शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्रीसाहेब, 'या' लोकांना आवरा आता; मनसेने लिहिलं उद्धव ठाकरेंना पत्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 13:55 IST

जर एखादा नगरसेवक अशा भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवत असेल तर त्याला एकटे पाडून कोंडीत पकडायचे हे आता नेहमीचेच झाले आहे,

डोंबिवली - कल्याण-डोंबिवली शहरात अनाधिकृत बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आला असून दिवसेंदिवस हे गंभीर होत चाललं आहे. सोमवारच्या कडोंमपा भाजपा उपमहापौरांनी महासभेत दिलेला राजीनामा नाट्यावरून दिसून येते की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे असा आरोप मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांनी केला आहे. 

याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात की, काही नगरसेवकांच्या आशिर्वादानेच शहरातील महापालिकेच्या गार्डन,शाळा या सारख्या राखीव भूखंडावर बिनदिक्कत अनधिकृत बांधकामांचे पेव गावगुंडाकरवी सुरू आहे, करोडोंचा शासकीय महसूल बुडवून हे काम सुरू आहे, महापालिकेचे ९० टक्के अधिकारी या भ्रष्टाचारात अखंड बुडाल्याचे दिसून येतं. ह प्रभाग अधिकारी कंखारे यांची उचबांगडी व संजय घरत यांची लाच घेताना लाच लुचपत खात्याकडून झालेली धरपकड ही ताजी उदाहरणं समोर आली आहेत. 

त्याचसोबत  कहर म्हणजे अनधिकृत बांधकामांची यादी देवून सुध्दा लाख लाख रूपये लाच देऊन बिनदिक्कत अशा बांधकामांची दस्त नोंदणी (रजिस्ट्रेशन) ही सरकारी नोंदणी कार्यालयातून होत आहे, हे म्हणजे भ्रष्टाचाराचा कळसच म्हणावा लागेल.परंतु अशा महत्त्वाच्या विषयावर व महापालिकेचा करोडोंचा महसूल बुडवणाऱ्यांविरोधात जर निवडून दिलेले नगरसेवक व शिवसेनेच्या महापौर दुर्लक्ष करत असतील तर ते अनधिकृत बांधकामांना आणि भ्रष्टाचाराला पाठिंबाच देत आहेत हे स्पष्ट होते असं त्यांनी पत्रात नमूद केले आहे. 

तसेच जर एखादा नगरसेवक अशा भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवत असेल तर त्याला एकटे पाडून कोंडीत पकडायचे हे आता नेहमीचेच झाले आहे, पण ह्या सर्व घडामोंडींमुळे एक मात्र नक्की की शहराचे मात्र वाट्टोळे लागत आहे, नागरी सोयी-सुविधांचाही बट्टयाबोळ लागत आहे, विकास कामे करायला महसूल उत्त्पन्नच नाही, शहराच्या मोकळ्या जागा दादागिरीने गिळंकृत होत आहेत. हे सर्व सत्य आहे हे जर बघायचे असेल तर डोंबिवलीच्या गोग्रासवाडी गेटवर तर त्या परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांची नांवासकट यादी असलेले एक भले मोठे होर्डींग गेले अनेक दिवस लागले आहे पण महापालिकेला अशी बांधकामे मात्र दिसत नाहीत हे आश्चर्य नसून भ्रष्टाचार बोकाळल्याचे उत्तम उदाहरण आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्याच पक्षाची सत्ता असणाऱ्या महापालिकेच लक्ष घालून अधोगतीकडे चाललेल्या आमच्या शहराला प्रगतीच्या, विकासाच्या दिशेने घेऊन जातील ही अपेक्षा आहे असं राजेश कदम यांनी सांगितले आहे. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMNSमनसेdombivaliडोंबिवलीkalyanकल्याणkdmcकल्याण डोंबिवली महापालिका