शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी, मोठं अनुदान देण्याचा निर्णय
5
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
6
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
7
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
8
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
9
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
10
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
11
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
12
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
13
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
14
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
15
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
16
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
17
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
18
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
19
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
20
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!

मुख्यमंत्रीसाहेब, 'या' लोकांना आवरा आता; मनसेने लिहिलं उद्धव ठाकरेंना पत्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 13:55 IST

जर एखादा नगरसेवक अशा भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवत असेल तर त्याला एकटे पाडून कोंडीत पकडायचे हे आता नेहमीचेच झाले आहे,

डोंबिवली - कल्याण-डोंबिवली शहरात अनाधिकृत बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आला असून दिवसेंदिवस हे गंभीर होत चाललं आहे. सोमवारच्या कडोंमपा भाजपा उपमहापौरांनी महासभेत दिलेला राजीनामा नाट्यावरून दिसून येते की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे असा आरोप मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांनी केला आहे. 

याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात की, काही नगरसेवकांच्या आशिर्वादानेच शहरातील महापालिकेच्या गार्डन,शाळा या सारख्या राखीव भूखंडावर बिनदिक्कत अनधिकृत बांधकामांचे पेव गावगुंडाकरवी सुरू आहे, करोडोंचा शासकीय महसूल बुडवून हे काम सुरू आहे, महापालिकेचे ९० टक्के अधिकारी या भ्रष्टाचारात अखंड बुडाल्याचे दिसून येतं. ह प्रभाग अधिकारी कंखारे यांची उचबांगडी व संजय घरत यांची लाच घेताना लाच लुचपत खात्याकडून झालेली धरपकड ही ताजी उदाहरणं समोर आली आहेत. 

त्याचसोबत  कहर म्हणजे अनधिकृत बांधकामांची यादी देवून सुध्दा लाख लाख रूपये लाच देऊन बिनदिक्कत अशा बांधकामांची दस्त नोंदणी (रजिस्ट्रेशन) ही सरकारी नोंदणी कार्यालयातून होत आहे, हे म्हणजे भ्रष्टाचाराचा कळसच म्हणावा लागेल.परंतु अशा महत्त्वाच्या विषयावर व महापालिकेचा करोडोंचा महसूल बुडवणाऱ्यांविरोधात जर निवडून दिलेले नगरसेवक व शिवसेनेच्या महापौर दुर्लक्ष करत असतील तर ते अनधिकृत बांधकामांना आणि भ्रष्टाचाराला पाठिंबाच देत आहेत हे स्पष्ट होते असं त्यांनी पत्रात नमूद केले आहे. 

तसेच जर एखादा नगरसेवक अशा भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवत असेल तर त्याला एकटे पाडून कोंडीत पकडायचे हे आता नेहमीचेच झाले आहे, पण ह्या सर्व घडामोंडींमुळे एक मात्र नक्की की शहराचे मात्र वाट्टोळे लागत आहे, नागरी सोयी-सुविधांचाही बट्टयाबोळ लागत आहे, विकास कामे करायला महसूल उत्त्पन्नच नाही, शहराच्या मोकळ्या जागा दादागिरीने गिळंकृत होत आहेत. हे सर्व सत्य आहे हे जर बघायचे असेल तर डोंबिवलीच्या गोग्रासवाडी गेटवर तर त्या परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांची नांवासकट यादी असलेले एक भले मोठे होर्डींग गेले अनेक दिवस लागले आहे पण महापालिकेला अशी बांधकामे मात्र दिसत नाहीत हे आश्चर्य नसून भ्रष्टाचार बोकाळल्याचे उत्तम उदाहरण आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्याच पक्षाची सत्ता असणाऱ्या महापालिकेच लक्ष घालून अधोगतीकडे चाललेल्या आमच्या शहराला प्रगतीच्या, विकासाच्या दिशेने घेऊन जातील ही अपेक्षा आहे असं राजेश कदम यांनी सांगितले आहे. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMNSमनसेdombivaliडोंबिवलीkalyanकल्याणkdmcकल्याण डोंबिवली महापालिका