शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

ठाणे लॉकडाऊन केले मग कल्याण डोंबिवलीत का नाही?; मनसेचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2020 20:32 IST

आमदार पाटील यांच्या मते क्वारंटाइन सेंटर सील करणो हा रुग्ण संख्या कमी करण्यासाठी उत्तम पर्याय ठरु शकत नाही.

कल्याण: ठाणे वाढत असल्याने त्याठिकाणी पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. मग कल्याणडोंबिवलीत रुग्ण वाढून देखील ठाण्याप्रमाणे लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय का घेतला जात नाही असा सवाल कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना ट्विट केले आहे. 

पालकमंत्री शिंदे यांनी कल्याण अत्रे रंगमंदिरात 20 जून रोजी कोरोनासंदर्भात घेतलेल्या आढावा बैठकीत चारही आमदार व प्रशासनाशी चर्चा केली होती. या बैठकीत आमदार पाटील यांनी पुन्हा एकदा कल्याण डोंबिवलीत 15 दिवसाचा एक कडक लॉकडाऊन घेतला गेला पाहिजे अशी सूचना केली होती. मात्र त्यांच्या मागणीची विचार केला गेलेला नाही. दरम्यान आयुक्तांनी ज्या प्रभगात जास्त रुग्ण वाढत आहे. त्या प्रभागातील क्वारंटाइन झोन सील केले.

आमदार पाटील यांच्या मते क्वारंटाइन सेंटर सील करणो हा रुग्ण संख्या कमी करण्यासाठी उत्तम पर्याय ठरु शकत नाही. त्यासाठी पुन्हा एकदा लॉकडाऊन घेतला गेला पाहिजे. ठाणे शहरापेक्षा जास्त रुग्ण कल्याण डोंबिवलीत मिळून येत आहे. दररोज 350 ते 400 नवे रुग्ण आढळून येत आहे. ठाण्यापेक्षा जास्त गंभीर स्थिती कल्याण डोंबिवलीची आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीत लॉकडाऊची आवश्यकता असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMNSमनसेRaju Patilराजू पाटीलthaneठाणेkalyanकल्याणdombivaliडोंबिवली