शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

एमएमआरडीए अधिकारी, कंत्राटदारावर गुन्हे दाखल करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 02:27 IST

रस्ता रूंदीकरण, काँक्रिटीकरणाचे काम सुरू; कांदळवनाचा केला ऱ्हास

मीरा रोड : भाईंदरच्या सुभाषचंद्र बोस मैदानापासून मोर्वापर्यंत एमएमआरडीएने चालवलेल्या रस्त्याच्या कामास केंद्राच्या मीठ विभागाने जागेच्या मालकीवरून घेतलेला आक्षेप, मोठ्या प्रमाणात केलेली वृक्षतोड, अर्धवट चाललेले काम यावरून टीका होत असतानाच या कामामुळे कांदळवन क्षेत्राचे उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे. या जागी कांदळवनाचा ºहास झाल्याप्रकरणी आधी गुन्हा दाखल झाला असतानाही या क्षेत्रात काम केले जात असल्याने हे काम थांबवून कंत्राटदार आणि एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यां विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.विकास आराखड्यात असलेल्या भार्इंदर पश्चिमेस बोस मैदानापासून मोर्वापर्यंतच्या ३० मीटर रस्त्याचे रुंदीकरण आणि काँक्रिटीकरण एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी घाईघाईने खोदकाम व काँक्रिटीकरणाचे काम कंत्राटदार करत आहे. सध्या जिकडे मोकळी जागा मिळेल, तिकडे खोदकाम करून रस्ताबांधणी सुरू आहे. मुर्धा, राई, मोर्वा गावांत अनेक ठिकाणी जुनी घरे व अन्य बांधकामे असून रहिवाशांचा विरोध पाहता तिकडे तूर्तास रस्ता रुंदीकरणाचे काम टाळले आहे.रुंदीकरणासाठी मोठी जुनी झाडे तोडली आहेत. ही झाडे तोडताना पालिकेची वृक्ष प्राधिकरण समिती नसताना तसेच न्यायालयाच्या आदेशाचे सर्रास उल्लंघन केले गेले आहे. एमएमआरडीएने रस्ता रुंदीकरणासाठी केंद्र सरकारच्या मीठ विभागाच्या जागेवरच काम सुरू केले आहे. काम करण्यासाठी कोणतीही परवानगी एमएमआरडीए वा पालिकेने मीठ विभागाची घेतलेलीनाही.मीठ विभागाचे अधीक्षक राजेंद्र सिंह यांनी लेखी तक्रार महापालिका, पोलीस ठाणे आदींकडे करूनही त्याची दखल घेण्यात आलेली नाही. मीठ विभागाच्या जमिनीची मालकी असतानाच दुसरीकडे सीआरझेडमध्ये काम चालवले असताना त्याचीही परवानगी घेण्यात आल्याबद्दल साशंकता आहे.महत्त्वाची बाब म्हणजे बोस मैदानासमोर व पुढे मुर्धा खाडीपर्यंतच्या मार्गावर दाट कांदळवन असून भराव केल्याप्रकरणी सरकारनेच महापालिका कंत्राटदारासह डम्परचालकाविरोधात भार्इंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. कांदळवन व त्यापासून ५० मीटरपर्यंत कोणत्याही प्रकारचे काम करण्यास कायद्याने मनाई आहे. उच्च न्यायालयाचेही तसे आदेश आहेत. तर, ज्या ठिकाणी कांदळवनात भराव, बांधकामे झाली आहेत, ते काढून पूर्वीसारखे करण्याचेही न्यायालयाने बजावले आहे.असे असतानाही थेट कांदळवनात खोदकाम व रस्त्याचे बांधकाम केले जात असल्याने एमएमआरडीएकडूनच पर्यावरणाचा ºहास होत असल्याचा आरोप स्थानिक रहिवासी दीपेश म्हात्रे यांनी केला आहे. एमएमआरडीएचे अधिकारी आणि कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल करून यंत्रसामग्री जप्त करण्याची मागणी दुष्यंत भोईर यांनी केली आहे.अधिकाऱ्यांकडून डोळेझाक : कांदळवनात राजरोस बेकायदा काम सुरू असताना मंडळ अधिकारी, तलाठी डोळेझाक करून कंत्राटदाराचा फायदा पाहत असल्याने त्यांना निलंबित करून सहआरोपी करण्याची मागणी प्रदीप जंगम यांनी केली आहे. तर, पालिकेचे प्रभाग अधिकारी गोविंद परब यांनी घटनास्थळी जाऊन कांदळवनात काम करण्याबाबतची परवानगी विचारली असता ती नसल्याचे कंत्राटदाराच्या कर्मचाºयाने सांगितले.

टॅग्स :mira roadमीरा रोड