शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
3
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
4
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
7
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
8
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
9
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
10
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
11
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
12
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
13
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
14
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
15
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
16
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
17
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
18
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
19
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
20
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयात तब्बल ४४ टक्के अधिकारी, कर्मचारी वर्गाची कमतरता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 11:52 IST

Mira Bhayander - Vasai Virar Police News : ४ महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयात ४४ टक्के इतके पोलीस मनुष्यबळ कमी असल्याची माहिती राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी दिली आहे .

मीरारोड - ४ महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयात ४४ टक्के इतके पोलीस मनुष्यबळ कमी असल्याची माहिती राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी दिली आहे . आयुक्तालय सुरु करण्यात खूप अडचणी असताना देखील आयुक्त सदानंद दाते यांनी गेल्या चार महिन्यात आयुक्तालय उत्तम रित्या सांभाळत चांगली घडी बसवली असल्याचे नगराळे म्हणाले .१ ऑक्टोबर २०२० रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मीरा भाईंदर व वसई विरार पोलीस आयुक्तालयचे उदघाटन करण्यात आले होते. आयुक्तालयाच्या पहिल्या पोलीस आयुक्त पदी ज्येष्ठ सनदी अधिकारी सदानंद दाते यांची नियुक्ती करण्यात आली. अपुरे मनुष्यबळ , आयुक्तालय व नवीन पोलीस ठाणी , नवीन कार्यालये आदींसाठी लागणाऱ्या मूलभूत सुविधा पुरेशा नसताना देखील दाते यांनी आयुक्तालयाची घडी यशस्वी रित्या बसवण्यास घेतली आहे . नागरिकांच्या आयुक्तालया बद्दल असलेल्या अपेक्षा प्रमाणे कामकाज करून घेण्याचा प्रयत्न दाते यांनी चालवला आहे .पोलीस आयुक्तालय झाले तरी मीरारोडच्या राम नगर येथील मुख्यालयाच्या इमारतीत नियंत्रण कक्ष व आयुक्तालयाचे संकेत स्थळ तयार करण्याचे काम सुरु होते . सोमवारी त्याचे उदघाटन महासंचालकांनी केले . आधुनिक नियंत्रण कक्ष असून जीपीएस यंत्रणे मुळे घटनास्थळी तात्काळ पोलीस मदत पाठवण्यास मदत होणार आहे.नगराळे म्हणाले कि , कोणतेही पोलीस ठाणे चालवण्यासाठी कर्मचारी अधिकारी हवेत. आपल्या ह्या नव्या आयुक्तालयात ४४ टक्के कर्मचारी - अधिकारी कमी आहेत . रिक्त जागा जास्त आहेत . हि कमी भरून काढण्यासाठी सध्या ठाणे ग्रामीण व पालघर ग्रामीण मधून पोलीस बळ घेण्यासाठी अपर पोलीस आयुक्त एस. जयकुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे . समिती महिन्या भारत कार्यवाही पूर्ण करेल . तसेच भरती किंवा बदलीने येणारे इच्छुक असतील त्यांना सुद्धा प्राधान्याने सामावून घेऊ.राज्यात पोलिसांची २० हजार पदे रिक्त आहेत . ती भरण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत . त्यात काही तांत्रिक अडचणी व न्याय प्रविष्ठ प्रकरण आहेत . पण लवकरच भरती पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे . नवीन आयुक्तालय , युनिट सुरु करताना नवीन कार्यालये - पोलीस ठाणे साठी जागा , अधिकाऱ्यांना बसण्यास जागा , मनुष्य बळ अश्या बऱ्याच अडचणी असतात .आयुक्त सदानंद दाते यांनि गेल्या ४ महिन्यात आयुक्तालयाची चांगली प्रगती केली आहे . जोमाने काम सुरु आहे . आयुक्तालयाची सर्वच प्रक्रिया कार्यान्वित होईल . नवीन पोलीस ठाणी सुरु करण्याची तयारी सुरु आहे . आता पर्यंत काय काम झाले आहे याच आढावा आणि काय अडचणी आहे हे समजून घेण्यासाठी आलो आहे . महासंचालक कार्यालया कडून किंवा गृह विभागाच्या स्तरावर जास्तीत जास्त मदत लागेल ती लवकर देऊ असे नगराळे म्हणाले .

टॅग्स :PoliceपोलिसMira Bhayanderमीरा-भाईंदरVasai Virarवसई विरार