शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

ठाणे शहरातील वाहनांच्या टोलमुक्तीसाठी मनसेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 00:38 IST

आनंदनगरनाक्यावर मानवी साखळी; मनसे-भाजप संघर्ष पेटणार

ठाणे : ठाण्यातील टोलमुक्तीसाठी मनसे पुन्हा आक्रमक झाली असून आनंदनगर येथील टोलनाक्यावर एमएच ०४ या वाहनांकडून टोल घेण्यात येऊ नये, यासाठी मानवी साखळी करून मनसेने शनिवारी आंदोलन केले. आठ दिवसांपूर्वीच भाजपचे आमदार संजय केळकर यांनी एमएच ०४ नंबर असणाऱ्या वाहनांकडून टोल घेण्यात येणार नाही, असे जाहीर केले होते. मात्र, अजूनही ठाणेकरांकडून तो घेणे सुरूच असून आमदार जनतेशी खोटं बोलत आहेत, असा आरोपही मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला.आनंदनगर टोलनाका ते कोपरी ब्रिजपर्यंत ही मानवी साखळी केली होती. भविष्यात ती टोलनाक्यापासून ते थेट माजिवड्यापर्यंत करण्यात येईल, असे सांगून ठाणेकरांना टोलमुक्त करण्यासाठी आमरण उपोषणाचा इशारा त्यांनी यावेळी दिला. मनसेचे आंदोलन असल्याने टोलनाक्यावर मोठा पोलीस बंदोबस्तदेखील ठेवला होता. मानवी साखळी करून एमएच ०४ वाहनांना टोल बंद करावा, या आशयाचे फलक मनसेच्या कार्यकर्त्यांनी हातात धरले. यापूर्वी सामाजिक संघटनांनीदेखील टोलमुक्तीसाठी मानवी साखळी आंदोलन केले होते.२०१४ मध्ये युतीचे सरकार आले, तेव्हा त्या सरकारने टोलमुक्तीचे आश्वासन दिले होते. मात्र, ते आश्वासनच ठरले. जनतेला टोल नको असल्याने मनसेने आता आक्र मक भूमिका घेऊन हे आंदोलन छेडले असल्याचे जाधव यांनी सांगितले. ८ दिवसांपूर्वीच भाजपचे आमदार संजय केळकर यांनी एमएच ०४ या वाहनांना टोलमुक्त केले असल्याचे जाहीर केले होते. तशाप्रकारच्या बातम्यादेखील प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र, आमदारदेखील खोटे बोलत असल्याचे आरोप त्यांनी यावेळी केल्यामुळे टोलवरून मनसे आणि भाजपमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे.ठाण्यातील नागरिकांना अर्ध्या किमीसाठी टोल भरावा लागत असून हे अन्यायकारक असल्याची प्रतिक्रिया दर्शन देशमुख यांनी दिली. जिथे १० मिनिटांचे अंतर लागते, तिथे या टोलनाक्यामुळे ४५ मिनिटांचे अंतर लागत असून घरी जायला रोज उशीर होतो. त्यामुळे निदान ठाणेकरांसाठी तरी हा टोल बंद करावा, ही मनसेची मागणी योग्य असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही आधीच ठामपाला कररूपाने पैसे भरतो. मात्र, आज ठाण्याच्या रस्त्यांची काय अवस्था आहे, हे सर्वांना माहीत आहे. सेवाच चांगली नसेल तर टोल तरी का द्यायचा, त्यामुळे मनसेच्या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :tollplazaटोलनाकाMNSमनसेBJPभाजपा