शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
5
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
6
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
7
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
8
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
9
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
10
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
11
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
12
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
13
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
14
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
15
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
16
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
17
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
18
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
19
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
20
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...

मीरा-भाईंदरचे पाणी भाजप आमदारामुळे ठाण्यातील विकासकाला दिल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 11:18 PM

ठामपाच्या महासभेत शिवसेना आक्रमक; प्रशासनाची हिरानंदानीवर मेहरनजर

ठाणे : एकीकडे मीरा-भाईंदर शहरांना पाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असताना या शहराचे पाणी ठाण्यातील हिरानंदानी बिल्डरच्या प्रकल्पाला दिले जात असल्याची गंभीर बाब बुधवारी झालेल्या महासभेत उघड झाली आहे. विशेष म्हणजे मीरा-भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता यांनी यासाठी पत्रव्यवहार केला असल्याचा धक्कादायक आरोप शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती यांनी बुधवारी ठामपाच्या सभागृहात केला.ठाणे महापालिकेने तर हिरानंदानीच्या भल्यासाठी चक्क सर्व्हिस रोडवरून जाणारी जलवाहिनी थेट त्यांच्या प्रकल्पातून नेल्याचे समोर आले आहे. एवढेच नव्हे तर त्यासाठी टॅबही मारल्याचे पालिकेने कबूल केले आहे. त्यामुळे हिरानंदानी बिल्डरवर एवढी कृपादृष्टी कशासाठी, असा सवाल सभागृह नेते नरेश म्हस्के, राष्टÑवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांच्यासह सर्वच सदस्यांनी केला. परंतु, यासंदर्भात प्रशासनाने केवळ उडवाउडवीचीच उत्तरे देण्यात धन्यता मानली.बुधवारी महासभा सुरू होताच, नगरसेविका अर्चना मणेरा यांनी हिरानंदानी पार्कबाबत प्रश्नोत्तरे विचारली होती. यावेळी त्यांनी हिरानंदानीने आधी पार्क व रस्ता विकसित करणे अपेक्षित असतानाही ते केले नसल्याचा आरोप मणेरा यांनी केला. यावर सध्या विकसनाचे काम सुरूअसल्याने टप्प्याटप्प्याने ते केले जाईल, असे उत्तर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिले. तर, औद्योगिक विभागातून रहिवास विभागात रूपांतर करताना त्या भूखंडातून महापालिकेला सुविधा भूखंड मिळणे अपेक्षित होते. तो मिळालेला नसल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. परंतु, यावरही प्रशासनाने चालढकल केली.नरेंद्र मेहतांनी दिले पत्र : विशेष म्हणजे, टाउनशिप उभारताना महापालिकेची त्या ठिकाणी असलेली आरक्षणे विकसित करणे अपेक्षित आहे. त्यातील किती आरक्षणे विकसित झाली, असा सवाल सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी केला. परंतु, त्याचेही उत्तर पालिकेला देता आले नाही. त्यातही याठिकाणाहून जी जलवाहिनी टाकली आहे, ती विकासकाच्या प्रकल्पातून का फिरवली, असा सवालही त्यांनी केला. त्यातही, ती मीरा-भार्इंदर महापालिकेची लाइन असताना ठाणे महापालिकेने त्याला कनेक्शन कसे दिले, असा सवालही म्हस्के यांनी केला.यावर पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी अर्जुन अहिरे यांनी याबाबत मीरा-भार्इंदर महापालिकेशी सल्लामसलत केल्यानंतरच त्या वाहिनीवर टॅब मारला असून अद्याप कनेक्शन सुरू केले नसल्याचेही स्पष्ट केले. हा गोंधळ सुरू असतानाच शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती यांनी मीरा-भार्इंदरचे भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी यासंदर्भात पत्र दिले असल्याचा धक्कादायक आरोप केला. त्यामुळे या प्रकरणाला आणखी वेगळे वळण लागले.ओसी नसतानाही जाहिराती दुसरीकडे विकासकाला ओसी देण्यात आली आहे का, असा सवालही म्हस्के यांनी उपस्थित केला. यावर शहर विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी पार्ट ओसी दिली असल्याची माहिती दिली.पार्ट ओसी दिली असताना त्याने ओसी मिळाल्याच्या जाहिराती लावल्या कशा, ही ग्राहकांची फसवणूक नाही का? असा उलट सवालही त्यांनी केला. परंतु, याचेही उत्तर पालिका प्रशासनाला योग्य पद्धतीने देता आले नाही. त्यामुळे अखेर सभागृहातील सदस्यांनीच पालिकेच्या या चुकीच्या कारभाराला कंटाळून हा विषय आटोपता घेतला.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरBJPभाजपा