शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

भाजपचा भोंगा उतरवण्याकरिता ठाकरेबंधूंनी दिली अदृश्य टाळी?

By संदीप प्रधान | Updated: May 3, 2022 08:56 IST

भाजपचा देशभर वाजणारा भोंगा उतरवण्याकरिता उद्धव व राज या ठाकरेबंधूंनी परस्परांना दिलेली ही अदृश्य टाळी तर नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

संदीप प्रधानठाणे : मशिदीवरील भोंगे उतरवण्याची भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतल्यापासून भाजपचे नेते त्या भूमिकेला प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष पाठिंबा देत असून, यामुळे भाजप-मनसे युतीच्या चर्चेला वेग आला आहे. भाजपमधील उत्तर भारतीय नेते व या पक्षासोबत असलेला उत्तर भारतीय मतदार यामुळे अस्वस्थ झालेला आहे. राज यांनी हिंदुत्ववादाची भूमिका घेतली असली तरी यापूर्वी उत्तर भारतीयांवर त्यांनी केलेले हल्ले विस्मरणात गेलेले नाहीत. साहजिकच यामुळे उत्तर भारतीय मतदार भाजपपासून दुरावण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपचा देशभर वाजणारा भोंगा उतरवण्याकरिता उद्धव व राज या ठाकरेबंधूंनी परस्परांना दिलेली ही अदृश्य टाळी तर नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.भाजपसोबत सध्या गुजराती व उत्तर भारतीय मतदार मोठ्या संख्येने आहे. उत्तर प्रदेशात गेले काही दिवस केवळ दोन-तीन तास वीजपुरवठा होतो. मात्र तरीही योगी आदित्यनाथ यांना राजकीय यश लाभले. गुजरातमध्येही तीव्र पाणीटंचाई आहे. मात्र गुजराती मतदार मोदींसोबत आहे. या पार्श्वभूमीवर येत्या पालिका निवडणुकीत भाजपला रोखायचे तर एका समूहात संभ्रम निर्माण करणे ही महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्षांची गरज आहे. त्यातूनच मनसेने भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केला व हिंदुत्वाची गर्जना केली. या भूमिकेला भाजप विरोध करू शकत नाही. राज यांनी आदित्यनाथ यांची दोनवेळा स्तुती केली. सुरुवातीला भाजप-मनसे युतीचे भाजपच्या काही नेत्यांनी जाहीर स्वागत केले. परंतु लागलीच देवेंद्र फडणवीस व अन्य काही नेत्यांनी मनसेसोबत युती अशक्य असल्याचे जाहीर केले. भाजपमधील उत्तर भारतीय नेत्यांनी मनसेला सोबत घेण्याबाबत नाराजी प्रकट केल्याची चर्चा आहे. मुंबई महानगर क्षेत्रातच उत्तर भारतीय मतदारांची संख्या एक कोटींपेक्षा जास्त आहे. बुधवारी औरंगाबादमध्ये मनसैनिक व विहिंपचे कार्यकर्ते महाआरती करणार होते. या कार्यक्रमात सहभागी न होण्याचे आदेश विहिंपच्या नेत्यांनी दिले, हे बोलके आहे. 

शिवसेनेच्या गडात टीका टाळलीऔरंगाबाद व ठाणे हे शिवसेनेचे मोठे गड आहेत. तेथील जाहीर सभेत राज यांनी शिवसेना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर थेट टीका केली नाही. त्यांच्या टीकेचा रोख केवळ शरद पवार यांच्यावर राहिला, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राज यांनी घेतलेल्या हिंदुत्वाच्या भूमिकेमुळे भाजपकडे जाणारी हिंदुत्ववादी मते रोखण्यात त्यांना यश आले तर त्याचा फटका भाजपलाच बसणार आहे. मुंबईतून शिवसेना व ठाकरे ब्रँड संपवण्याच्या भाजपच्या प्रयत्नांमुळे कदाचित हे दोन भाऊ राजकीय अस्तित्वाच्या गरजेपोटी एकत्र आले असतील, अशी चर्चा आहे.

पुरंदरेंचा मुद्दाही डोकेदुखीशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे ब्राह्मण असल्याने त्यांना लक्ष्य केले गेले, असे राज सातत्याने बोलत आहेत. भाजपसोबत ब्राह्मण मतदार सुरुवातीपासून आहे. राज हे या मुद्द्यावरून पवार यांना लक्ष्य करीत असल्याने ब्राह्मण समाज राज यांच्यावर खुष आहे. भाजप या मुद्द्याचे जाहीर समर्थन करू शकत नाही कारण त्यामुळे मराठा समाज दुरावण्याची भीती भाजपला वाटते. राज जेवढी स्पष्ट भूमिका घेतात तेवढी भाजप घेत नाही, असे वाटल्याने काही ब्राह्मण मते भाजपपासून दुरावून राज यांच्या पारड्यात पडली तर त्याचाही फटका भाजपला बसेल, अशी चर्चा आहे.

महाराष्ट्रातील येत्या महापालिका निवडणुकीत भाजप-मनसे युती होणार नाही हे भाजप नेत्यांनी स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे युतीची चर्चा चुकीची आहे.राजहंस सिंह, आमदार, भाजप

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाShiv Senaशिवसेना