शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे जाणारा सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
3
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
4
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
5
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
6
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
7
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
8
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
9
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
10
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
11
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
12
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
13
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
14
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
15
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
16
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
17
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
18
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
19
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
20
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र

ठाणे शहरातील वाहनांच्या टोलमुक्तीसाठी मनसेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 00:38 IST

आनंदनगरनाक्यावर मानवी साखळी; मनसे-भाजप संघर्ष पेटणार

ठाणे : ठाण्यातील टोलमुक्तीसाठी मनसे पुन्हा आक्रमक झाली असून आनंदनगर येथील टोलनाक्यावर एमएच ०४ या वाहनांकडून टोल घेण्यात येऊ नये, यासाठी मानवी साखळी करून मनसेने शनिवारी आंदोलन केले. आठ दिवसांपूर्वीच भाजपचे आमदार संजय केळकर यांनी एमएच ०४ नंबर असणाऱ्या वाहनांकडून टोल घेण्यात येणार नाही, असे जाहीर केले होते. मात्र, अजूनही ठाणेकरांकडून तो घेणे सुरूच असून आमदार जनतेशी खोटं बोलत आहेत, असा आरोपही मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला.आनंदनगर टोलनाका ते कोपरी ब्रिजपर्यंत ही मानवी साखळी केली होती. भविष्यात ती टोलनाक्यापासून ते थेट माजिवड्यापर्यंत करण्यात येईल, असे सांगून ठाणेकरांना टोलमुक्त करण्यासाठी आमरण उपोषणाचा इशारा त्यांनी यावेळी दिला. मनसेचे आंदोलन असल्याने टोलनाक्यावर मोठा पोलीस बंदोबस्तदेखील ठेवला होता. मानवी साखळी करून एमएच ०४ वाहनांना टोल बंद करावा, या आशयाचे फलक मनसेच्या कार्यकर्त्यांनी हातात धरले. यापूर्वी सामाजिक संघटनांनीदेखील टोलमुक्तीसाठी मानवी साखळी आंदोलन केले होते.२०१४ मध्ये युतीचे सरकार आले, तेव्हा त्या सरकारने टोलमुक्तीचे आश्वासन दिले होते. मात्र, ते आश्वासनच ठरले. जनतेला टोल नको असल्याने मनसेने आता आक्र मक भूमिका घेऊन हे आंदोलन छेडले असल्याचे जाधव यांनी सांगितले. ८ दिवसांपूर्वीच भाजपचे आमदार संजय केळकर यांनी एमएच ०४ या वाहनांना टोलमुक्त केले असल्याचे जाहीर केले होते. तशाप्रकारच्या बातम्यादेखील प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र, आमदारदेखील खोटे बोलत असल्याचे आरोप त्यांनी यावेळी केल्यामुळे टोलवरून मनसे आणि भाजपमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे.ठाण्यातील नागरिकांना अर्ध्या किमीसाठी टोल भरावा लागत असून हे अन्यायकारक असल्याची प्रतिक्रिया दर्शन देशमुख यांनी दिली. जिथे १० मिनिटांचे अंतर लागते, तिथे या टोलनाक्यामुळे ४५ मिनिटांचे अंतर लागत असून घरी जायला रोज उशीर होतो. त्यामुळे निदान ठाणेकरांसाठी तरी हा टोल बंद करावा, ही मनसेची मागणी योग्य असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही आधीच ठामपाला कररूपाने पैसे भरतो. मात्र, आज ठाण्याच्या रस्त्यांची काय अवस्था आहे, हे सर्वांना माहीत आहे. सेवाच चांगली नसेल तर टोल तरी का द्यायचा, त्यामुळे मनसेच्या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :tollplazaटोलनाकाMNSमनसेBJPभाजपा