शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

उल्हासनगरातील समस्यांबाबत आमदार कुमार आयलानी आक्रमक, उपमुख्यमंत्र्यांना घातले साकडे

By सदानंद नाईक | Updated: August 12, 2022 18:49 IST

Ulhasnagar News: उल्हासनगर शहरातील धोकादायक इमारतीची पुनर्बांधणी, रस्त्याची दुरावस्था, पाणी टंचाई, डम्पिंग ग्राऊंड आदी समस्या वर्षोनुवर्षे सुटत नसेलतर, आमदार पदी का राहावे. अशी भूमिका कुमार आयलानी यांनी घेतली.

- सदानंद नाईकउल्हासनगर : शहरातील धोकादायक इमारतीची पुनर्बांधणी, रस्त्याची दुरावस्था, पाणी टंचाई, डम्पिंग ग्राऊंड आदी समस्या वर्षोनुवर्षे सुटत नसेलतर, आमदार पदी का राहावे. अशी भूमिका कुमार आयलानी यांनी घेतली. तसेच शहरातील समस्या बाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन देऊन समस्या सोडविण्याची मागणी केली आहे.

उल्हासनगरातील धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला असून इमारत पुनर्बांधणी बाबत गेल्या वर्षी राज्य शासनाने एक समिती गठीत केली. मात्र निर्णय विना समितीचा अहवाल मुख्यमंत्री यांच्या कार्यालयात धूळ खात पडल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. तसेच शहराच्या हद्दीतुन बारामाही वाहणारी उल्हास नदी असूनही महापालिका एमआयडीसीकडून पाणी विकत घेत आहे. पाणी बिला पोटी महापालिका वर्षाला ३५ कोटी खर्च करीत आहे. तसेच दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करूनही रस्त्याची दुरावस्था झाली. डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्नही असाच अडगळीत पडला आहे. शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही शहरातील समस्या सुटत नसेलतर, आमदार पदी म्हणून राहण्याचा हक्क आपल्याला नसल्याची भूमिका आमदार कुमार आयलानी यांनी घेतली. आयलानी यांच्या आक्रमक भूमिकेने खळबळ उडाली असून येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात आदी बाबत आवाज उठविणार असल्याची प्रतिक्रिया आयलानी यांनी पत्रकारांना दिली.

गेल्या वर्षी धोकादायक इमारतीचे स्लॅब कोसळून १२ जणांचा मृत्यू झाला. तर शेकडो नागरिक बेघर झाले. याबाबत समिती गठीत होऊनही निर्णय न झाल्याने, शहरात नाराजीचा सुरू निर्माण झाला. तसेच रस्त्याची दुरावस्था होऊनही राज्य शासन विशेष निधी देत नाही. डम्पिंग ग्राऊंड ओव्हरफ्लॉ झाल्यावरही उसाटणे येथील डम्पिंगचा प्रश्न गेल्या दोन वर्षापासून सुटत नसल्याची माहिती आमदार आयलानी यांनी पत्रकारांना दिली. आदी प्रमुख मागण्यासह अन्य मागण्याचे निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले असून या समस्या आमदार पदाच्या कालावधीत सुटत नसेलतर, आमदार पदी राहण्याचा हक्क नसल्याचे, आयलानी म्हणाले. आयलानी यांच्या भूमिकेला शहरवाशियानी पाठिंबा दिला. निर्वासितांचे शहर म्हणून दुर्लक्ष केले जात आहे. अशी भावना शहरवासीयांत निर्माण झाली आहे. 

 आयलानीच्या मागणीने शासनाकडे लक्षआमदार आयलानी यांनी प्रथमच आक्रमक भूमिका घेतल्याने, पाणी टंचाई, डम्पिंग, धोकादायक इमारती व रस्त्याची समस्या सुटणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले. पावसाळी अधिवेशनात आयलानी लक्षवेधी प्रश्नाद्वारे हे मूलभूत प्रश्न उचलणार आहेत.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरBJPभाजपाMLAआमदारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस