शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
2
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
3
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
4
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
5
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
6
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
7
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
8
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
9
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
10
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
11
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
12
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
13
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
14
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
15
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
16
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
17
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
18
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
19
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
20
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...

आमदारांनी घेतली जीवन प्राधिकरणाच्या अधिका-यांची शाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 18:23 IST

‘पाणी मिळाले, निधीही मिळाला, वितरणाचे काय?’ या मधळ्याखाली लोकमतमध्ये पाणी वितरण व्यवस्थेसंदर्भात जी भूमीका मांडण्यात आली होती त्या अनुशंगाने आमदार किसन कथोरे यांनी अधिका-यांची महत्वाची बैठक आयोजित केली होती.

 - पंकज पाटील

बदलापूर - ‘ पाणी मिळाले, निधीही मिळाला, वितरणाचे काय?’ या मधळ्याखाली लोकमतमध्ये पाणी वितरण व्यवस्थेसंदर्भात जी भूमीका मांडण्यात आली होती त्या अनुशंगाने आमदार किसन कथोरे यांनी अधिका-यांची महत्वाची बैठक आयोजित केली होती. पटबंधारे विभाग आणि जीवन प्राधिकरणाच्या सर्व अधिका-यांना या बैठकीत बोलाविण्यात आले होते. यावेळी जीवन प्राधिकरणाकडुन होणा-या चुकांची चर्चा करण्यात आली. तसेच या कामचुकार अधिका-यांची शाळा घेत सर्व अधिका-यांना नियोजनबध्द पध्दतीने काम करण्याची ताकिद देण्यात आली. या पुढे तसे न घडल्यास ही योजना हस्तांतरीत करण्याचा विचार केला जाईल असे आमदार कथोरे यांनी अधिका-यांना बजावले. 

    लोकमतमध्ये सोमवारी प्रसिध्द झालेल्या बातमीनंतर आमदार कथारे यांनी जीवन प्राधिकरणाचे अंबरनाथ आणि बदलापूरातील सर्व अधिका-यांसोबत बैठक आयोजित केली होती. जीवन प्राधिकरण पाणी वितरण व्यवस्थेतील त्रुटींना पाटबंधारे विभागालाही जबाबदार धरत असल्याने पाटबंधारे विभागाच्या अधिका-यांना देखील या बैठकीला बोलाविण्यात आले होते. अंबरनाथ आणि बदलापूर शहरासाठी 50 दशलक्ष लिटर्स पाणी उपलब्ध झालेले असले तरी त्याचे विरण करण्यात अनेक अडचणी येत आहेत. वितरण व्यवस्था सुधारण्यासाठीही अमृत योजनेच्या दुस-या टप्यात निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. मात्र असे असले तरी योजनेच्या कामानंतरही जीवन प्राधिकरण पाण्याचे योग्य नियोजन आणि वितरन करित नसल्याच्या तक्रारी समोर आले होते. पाण्याचे नियोजन करतांना आठवडय़ातुन एक दिवस पाणी पुरवठा बंद करण्याचे निर्देश पाटबंधारे विभागाने दिले आहे. त्याची अमलबजावणी करण्यात येत आहे. मात्र ते करित असतांना त्याचा त्रस हा नागरिकांना होत आहे. एक दिवस वितरण व्यवस्था बंद राहिल्यावर त्याचा फटका हा पुढे दोन दिवस सहन करावा लागत आहे. त्यामुळे वितरण व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या हेतुन आमदार कथोरे यांनी ही बैठक घेतली. या बैठकीला जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनिषा पालांडे ह्या देखील हजर होत्या. यावेळी कथोरे यांनी अस्तित्वातील सुरुअसलेल्या कामांचा आधावा घेतला. तसेच अमृत योजनेतुन सुरु असलेल्या कामांबाबत कथोरे यांनी नाराजी व्यक्त केली. अमृत योजनेचे काम करतांना मोठय़ा प्रमाणात विलंब होत असल्याच्या तक्रारी येत असल्याचे कथोरे यांनी स्पष्ट केले. अंबरनाथच्या बाबतीत देखील ठेकेदार कामचुकारपणा करित असल्याची बाब कथोरे यांनी अधिका-यांच्या निदर्शनास आणून दिली. कामाला विलंब करणा-या ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले. योजनेचे काम करतांना अस्तित्वातील लोकवस्तीचा विचार न करता भविष्यात निर्माण होणारी लोकवस्तीचा विचार करुन प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सुचना देण्यात आले. 

    अंबरनाथ आणि बदलापूरच्या पाणी वितरण व्यवस्थेबाबत माहिती घेतली असता जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता पालंडे यांनी पाणी गळतीचे प्रमाण ही डोकेदुखी असल्याचे स्पष्ट केले. तब्बल 37 टक्के पाणी गळती असल्याने पाणी तुटवडा त्यामुळे निर्माण होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. नवीन योजना झाल्यावर ही गळती कमी होईल अशी अपेक्षा होती. मात्र जुन्या वाहिन्या सुरुच राहिल्याने जळतीचे प्रमाण कमी होण्या ऐवजी वाढल्याचे समोर आले. यावर तोडगा काढण्याचे आदेश कथोरे यांनी दिले. 10 ते 15 दशलक्ष लिटर्स पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. मात्र जीवन प्राधिकरण 100 दशलक्ष लिटर्स पाणी उचलत असेल आणि त्यातील 4क् दशलक्ष लिटर्स पाणी हे वाया जात असेल तर ही मोठी समस्या आहे. ही सुधारण्याकडे लक्ष केद्रीत करण्याच्या सुचनाही दिल्या. 

    ठाणो जिल्ह्यात पाणी नाही अशी ओरड सर्वच नेते करित असतात. मात्र ते पाणी आणण्यासाठी लहान लहान धरणो बांधण्यासाठी कोणी पुढे सरसावत नाहीत. तालुक्यात आणि जिल्ह्यात लहान लहान धरणो उभारणो ही काळाची गरज आहे. मोठे धरणो उभारतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे लहान  धरणो हाच एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भविष्याचा विचार करतांना पाण्याचे स्त्रोत निर्माण करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. 

टॅग्स :Waterपाणीthaneठाणे