शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
4
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
5
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
6
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
7
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
8
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
9
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
10
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
11
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
12
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
13
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
14
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
15
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
16
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
17
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
18
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
19
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
20
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा

उपोषण आपलं काम नव्हे! टोल दरवाढीवरून मनसे प्रमुख राज ठाकरे राज्य सरकारवर बरसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2023 12:10 IST

टोल भरूनही रस्त्यावर खड्डे असतील तर टोल का भरायचे?, रोड टॅक्सही भरायचा आणि टोलही भरायचा मग पैसे जातात कुठे? टोलविरोधात एकनाथ शिंदे यांनीही याचिका दाखल केली होती. ही याचिका मागे का घेतली? असा सवाल राज ठाकरेंनी विचारला.

ठाणे – टोल दरवाढीवरून मनसे नेते अविनाश जाधव यांच्यासह कार्यकर्ते गेल्या ४ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. तेव्हा उपोषण आपलं काम नव्हे. लवकरच टोलबाबतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा करेन. त्यानंतर टोलचं काय करायचे हे सांगेन असं म्हणत राज ठाकरे यांनी टोलमुक्त महाराष्ट्राची पुन्हा शिवसेना-भाजपाला आठवण करून दिली.

मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले की, टोलदरात जी वाढ झालीय, त्याविरोधात अविनाश जाधव आणि सहकारी उपोषणाला बसले होते. मी अविनाशला फोन करून हे उपोषण वैगेरे आपलं काम नाही, मी भेटायला येतो. गेल्या अनेक वर्षापासून मनसे टोल नाक्यांबाबत आंदोलन करतंय. मनसे आंदोलनातून ६५ टोलनाके बंद झाले. निवडणुकीत भाजपा-शिवसेनेच्या जाहीरनाम्यात आम्ही टोलमुक्त महाराष्ट्र करू असं आश्वासन दिले होते. परंतु पत्रकारांना वेळ नसल्याने त्यांनी कधीही सरकारला हा प्रश्न विचारला नाही असं राज ठाकरेंनी म्हटलं.

तसेच टोल भरूनही रस्त्यावर खड्डे असतील तर टोल का भरायचे?, रोड टॅक्सही भरायचा आणि टोलही भरायचा मग पैसे जातात कुठे? टोलविरोधात एकनाथ शिंदे यांनीही याचिका दाखल केली होती. ही याचिका मागे का घेतली? कुणाच्या सांगण्यावरून याचिका मागे घेतली? एकीकडे लोकांना आश्वासने द्यायची आणि दुसरीकडे टोल घ्यायचे, जनतेचेही आश्चर्य वाटते, जे पिळवणूक करतात त्यांनाच मतदान केले जाते. अशा लोकांसाठी एक माणूस मेल्याने काही फरक पडणार नाही. मला आज अनेक लोकं भेटली, त्यांनी निवेदने दिली. येत्या २-३ दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेईन, या सर्व गोष्टी मी सांगेन, त्यानंतर वाढीव टोलचं काय होणार हे सांगू शकेन असंही राज ठाकरेंनी म्हटलं.

दरम्यान, निवडणुका तोंडावर आहेत, मुख्यमंत्रीही ठाण्याचे आहेत. लोकांचा आक्रोश आणि राग हे त्यांनाही परवडणारा नाही. त्यामुळे २-३ दिवसांत माझी मुख्यमंत्र्यासोबत भेट होईल, त्यानंतर काय होतंय हे मी सविस्तर सांगेन

त्याच त्याच लोकांना निवडून दिल्यानंतर अशाप्रकारे गोष्टी होतात. निवडणुकीत मतदान करताना रस्त्यावरील खड्डे, दरवाढ हे लक्षात न घेता इतर बाबींवर मतदान केले जाते, त्यानंतर ५ वर्ष डोक्याला हात लावून बसता. या सर्व गोष्टींचा जनतेनेही विचार केला पाहिजे असं राज ठाकरेंनी सांगितले.

कमिशन मिळवण्यासाठी मोठे रॅकेट

मुंबई-नाशिक रस्त्यावर दरवर्षी खड्डे पडलेले दिसतील. जर चांगले रस्ते केले, पुढील २०-२५ वर्ष कामे निघणार नाहीत. कामे निघाली नाही तर टेंडर निघत नाहीत. टेंडर निघाले नाही तर कमिशन मिळणार नाही. हे सगळे रॅकेट आहे. चांगला फुटपाथ खोदून कामे केली जातात. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जाऊन विचारा. चांगला रस्ता पुन्हा का खोदला जातो असा आरोप राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर केला.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेAvinash Jadhavअविनाश जाधव