शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

मीरा रोड : शाळेवर कारवाई व्हावी या मागणीसाठी मुलांसहीत महिलेचं मनपा मुख्यालयाबाहेर धरणे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2017 14:47 IST

मुलांना शाळेत प्रवेश मिळावा तसेच शाळेवर कारवाई व्हावी म्हणुन आपल्या दोन्ही मुलांसह आज बुधवारी महापालिका मुख्यालया बाहेर पालक महिलेने धरणे धरले.

मीरा रोड - मुलांना शाळेत प्रवेश मिळावा तसेच शाळेवर कारवाई व्हावी म्हणून आपल्या दोन्ही मुलांसह  बुधवारी महापालिका मुख्यालयाबाहेर पालक महिलेने धरणे धरले. कम्युनिस्ट पक्षानेदेखील पालकास पाठिंबा दिला. तर शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव पाठवला असून सदर दोन्ही मुलांना अन्य शाळेत प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन उपायुक्त दीपक पुजारी यांनी दिल्यानंतर धरणं आंदोलन मागे घेतले.मीरा रोडच्या शितल नगरमधील कॉस्मोपोलिटीन शाळेत शिकणा-या निशाद शेख या महिलेच्या पहिली इयत्तेतील आसिफ व तिस-या इयत्तेतील आयशा या दोन मुलांना शाळेतून मनमानीपणे काढून टाकले होते. निशाद यांनी मनमानी शुल्क आकारणीबद्दल शाळेच्या व्यवस्थापना विरुद्ध पुढकार घेतल्याने दोघांमध्ये वाद होते. शाळेच्या फिर्यादीवरुन निशाद विरुद्ध मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हासुद्धा दाखल झाला.दरम्यान शाळा व पालक यांच्या वादात आसिफ व आयशा या दोन विद्यार्थ्यांना काढून टाकण्यात आल्याने संताप व्यक्त होत होता. निशाद यांनी बचाव समितीच्या माध्यमातून तक्रार केल्यानंतर उपसंचालक डॉ. बी.बी. चव्हाण यांनी दोन वेळा मुलांना प्रवेश द्या म्हणून पत्रं देऊन देखील शाळेने त्यास केराची टोपली दाखवली. तर प्रशासन अधिकारी सुरेश देशमुख यांनी देखील ठोस कार्यवाही केली नाही. लोकमत ने या बाबतचे वृत्त दिल्यावर आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी दखल घेत देशमुख यांना तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले.मुलांना शाळेत प्रवेश मिळावा तसेच शाळेवर कारवाई व्हावी, यासाठी  बुधवारी निशाद यांनी आपल्या दोन्ही मुलांसोबत पालिका मुख्यालया बाहेर धरणं धरलं. भारताचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानेदेखील निशाद यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत धरण्यात सहभाग घेतला. वकील किशोर सामंत यांनी पालिकेला पत्रं देऊन दोन्ही मुलांना शाळेत प्रवेश द्यावा, शाळेची मान्यत रद्द करावी व आरटीई कायद्याची शहरात सक्तीने अमलबजावणी व्हावी, अशी मागणी केली.दरम्यान आंदोलकांशी उपायुक्त दीपक पुजारी यांनी चर्चा केली. प्रशासन अधिकारी देशमुख कामानिमित्त बाहेर असून त्यांनी शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव पाठवलेला आहे. तसेच दोन्ही मुलांना अन्य शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी पालिका सहकार्य करेल, असे आश्वासन पुजारी यांनी दिले. गुरुवारी देशमुख आले की त्यांच्या सोबत एकत्र चर्चा करुन निर्णय घेऊ असे देखील पुजारी यांनी पालक व आंदोलकांना सांगितले. उपायुक्तांच्या आश्वासनानंतर धरणं आंदोलन मागे घेतल्याचे निशाद म्हणाल्या.

टॅग्स :Schoolशाळा