शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

‘मनसे’ने टोलनाक्यांवर लावले ९० सीसीटीव्ही; १२ तासांत ५५ हजार वाहने गेल्याची नाेंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 07:13 IST

टोलनाक्यावर आंदोलन केल्यानंतर मनसेने उपोषणाच्या मार्गातून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : टोल दरवाढ रद्द करा किंवा ठाणेकरांना टोलमाफीतून मुक्तता द्या, या मागणीसाठी मनसेने काही दिवसांपासून आक्रमक भूमिका घेतली आहे.  परंतु आता यापुढेही जाऊन मनसेने ठाणे आनंदनगर, एलबीएस मार्ग, ऐरोली, वाशी या टोलनाक्यांवर तब्बल ९० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम हाती घेतले आहे. १८ ऑक्टोबरपासून हे कॅमेरे सुरू होतील. त्यानंतर या ठिकाणी रोज किती वाहने येतात आणि किती जातात, याचा संपूर्ण डेटा ते राज्य सरकारला सादर करणार आहेत.

टोलनाक्यावर आंदोलन केल्यानंतर मनसेने उपोषणाच्या मार्गातून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर राज्य सरकारबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची बैठक झाली. या बैठकीत वाहने पाच टक्केच वाढल्याने टोल दरवाढ कमी करता येणार नाही, अशी भूमिका सरकारने घेतली. मात्र, वाहने वाढली असून, टोलदेखील जास्त आकारला जात असल्याचा आरोप मनसेने केला हाेता.

१२ तासांत ५५ हजार वाहने गेल्याची नाेंदआनंद नगर आणि एलबीएस मार्गावरील टोलनाक्यांवरून सोमवारी दिवसभरात ५५ हजार वाहने गेल्याची नाेंद सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये असलेल्या सॉफ्टवेअर झाली. टाेलनाक्यांवरील सीसीटीव्ही  कॅमेऱ्यांमुळे निश्चितच वाहनांची संख्या वाढली असून याबाबतचे पुरावेच आम्ही राज्य सरकारला सादर करू, अशी माहिती मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली.

टॅग्स :MNSमनसेtollplazaटोलनाका