शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरातील समस्यांबाबत आमदार कुमार आयलानी आक्रमक, उपमुख्यमंत्र्यांना घातले साकडे

By सदानंद नाईक | Updated: August 12, 2022 18:49 IST

Ulhasnagar News: उल्हासनगर शहरातील धोकादायक इमारतीची पुनर्बांधणी, रस्त्याची दुरावस्था, पाणी टंचाई, डम्पिंग ग्राऊंड आदी समस्या वर्षोनुवर्षे सुटत नसेलतर, आमदार पदी का राहावे. अशी भूमिका कुमार आयलानी यांनी घेतली.

- सदानंद नाईकउल्हासनगर : शहरातील धोकादायक इमारतीची पुनर्बांधणी, रस्त्याची दुरावस्था, पाणी टंचाई, डम्पिंग ग्राऊंड आदी समस्या वर्षोनुवर्षे सुटत नसेलतर, आमदार पदी का राहावे. अशी भूमिका कुमार आयलानी यांनी घेतली. तसेच शहरातील समस्या बाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन देऊन समस्या सोडविण्याची मागणी केली आहे.

उल्हासनगरातील धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला असून इमारत पुनर्बांधणी बाबत गेल्या वर्षी राज्य शासनाने एक समिती गठीत केली. मात्र निर्णय विना समितीचा अहवाल मुख्यमंत्री यांच्या कार्यालयात धूळ खात पडल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. तसेच शहराच्या हद्दीतुन बारामाही वाहणारी उल्हास नदी असूनही महापालिका एमआयडीसीकडून पाणी विकत घेत आहे. पाणी बिला पोटी महापालिका वर्षाला ३५ कोटी खर्च करीत आहे. तसेच दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करूनही रस्त्याची दुरावस्था झाली. डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्नही असाच अडगळीत पडला आहे. शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही शहरातील समस्या सुटत नसेलतर, आमदार पदी म्हणून राहण्याचा हक्क आपल्याला नसल्याची भूमिका आमदार कुमार आयलानी यांनी घेतली. आयलानी यांच्या आक्रमक भूमिकेने खळबळ उडाली असून येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात आदी बाबत आवाज उठविणार असल्याची प्रतिक्रिया आयलानी यांनी पत्रकारांना दिली.

गेल्या वर्षी धोकादायक इमारतीचे स्लॅब कोसळून १२ जणांचा मृत्यू झाला. तर शेकडो नागरिक बेघर झाले. याबाबत समिती गठीत होऊनही निर्णय न झाल्याने, शहरात नाराजीचा सुरू निर्माण झाला. तसेच रस्त्याची दुरावस्था होऊनही राज्य शासन विशेष निधी देत नाही. डम्पिंग ग्राऊंड ओव्हरफ्लॉ झाल्यावरही उसाटणे येथील डम्पिंगचा प्रश्न गेल्या दोन वर्षापासून सुटत नसल्याची माहिती आमदार आयलानी यांनी पत्रकारांना दिली. आदी प्रमुख मागण्यासह अन्य मागण्याचे निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले असून या समस्या आमदार पदाच्या कालावधीत सुटत नसेलतर, आमदार पदी राहण्याचा हक्क नसल्याचे, आयलानी म्हणाले. आयलानी यांच्या भूमिकेला शहरवाशियानी पाठिंबा दिला. निर्वासितांचे शहर म्हणून दुर्लक्ष केले जात आहे. अशी भावना शहरवासीयांत निर्माण झाली आहे. 

 आयलानीच्या मागणीने शासनाकडे लक्षआमदार आयलानी यांनी प्रथमच आक्रमक भूमिका घेतल्याने, पाणी टंचाई, डम्पिंग, धोकादायक इमारती व रस्त्याची समस्या सुटणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले. पावसाळी अधिवेशनात आयलानी लक्षवेधी प्रश्नाद्वारे हे मूलभूत प्रश्न उचलणार आहेत.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरBJPभाजपाMLAआमदारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस