शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2
झालं... युपीआय बॅलन्स चेकवर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
3
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
4
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
5
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
6
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
7
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
8
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
9
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
10
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
11
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
12
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
13
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
14
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
15
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
16
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
17
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
18
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
19
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय

मीरा भाईंदरकरांना नोव्हेंबरपर्यंत सूर्याचे पाणी मिळण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 20:03 IST

सूर्याचे अतिरिक्त पाणी ठाणे शहराला द्या

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड- पालघरच्या सूर्या धरणाचे पाणी मीरा भाईंदरकरांना नोव्हेम्बर पासून २४ तास मिळेल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. ठाणे शहरातील पाणी टंचाई पाहता सूर्याचे अतिरिक्त पाणी ठाणे शहराला देण्याची मागणी करतानाच मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री या बाबत निर्णय घेतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

सूर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा आढावा मंत्री सरनाईक यांनी बुधवारी पालघर येथील पाहणी दरम्यान घेतला. यावेळी माजी आमदार रवींद्र फाटक सह एमएमआरडीए व सूर्या योजने सह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.  सूर्या धरणातून वसई विरार महापालिकेला १७० दशलक्ष तर पालघर जिल्ह्यातील ४४ गावांना सुरळीत पाणीपुरवठा केला जातो. मीरा भाईंदर शहरासाठी २१८ दशलक्ष लिटर पाणी मंजूर असले तरी गेली काही वर्ष रेंगाळलेल्या या प्रकल्पामुळे मीरा भाईंदरकरांना सूर्याचे पाणी मिळू शकलेले नाही. 

सूर्या योजनेसाठी सातत्याने पाठपुरावा करत आलो असून आता राज्याचा मंत्री या नात्याने माझी जबाबदारी वाढलेली आहे. त्यामुळे लवकर हा प्रकल्प पूर्ण करून मीरा भाईंदर वासीयांना २४ तास शुध्द पाणी पुरवठा करण्यायास आपले प्राधान्य आहे. पाठपुरावा केल्याने या योजनेचे तांत्रिक काम जवळजवळ पूर्ण झाले असून उर्वरित ३० टक्के काम येत्या ६ महिन्यात पूर्ण होईल असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले असल्याची माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली. 

वसई काशिद कोपर ते चेणे जलकुंभापर्यंत सुमारे ५ किलोमीटर लांबीच्या जलवाहिनीचे काम ,वसई खाडी छेदून मायक्रो टनेलिंग  द्वारे जलवाहिनी टाकण्याचे काम, कवडास येथील १३२ केव्ही उच्च दाब विद्युत वाहिनीचे काम, चेणे  वनविभागाच्या हद्दीतील जलवाहिनि व  खासगी जागेतील पुलाचे काम ,जलकुभांचे काम  या सर्व रखडलेल्या कामाचा आढावा मंत्री सरनाईक यांनी घेतला. सूर्याच्या पाण्यासाठी तारीख पे तारीख चालले असून या बाबत पुढील महिन्यात मंत्रालयात बैठक घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक