शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

मीरा-भाईंदर मनपाला कायमस्वरुपी उत्पन्न स्त्रोताचा पर्याय शोधणार, नवनियुक्त आयुक्त उत्पन्नवाढीसाठी प्रयत्नशील

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2018 16:33 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेसाठी कायमस्वरुपी नवीन उत्पन्न स्त्रोत निर्माण करण्याकरीता प्रयत्न करण्यात येणार असल्याचे पालिकेत नव्याने रुजू झालेले आयुक्त बी. जी. पवार यांनी 'लोकमत'शी संवाद साधताना सांगितले.

राजू काळे/भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेसाठी कायमस्वरुपी नवीन उत्पन्न स्त्रोत निर्माण करण्याकरीता प्रयत्न करण्यात येणार असल्याचे पालिकेत नव्याने रुजू झालेले आयुक्त बी. जी. पवार यांनी 'लोकमत'शी संवाद साधताना सांगितले. आयुक्तपदाचा कार्यभार ९ फेब्रुवारीला स्वीकारताच त्यांनी सर्व विभागप्रमुखांशी चर्चा करीत त्यांच्या कार्याचा आढावा घेतला. पालिकेत गेल्या सहा वर्षांत पवार हे सहावे आयुक्त ठरले असून राजकीय षड्यंत्राला बळी पडणारे आयुक्त म्हणून मीरा-भार्इंदर महापालिकेची ओळख सध्या निर्माण झाली आहे.

त्यामुळे आयुक्तपदावर नव्याने रुजू झालेले पवार यांना निवृत्त होण्यास ३ वर्षांचा कालावधी बाकी आहे. त्यामुळे या पालिकेत ते कितीवेळ कार्यरत राहणार, हा प्रश्नदेखील त्यांनीच बोलून दाखविला. यावरुन येथील राजकारणात त्यांचाही बळी जाईल का, असा प्रश्न आतापासूनच उपस्थित होऊ लागला आहे. निवृत्तीच्या आधी त्यांची जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती होणार असल्याचे संकेत देण्यात येत असले तरी आयुक्तपदाच्या कार्यकाळात मात्र त्यांनी पालिकेत चांगली कामे करण्याचा मानस व्यक्त केला आहे. पालिकेच्या मर्यादित उत्पन्नात सत्ताधा-यांची आकडेवारी वारेमाप उसळत असल्याने दरवर्षीचे अंदाजपत्रक दुप्पटीने वाढते. याचा अंदाज आयुक्तांना असल्याने त्यांनी केवळ करवाढ ही पालिकेच्या उत्पन्नाचा कायमस्वरुपी स्त्रोत नसल्याचे मान्य केले. पालिकेला कायमस्वरुपी उत्पन्न मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

यात पालिकेच्या मालकीच्या मोकळ्या जागा बाजारभावाने भाडेतत्त्वावर देण्याचे त्यांनी बोलून दाखविले. हा कायमस्वरुपी उत्पन्नस्त्रोत असून त्याचा आढावा लवकरच घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. २०१७-१८ या चालू वर्षाचे अंदाजपत्रक देखील सत्ताधा-यांच्या  प्रयत्नाने सुमारे १५०० कोटींवर पोहोचले आहे. वास्तविक पालिकेचे मूळ वार्षिक उत्पन्न सुमारे ४५० कोटींचे आहे. शहरातील विविध विकासकामांसाठी राज्य व केंद्र सरकारकडून सुमारे २५० ते ३०० कोटींचे अनुदान पालिकेला मिळण्याची शक्यता असल्याने ते उत्पन्नात समाविष्ट केले गेले. यामुळे पालिकेच्या अंदाजपत्रकातील उत्पन्न ७०० ते ७५० कोटींचे दाखविण्यात आले असले तरी यातील महत्त्वांचे उत्पन्न स्त्रोत असलेले मालमत्ता कर व पाणीपट्टी अनेकदा दरवर्षी १०० टक्के वसूल केली जात नाही.

पाणीपट्टी ओढूनताणून सुमारे ९० ते ९५ टक्यांपर्यंत पोहोचले तर मालमत्ता कर वर्षअखेरीस सुमारे किमान ५० ते ५५ टक्यांपर्यंत वसूल केला जातो. या बेताच्या वसुलीमुळे पालिकेच्या उत्पन्नावर परिणाम होतो. परिणामी शहरातील विकासकामांवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. यंदा तर पालिकेची वसुली अपेक्षित झाली नसल्याने विकासकामांच्या पूर्ततेसाठी प्रशासनाला राजकीय दबावामुळे पालिकेला १ हजार कोटींचा राखीव निधी वापरावा लागला आहे. हि वेळ पुढेही कायम राहिल्यास अद्याप ‘ड’ वर्गातील आर्थिक परिस्थिती चांगली राहिलेल्या या पालिकेचा आर्थिक डामडौल कोलमडून पडणार आहे. त्यामुळे अस्तित्वातील कर वसुलीच्या महत्त्वपूर्ण उत्पन्नाला कायमस्वरुपी उत्पन्नस्त्रोताची जोड दिल्यास पालिकेची आर्थिकस्थिती चांगली राहणार असल्याचे संकेत नवनियुक्त आयुक्तांनी दिले आहेत. मात्र त्यावर विभागप्रमुखांसोबत चर्चा करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक