शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मीरा भाईंदर महापालिकेच्या परिवहन ठेक्यावरील कर्मचाऱ्यांचे 5 महिन्यांपासून पगार नसल्याने धरणे आंदोलन  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 19:34 IST

मीरा भाईंदर महापालिकेच्या परिवहन ठेक्या वरील बहुतांश कर्मचाऱ्यांना गेल्या 5 महिन्या पासून पगार दिला नाही म्हणून त्यांनी आज महापालिका मुख्यालयात आयुक्त व महापौर दालना बाहेर धरणे आंदोलन केले .

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या परिवहन ठेक्या वरील बहुतांश कर्मचाऱ्यांना गेल्या 5 महिन्या पासून पगार दिला नाही म्हणून त्यांनी आज महापालिका मुख्यालयात आयुक्त व महापौर दालना बाहेर धरणे आंदोलन केले . तर आमच्या पोटाला चिमटा काढणाऱ्या ठेकेदाराला काढून टाका. बससेवा आम्ही कर्मचारीच पूर्वी सारखी चालवू अशी मागणी देखील कर्मचाऱ्यांनी केली .मीरा भाईंदर महापालिकेने परिवहन सेवा चालवण्यासाठी मेसर्स भागीरथी या ठेकेदारास ठेका दिला आहे . सदर ठेक्यात बस चालक , वाहक व अन्य असे मिळून सुमारे 430 कर्मचारी कार्यरत आहेत. ठेकेदार नवीन असल्या तरी बहुतांश कर्मचारी हे गेल्या 10 ते 15 वर्षां पासून परिवहन उपक्रमात कार्यरत आहेत.मार्च अखेरीस कोरोना संसर्गाचा मुळे परिवहन सेवा बंद करण्यात आली . त्या नंतर पालिकेतील कर्मचाऱ्यांना ने - आण करणे तसेच कोरोना संसर्गा मुळे मूळ गावी जाऊ इच्छिणाऱ्या लोकांना वसई रेल्वे स्थानका पर्यंत सोडण्यासाठी बस सेवेचा वापर केला गेला . त्यासाठी ठेकेदाराने ठराविक कर्मचारी कामावर ठेवले होते व त्यांना पगार दिला .परंतु बहुतांश कर्मचाऱ्यांना कामावर बोलावले नाही म्हणून त्यांना मात्र पगार दिला गेला नाही . तर आम्हाला देखील कामावर बोलवा तसेच मार्च पासून चा पगार द्या अशी मागणी कर्मचाऱ्यां कडून सातत्याने केली जात होती . पालिका प्रशासना कडून देखील आश्वासन दिले जात होते .पण मार्च पासून आज 5 महिने झाले तरी कर्मचाऱ्यांना पगार न दिल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी महापालिका मुख्यालयात आयुक्त दालना बाहेर धरणे धरले . आमदार गीता जैन यांनी आयुक्त डॉ . विजय राठोड यांच्या सोबत चर्चा केली असता तेथे ठेकेदार पण उपस्थित होता . महापालिकेने आपणास पैसे दिल्यास पगार देऊ असा पवित्र ठेकेदाराने कायम ठेवला .यावेळी कर्मचाऱ्यांनी आपल्या व्यथा मांडत घरची झालेली हलाखीची स्थिती कथन केली . उसने मागून घर चालवत असून भाडे भरले नाही म्हणून घर रिकामे करण्याची पाळी आल्याचे एका कर्मचाऱ्याने सांगितले . आधीच ठेकेदाराने विविध भत्ते आदी दिले नसून विशिष्ट मर्जीतील कर्मचाऱ्यांनाच कामावर घेऊन त्यांना लॉक डाऊन काळात काम दिले गेले पण अन्य कर्मचाऱ्यांना विशिष्ट हेतूने काम देण्या पासून डावलण्यात आल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला .

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMira Bhayanderमीरा-भाईंदर