शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

मीरा भाईंदर महापालिकेच्या परिवहन ठेक्यावरील कर्मचाऱ्यांचे 5 महिन्यांपासून पगार नसल्याने धरणे आंदोलन  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 19:34 IST

मीरा भाईंदर महापालिकेच्या परिवहन ठेक्या वरील बहुतांश कर्मचाऱ्यांना गेल्या 5 महिन्या पासून पगार दिला नाही म्हणून त्यांनी आज महापालिका मुख्यालयात आयुक्त व महापौर दालना बाहेर धरणे आंदोलन केले .

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या परिवहन ठेक्या वरील बहुतांश कर्मचाऱ्यांना गेल्या 5 महिन्या पासून पगार दिला नाही म्हणून त्यांनी आज महापालिका मुख्यालयात आयुक्त व महापौर दालना बाहेर धरणे आंदोलन केले . तर आमच्या पोटाला चिमटा काढणाऱ्या ठेकेदाराला काढून टाका. बससेवा आम्ही कर्मचारीच पूर्वी सारखी चालवू अशी मागणी देखील कर्मचाऱ्यांनी केली .मीरा भाईंदर महापालिकेने परिवहन सेवा चालवण्यासाठी मेसर्स भागीरथी या ठेकेदारास ठेका दिला आहे . सदर ठेक्यात बस चालक , वाहक व अन्य असे मिळून सुमारे 430 कर्मचारी कार्यरत आहेत. ठेकेदार नवीन असल्या तरी बहुतांश कर्मचारी हे गेल्या 10 ते 15 वर्षां पासून परिवहन उपक्रमात कार्यरत आहेत.मार्च अखेरीस कोरोना संसर्गाचा मुळे परिवहन सेवा बंद करण्यात आली . त्या नंतर पालिकेतील कर्मचाऱ्यांना ने - आण करणे तसेच कोरोना संसर्गा मुळे मूळ गावी जाऊ इच्छिणाऱ्या लोकांना वसई रेल्वे स्थानका पर्यंत सोडण्यासाठी बस सेवेचा वापर केला गेला . त्यासाठी ठेकेदाराने ठराविक कर्मचारी कामावर ठेवले होते व त्यांना पगार दिला .परंतु बहुतांश कर्मचाऱ्यांना कामावर बोलावले नाही म्हणून त्यांना मात्र पगार दिला गेला नाही . तर आम्हाला देखील कामावर बोलवा तसेच मार्च पासून चा पगार द्या अशी मागणी कर्मचाऱ्यां कडून सातत्याने केली जात होती . पालिका प्रशासना कडून देखील आश्वासन दिले जात होते .पण मार्च पासून आज 5 महिने झाले तरी कर्मचाऱ्यांना पगार न दिल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी महापालिका मुख्यालयात आयुक्त दालना बाहेर धरणे धरले . आमदार गीता जैन यांनी आयुक्त डॉ . विजय राठोड यांच्या सोबत चर्चा केली असता तेथे ठेकेदार पण उपस्थित होता . महापालिकेने आपणास पैसे दिल्यास पगार देऊ असा पवित्र ठेकेदाराने कायम ठेवला .यावेळी कर्मचाऱ्यांनी आपल्या व्यथा मांडत घरची झालेली हलाखीची स्थिती कथन केली . उसने मागून घर चालवत असून भाडे भरले नाही म्हणून घर रिकामे करण्याची पाळी आल्याचे एका कर्मचाऱ्याने सांगितले . आधीच ठेकेदाराने विविध भत्ते आदी दिले नसून विशिष्ट मर्जीतील कर्मचाऱ्यांनाच कामावर घेऊन त्यांना लॉक डाऊन काळात काम दिले गेले पण अन्य कर्मचाऱ्यांना विशिष्ट हेतूने काम देण्या पासून डावलण्यात आल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला .

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMira Bhayanderमीरा-भाईंदर