शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय, डायल ११२ तत्परतेत राज्यात सर्वप्रथम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2024 15:05 IST

Mira Bhayander News: नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी, कुठलीही घटना घडल्यास पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचावेत, यासाठी मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाची डायल ११२ ही यंत्रणा जानेवारी महिन्यात राज्यात अव्वल आली आहे.

- मंगेश कराळे नालासोपारा - नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी, कुठलीही घटना घडल्यास पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचावेत, यासाठी मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाची डायल ११२ ही यंत्रणा जानेवारी महिन्यात राज्यात अव्वल आली आहे. जानेवारी २०२४ मध्ये पोलीस आयुक्तालय हे नागरिकांना पोलीस मदत पोहचिवण्यात संपुर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आले आहे. नियंत्रण कक्षात ६ अधिकारी, २४ कर्मचारी २४ तास ऑन ड्यूटी पोलीस आयुक्तालयाच्या कार्यालयात असलेल्या नियंत्रण कक्षात कार्यरत असतात.

सर्वसामान्य नागरीकांनी पोलीस मदतीकरीता डायल ११२ वर केलेल्या कॉलला नव्या व आधुनिक सुविधेमुळे अतिशय कमी वेळात पोलीस मदत मिळण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. त्यानुसार जानेवारी २०२४ मध्ये पोलीस आयुक्तालयातील १७ पोलीस ठाण्यापैकी नालासोपारा पोलीस ठाणे नागरीकांना मदत पोहचविण्यात प्रथम क्रमांकावर आलेले असून त्यांचा वेळ १ मिनिटे ३४ सेकंद असा आला आहे. तर आयुक्तालयाचा सरासरी वेळ २ मिनिटे ३७ सेकंद आहे. तसेच यापुढेही पोलीस आयुक्तालयातील नागरीकांना तात्काळ पोलीस मदत पोहचिवण्यासाठी प्रयत्नशील राहील असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

आयुक्तालयातील पोलीस नियंत्रण कक्षास, नागरीकांकडून दररोज सरासरी २०० ते २२० तर महिनाभरात एकूण ६३०५ तक्रारींचे कॉल प्राप्त झाले आहेत. त्याकरीता पोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांनी कमीत कमी वेळात नागरीकांना पोलीसांचा दर्जेदार प्रतिसाद मिळेल यादृष्टीने मार्गदर्शन केले. सर्व बिट मार्शल व पीसीआर वाहनांवरील स्टाफ यांना समुपदेशन करून नागरीकांच्या प्रति संवेदनशिलता वाढविणेकरीता आवश्यक ते प्रशिक्षण दिले गेले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नियंत्रण कक्षामार्फत रोजच्या रोज याबाबत आढावा घेऊन प्रतिसाद वेळ जास्त देणाऱ्या संबंधित पोलीस अधिकारी व अंमलदारांना आवश्यक ते व्यक्तीगत मार्गदर्शन केले जाते.

पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षात डायल ११२ यंत्रणेला काही वाहने व प्रशिक्षित अधिकारी, कर्मचारीही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. इमर्जन्सी रिस्पॉन्स सपोर्ट सिस्टिम अंतर्गत तत्काळ पोलिस मदत देण्यासाठी सुरू करण्यात आलेली डायल ११२ योजना आयुक्तालयातील लोकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरPoliceपोलिस