करेन. त्यानंतर टोलचं काय करायचे हे सांगेन असं म्हणत राज ठाकरे यांनी टोलमुक्त महाराष्ट्राची पुन्हा शिवसेना-भाजपाला आठवण करून दिली.

मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले की, टोलदरात जी वाढ झालीय, त्याविरोधात अविनाश जाधव आणि सहकारी उपोषणाला बसले होते. मी अविनाशला फोन करून हे उपोषण वैगेरे आपलं काम नाही, मी भेटायला येतो. गेल्या अनेक वर्षापासून मनसे टोल नाक्यांबाबत आंदोलन करतंय. मनसे आंदोलनातून ६५ टोलनाके बंद झाले. निवडणुकीत भाजपा-शिवसेनेच्या जाहीरनाम्यात आम्ही टोलमुक्त महाराष्ट्र करू असं आश्वासन दिले होते. परंतु पत्रकारांना वेळ नसल्याने त्यांनी कधीही सरकारला हा प्रश्न विचारला नाही असं राज ठाकरेंनी म्हटलं.

तसेच टोल भरूनही रस्त्यावर खड्डे असतील तर टोल का भरायचे?, रोड टॅक्सही भरायचा आणि टोलही भरायचा मग पैसे जातात कुठे? टोलविरोधात एकनाथ शिंदे यांनीही याचिका दाखल केली होती. ही याचिका मागे का घेतली? कुणाच्या सांगण्यावरून याचिका मागे घेतली? एकीकडे लोकांना आश्वासने द्यायची आणि दुसरीकडे टोल घ्यायचे, जनतेचेही आश्चर्य वाटते, जे पिळवणूक करतात त्यांनाच मतदान केले जाते. अशा लोकांसाठी एक माणूस मेल्याने काही फरक पडणार नाही. मला आज अनेक लोकं भेटली, त्यांनी निवेदने दिली. येत्या २-३ दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेईन, या सर्व गोष्टी मी सांगेन, त्यानंतर वाढीव टोलचं काय होणार हे सांगू शकेन असंही राज ठाकरेंनी म्हटलं.

दरम्यान, निवडणुका तोंडावर आहेत, मुख्यमंत्रीही ठाण्याचे आहेत. लोकांचा आक्रोश आणि राग हे त्यांनाही परवडणारा नाही. त्यामुळे २-३ दिवसांत माझी मुख्यमंत्र्यासोबत भेट होईल, त्यानंतर काय होतंय हे मी सविस्तर सांगेन

त्याच त्याच लोकांना निवडून दिल्यानंतर अशाप्रकारे गोष्टी होतात. निवडणुकीत मतदान करताना रस्त्यावरील खड्डे, दरवाढ हे लक्षात न घेता इतर बाबींवर मतदान केले जाते, त्यानंतर ५ वर्ष डोक्याला हात लावून बसता. या सर्व गोष्टींचा जनतेनेही विचार केला पाहिजे असं राज ठाकरेंनी सांगितले.

कमिशन मिळवण्यासाठी मोठे रॅकेट

मुंबई-नाशिक रस्त्यावर दरवर्षी खड्डे पडलेले दिसतील. जर चांगले रस्ते केले, पुढील २०-२५ वर्ष कामे निघणार नाहीत. कामे निघाली नाही तर टेंडर निघत नाहीत. टेंडर निघाले नाही तर कमिशन मिळणार नाही. हे सगळे रॅकेट आहे. चांगला फुटपाथ खोदून कामे केली जातात. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जाऊन विचारा. चांगला रस्ता पुन्हा का खोदला जातो असा आरोप राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर केला.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेAvinash Jadhavअविनाश जाधव