शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
2
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
3
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
4
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
5
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
6
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
7
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
8
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
9
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
10
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
11
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
12
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
13
Video - लेकीच्या जन्मानंतर बाबांचा आनंद गगनात मावेना; ‘धुरंधर’ स्टाईलमध्ये केला भन्नाट डान्स
14
पळपुट्या विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल
15
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
16
अखेर BCCIने मान्य केली चूक, आता बदल होणार! पुढील ३१ दिवसांसाठी घेतला जाणार मोठा निर्णय
17
१५०० लोकसंख्येच्या गावात २७ हजार जन्मांची नोंद! यवतमाळमध्ये 'बर्थ सर्टिफिकेट'चा महाघोटाळा; मुंबई कनेक्शन उघड
18
द मुरुड फाईल्स! शिंदेसेना अन् काँग्रेसची पुन्हा एकदा हातमिळवणी, “आम्ही एकत्र आलोय ते...”
19
राखी सावंत पुन्हा रचणार स्वयंवर? सेलिब्रिटींना नाही तर राजकारण्यांना देणार आमंत्रण
20
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
Daily Top 2Weekly Top 5

मीरा भाईंदरकरांना नोव्हेंबरपर्यंत सूर्याचे पाणी मिळण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 20:03 IST

सूर्याचे अतिरिक्त पाणी ठाणे शहराला द्या

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड- पालघरच्या सूर्या धरणाचे पाणी मीरा भाईंदरकरांना नोव्हेम्बर पासून २४ तास मिळेल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. ठाणे शहरातील पाणी टंचाई पाहता सूर्याचे अतिरिक्त पाणी ठाणे शहराला देण्याची मागणी करतानाच मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री या बाबत निर्णय घेतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

सूर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा आढावा मंत्री सरनाईक यांनी बुधवारी पालघर येथील पाहणी दरम्यान घेतला. यावेळी माजी आमदार रवींद्र फाटक सह एमएमआरडीए व सूर्या योजने सह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.  सूर्या धरणातून वसई विरार महापालिकेला १७० दशलक्ष तर पालघर जिल्ह्यातील ४४ गावांना सुरळीत पाणीपुरवठा केला जातो. मीरा भाईंदर शहरासाठी २१८ दशलक्ष लिटर पाणी मंजूर असले तरी गेली काही वर्ष रेंगाळलेल्या या प्रकल्पामुळे मीरा भाईंदरकरांना सूर्याचे पाणी मिळू शकलेले नाही. 

सूर्या योजनेसाठी सातत्याने पाठपुरावा करत आलो असून आता राज्याचा मंत्री या नात्याने माझी जबाबदारी वाढलेली आहे. त्यामुळे लवकर हा प्रकल्प पूर्ण करून मीरा भाईंदर वासीयांना २४ तास शुध्द पाणी पुरवठा करण्यायास आपले प्राधान्य आहे. पाठपुरावा केल्याने या योजनेचे तांत्रिक काम जवळजवळ पूर्ण झाले असून उर्वरित ३० टक्के काम येत्या ६ महिन्यात पूर्ण होईल असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले असल्याची माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली. 

वसई काशिद कोपर ते चेणे जलकुंभापर्यंत सुमारे ५ किलोमीटर लांबीच्या जलवाहिनीचे काम ,वसई खाडी छेदून मायक्रो टनेलिंग  द्वारे जलवाहिनी टाकण्याचे काम, कवडास येथील १३२ केव्ही उच्च दाब विद्युत वाहिनीचे काम, चेणे  वनविभागाच्या हद्दीतील जलवाहिनि व  खासगी जागेतील पुलाचे काम ,जलकुभांचे काम  या सर्व रखडलेल्या कामाचा आढावा मंत्री सरनाईक यांनी घेतला. सूर्याच्या पाण्यासाठी तारीख पे तारीख चालले असून या बाबत पुढील महिन्यात मंत्रालयात बैठक घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक