शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

मीरा भाईंदरकरांना नोव्हेंबरपर्यंत सूर्याचे पाणी मिळण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 20:03 IST

सूर्याचे अतिरिक्त पाणी ठाणे शहराला द्या

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड- पालघरच्या सूर्या धरणाचे पाणी मीरा भाईंदरकरांना नोव्हेम्बर पासून २४ तास मिळेल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. ठाणे शहरातील पाणी टंचाई पाहता सूर्याचे अतिरिक्त पाणी ठाणे शहराला देण्याची मागणी करतानाच मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री या बाबत निर्णय घेतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

सूर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा आढावा मंत्री सरनाईक यांनी बुधवारी पालघर येथील पाहणी दरम्यान घेतला. यावेळी माजी आमदार रवींद्र फाटक सह एमएमआरडीए व सूर्या योजने सह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.  सूर्या धरणातून वसई विरार महापालिकेला १७० दशलक्ष तर पालघर जिल्ह्यातील ४४ गावांना सुरळीत पाणीपुरवठा केला जातो. मीरा भाईंदर शहरासाठी २१८ दशलक्ष लिटर पाणी मंजूर असले तरी गेली काही वर्ष रेंगाळलेल्या या प्रकल्पामुळे मीरा भाईंदरकरांना सूर्याचे पाणी मिळू शकलेले नाही. 

सूर्या योजनेसाठी सातत्याने पाठपुरावा करत आलो असून आता राज्याचा मंत्री या नात्याने माझी जबाबदारी वाढलेली आहे. त्यामुळे लवकर हा प्रकल्प पूर्ण करून मीरा भाईंदर वासीयांना २४ तास शुध्द पाणी पुरवठा करण्यायास आपले प्राधान्य आहे. पाठपुरावा केल्याने या योजनेचे तांत्रिक काम जवळजवळ पूर्ण झाले असून उर्वरित ३० टक्के काम येत्या ६ महिन्यात पूर्ण होईल असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले असल्याची माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली. 

वसई काशिद कोपर ते चेणे जलकुंभापर्यंत सुमारे ५ किलोमीटर लांबीच्या जलवाहिनीचे काम ,वसई खाडी छेदून मायक्रो टनेलिंग  द्वारे जलवाहिनी टाकण्याचे काम, कवडास येथील १३२ केव्ही उच्च दाब विद्युत वाहिनीचे काम, चेणे  वनविभागाच्या हद्दीतील जलवाहिनि व  खासगी जागेतील पुलाचे काम ,जलकुभांचे काम  या सर्व रखडलेल्या कामाचा आढावा मंत्री सरनाईक यांनी घेतला. सूर्याच्या पाण्यासाठी तारीख पे तारीख चालले असून या बाबत पुढील महिन्यात मंत्रालयात बैठक घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक