शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

मीरा-भाईंदरचे पाणी भाजप आमदारामुळे ठाण्यातील विकासकाला दिल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 23:18 IST

ठामपाच्या महासभेत शिवसेना आक्रमक; प्रशासनाची हिरानंदानीवर मेहरनजर

ठाणे : एकीकडे मीरा-भाईंदर शहरांना पाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असताना या शहराचे पाणी ठाण्यातील हिरानंदानी बिल्डरच्या प्रकल्पाला दिले जात असल्याची गंभीर बाब बुधवारी झालेल्या महासभेत उघड झाली आहे. विशेष म्हणजे मीरा-भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता यांनी यासाठी पत्रव्यवहार केला असल्याचा धक्कादायक आरोप शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती यांनी बुधवारी ठामपाच्या सभागृहात केला.ठाणे महापालिकेने तर हिरानंदानीच्या भल्यासाठी चक्क सर्व्हिस रोडवरून जाणारी जलवाहिनी थेट त्यांच्या प्रकल्पातून नेल्याचे समोर आले आहे. एवढेच नव्हे तर त्यासाठी टॅबही मारल्याचे पालिकेने कबूल केले आहे. त्यामुळे हिरानंदानी बिल्डरवर एवढी कृपादृष्टी कशासाठी, असा सवाल सभागृह नेते नरेश म्हस्के, राष्टÑवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांच्यासह सर्वच सदस्यांनी केला. परंतु, यासंदर्भात प्रशासनाने केवळ उडवाउडवीचीच उत्तरे देण्यात धन्यता मानली.बुधवारी महासभा सुरू होताच, नगरसेविका अर्चना मणेरा यांनी हिरानंदानी पार्कबाबत प्रश्नोत्तरे विचारली होती. यावेळी त्यांनी हिरानंदानीने आधी पार्क व रस्ता विकसित करणे अपेक्षित असतानाही ते केले नसल्याचा आरोप मणेरा यांनी केला. यावर सध्या विकसनाचे काम सुरूअसल्याने टप्प्याटप्प्याने ते केले जाईल, असे उत्तर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिले. तर, औद्योगिक विभागातून रहिवास विभागात रूपांतर करताना त्या भूखंडातून महापालिकेला सुविधा भूखंड मिळणे अपेक्षित होते. तो मिळालेला नसल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. परंतु, यावरही प्रशासनाने चालढकल केली.नरेंद्र मेहतांनी दिले पत्र : विशेष म्हणजे, टाउनशिप उभारताना महापालिकेची त्या ठिकाणी असलेली आरक्षणे विकसित करणे अपेक्षित आहे. त्यातील किती आरक्षणे विकसित झाली, असा सवाल सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी केला. परंतु, त्याचेही उत्तर पालिकेला देता आले नाही. त्यातही याठिकाणाहून जी जलवाहिनी टाकली आहे, ती विकासकाच्या प्रकल्पातून का फिरवली, असा सवालही त्यांनी केला. त्यातही, ती मीरा-भार्इंदर महापालिकेची लाइन असताना ठाणे महापालिकेने त्याला कनेक्शन कसे दिले, असा सवालही म्हस्के यांनी केला.यावर पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी अर्जुन अहिरे यांनी याबाबत मीरा-भार्इंदर महापालिकेशी सल्लामसलत केल्यानंतरच त्या वाहिनीवर टॅब मारला असून अद्याप कनेक्शन सुरू केले नसल्याचेही स्पष्ट केले. हा गोंधळ सुरू असतानाच शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती यांनी मीरा-भार्इंदरचे भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी यासंदर्भात पत्र दिले असल्याचा धक्कादायक आरोप केला. त्यामुळे या प्रकरणाला आणखी वेगळे वळण लागले.ओसी नसतानाही जाहिराती दुसरीकडे विकासकाला ओसी देण्यात आली आहे का, असा सवालही म्हस्के यांनी उपस्थित केला. यावर शहर विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी पार्ट ओसी दिली असल्याची माहिती दिली.पार्ट ओसी दिली असताना त्याने ओसी मिळाल्याच्या जाहिराती लावल्या कशा, ही ग्राहकांची फसवणूक नाही का? असा उलट सवालही त्यांनी केला. परंतु, याचेही उत्तर पालिका प्रशासनाला योग्य पद्धतीने देता आले नाही. त्यामुळे अखेर सभागृहातील सदस्यांनीच पालिकेच्या या चुकीच्या कारभाराला कंटाळून हा विषय आटोपता घेतला.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरBJPभाजपा