शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

उपोषण आपलं काम नव्हे! टोल दरवाढीवरून मनसे प्रमुख राज ठाकरे राज्य सरकारवर बरसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2023 12:10 IST

टोल भरूनही रस्त्यावर खड्डे असतील तर टोल का भरायचे?, रोड टॅक्सही भरायचा आणि टोलही भरायचा मग पैसे जातात कुठे? टोलविरोधात एकनाथ शिंदे यांनीही याचिका दाखल केली होती. ही याचिका मागे का घेतली? असा सवाल राज ठाकरेंनी विचारला.

ठाणे – टोल दरवाढीवरून मनसे नेते अविनाश जाधव यांच्यासह कार्यकर्ते गेल्या ४ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. तेव्हा उपोषण आपलं काम नव्हे. लवकरच टोलबाबतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा करेन. त्यानंतर टोलचं काय करायचे हे सांगेन असं म्हणत राज ठाकरे यांनी टोलमुक्त महाराष्ट्राची पुन्हा शिवसेना-भाजपाला आठवण करून दिली.

मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले की, टोलदरात जी वाढ झालीय, त्याविरोधात अविनाश जाधव आणि सहकारी उपोषणाला बसले होते. मी अविनाशला फोन करून हे उपोषण वैगेरे आपलं काम नाही, मी भेटायला येतो. गेल्या अनेक वर्षापासून मनसे टोल नाक्यांबाबत आंदोलन करतंय. मनसे आंदोलनातून ६५ टोलनाके बंद झाले. निवडणुकीत भाजपा-शिवसेनेच्या जाहीरनाम्यात आम्ही टोलमुक्त महाराष्ट्र करू असं आश्वासन दिले होते. परंतु पत्रकारांना वेळ नसल्याने त्यांनी कधीही सरकारला हा प्रश्न विचारला नाही असं राज ठाकरेंनी म्हटलं.

तसेच टोल भरूनही रस्त्यावर खड्डे असतील तर टोल का भरायचे?, रोड टॅक्सही भरायचा आणि टोलही भरायचा मग पैसे जातात कुठे? टोलविरोधात एकनाथ शिंदे यांनीही याचिका दाखल केली होती. ही याचिका मागे का घेतली? कुणाच्या सांगण्यावरून याचिका मागे घेतली? एकीकडे लोकांना आश्वासने द्यायची आणि दुसरीकडे टोल घ्यायचे, जनतेचेही आश्चर्य वाटते, जे पिळवणूक करतात त्यांनाच मतदान केले जाते. अशा लोकांसाठी एक माणूस मेल्याने काही फरक पडणार नाही. मला आज अनेक लोकं भेटली, त्यांनी निवेदने दिली. येत्या २-३ दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेईन, या सर्व गोष्टी मी सांगेन, त्यानंतर वाढीव टोलचं काय होणार हे सांगू शकेन असंही राज ठाकरेंनी म्हटलं.

दरम्यान, निवडणुका तोंडावर आहेत, मुख्यमंत्रीही ठाण्याचे आहेत. लोकांचा आक्रोश आणि राग हे त्यांनाही परवडणारा नाही. त्यामुळे २-३ दिवसांत माझी मुख्यमंत्र्यासोबत भेट होईल, त्यानंतर काय होतंय हे मी सविस्तर सांगेन

त्याच त्याच लोकांना निवडून दिल्यानंतर अशाप्रकारे गोष्टी होतात. निवडणुकीत मतदान करताना रस्त्यावरील खड्डे, दरवाढ हे लक्षात न घेता इतर बाबींवर मतदान केले जाते, त्यानंतर ५ वर्ष डोक्याला हात लावून बसता. या सर्व गोष्टींचा जनतेनेही विचार केला पाहिजे असं राज ठाकरेंनी सांगितले.

कमिशन मिळवण्यासाठी मोठे रॅकेट

मुंबई-नाशिक रस्त्यावर दरवर्षी खड्डे पडलेले दिसतील. जर चांगले रस्ते केले, पुढील २०-२५ वर्ष कामे निघणार नाहीत. कामे निघाली नाही तर टेंडर निघत नाहीत. टेंडर निघाले नाही तर कमिशन मिळणार नाही. हे सगळे रॅकेट आहे. चांगला फुटपाथ खोदून कामे केली जातात. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जाऊन विचारा. चांगला रस्ता पुन्हा का खोदला जातो असा आरोप राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर केला.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेAvinash Jadhavअविनाश जाधव