शहरं
Join us  
Trending Stories
1
27 हजार किलो स्फोटकांचा वापर; अवघ्या 6 महिन्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा बोगदा तयार
2
सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबाबत ही भाषा?; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वक्तव्याने दमानियांचा संताप, अजितदादांना म्हणाल्या...
3
Pune Porsche case: ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळेंना पाठवले तत्काळ सक्तीच्या रजेवर
4
९३० लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांचे अतोनात हाल होणार; ३ दिवस जम्बो ब्लॉक
5
"कोण आहेत मणिशंकर अय्यर, आमचा संबंध नाही", 'त्या' वक्तव्यामुळे काँग्रेसने हात झटकले...
6
सोशल मीडियावर रंगला नवा वाद; 'All Eyes on Rafah' आहे तरी काय? जाणून घ्या...
7
"तब्येत बरी नसती तर…’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाव्याला नवीन पटनाईक यांनी दिलं असं प्रत्युत्तर
8
आला रे आला! पुढील २४ तासात मान्सूनची एन्ट्री; कोणत्या राज्यात कधी पाऊस कोसळणार?
9
मनातून मनुस्मृती जाळणं गरजेचं; 'ती' चूक होताच प्रकाश आंबेडकर आव्हाडांवर संतापले!
10
T20 World Cup च्या तोंडावर ICC कडून पाकिस्तानी खेळाडूंना खुशखबर; 'सूर्या'चा दबदबा कायम
11
"मला तुरुंगात ठेवलं तर आप प्रचार न करता ७० पैकी ७० जागा जिंकेल’’, अरविंद केजरीवाल यांचा भाजपाला टोला 
12
रतन टाटांचा एक आदेश अन् 'ताज हॉटेल'मध्ये भटका कुत्रा निवांत झोप घेतो तेव्हा...
13
तिसऱ्यांदा सरकार आलं तर सर्वात पहिले कोणत्या देशात जाणार PM मोदी? परराष्ट्र मंत्रालय सेट करतंय कार्यक्रम
14
Fact Check: पाकिस्तानला ५ हजार कोटींचे कर्ज देण्याची घोषणा राहुल गांधींनी केलेलीच नाही; 'तो' मेसेज खोटा
15
"तीन दिवसांत माफी मागा नाहीतर..."; मुख्यमंत्री शिंदेंनी थेट संजय राऊतांना धाडली नोटीस
16
₹3 चा स्टॉक असलेली कंपनी 20 फ्री शेअर वाटणार, गुंतवणूकदारांना मालामाल करणार! LIC कडे 97 लाख शेअर
17
आतापर्यंतचे सर्व ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणारे २ शिलेदार; रोहितचा 'नाना' विक्रमांवर डोळा!
18
‘’एका वर्षात नवीन पटनाईक यांची तब्येत एवढी कशी बिघडली, काही कट आहे का?’’, मोदींनी व्यक्त केली शंका
19
IndiGo कडून आता महिला प्रवाशांना फ्लाइट बुकिंगदरम्यान मिळणार खास सुविधा
20
दिल्लीत उष्णतेने मोडले सर्व रेकॉर्ड! राजधानीत तापमान ५२ अंशांच्या पुढे

मीरा-भाईंदर महापालिका प्रभाग कार्यालयाबाहेरच कचऱ्याचे ढीग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 12:55 AM

स्वच्छता सर्वेक्षणाच्या वेळी शहर चकाचक ठेवण्याचा महापालिकेचा दिखावा काही नवीन नाही. मीरा-भार्इंदर महापालिकेच्या भार्इंदर पूर्व येथील प्रभाग समिती कार्यालयाबाहेर मात्र, कच-याचे ढीग साचून त्याला कचराकुंडीचे स्वरूप आले आहे.

 भार्इंदर : स्वच्छता सर्वेक्षणाच्या वेळी शहर चकाचक ठेवण्याचा महापालिकेचा दिखावा काही नवीन नाही. मीरा-भार्इंदर महापालिकेच्या भार्इंदर पूर्व येथील प्रभाग समिती कार्यालयाबाहेर मात्र, कच-याचे ढीग साचून त्याला कचराकुंडीचे स्वरूप आले आहे. स्वच्छता सर्वेक्षणावेळी पालिका भिंतीवर रंगवलेल्या ‘माझा कचरा, माझी जबाबदारी’ या बोधवाक्यावरच लोक कचरा टाकताना दिसत आहेत. भर रस्त्यातील या कचºयामुळे पादचाऱ्यांसह मुले आणि स्थानिक रहिवासी मेटाकुटीला आले आहेत.पूर्वेच्या तलाव मार्गावर पालिकेचे प्रभाग समिती कार्यालय आहे. त्याच इमारतीत पालिकेची शाळा तसेच विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका देखील चालवली जाते. शहर स्वच्छतेचे उपदेश लोकांना देणाºया पालिकेच्या या प्रभाग कार्यालयाबाहेरील रस्त्याला मात्र उकिरड्याचे स्वरूप आले आहे. या मार्गावर मोठ्या संख्येने बसणारे फेरीवाले आपला कचरा येथे तसाच टाकून जातात. तर परिसरातील काही लोक दिवसरात्र आपला कचरा आणून टाकत असतात.भररस्त्यात तेही पालिका शाळा - कार्यालयाबाहेर झालेल्या कचराकुंडीमुळे नेहमीच रस्त्यावर कचरा पसरतो. दुर्गंधीमुळे पादचारी तसेच रहिवासी त्रस्त आहेत. शाळा सध्या बंद असल्या तरी शाळेच्या वेळेत तर मुलांना नाक दाबून वाट काढावी लागते. शहर कचराकुंडीमुक्त झाल्याचे पालिका सांगते. स्वच्छता सर्वेक्षणात पुरस्कार मिळवल्याचा टेंभा पालिका मिरवते. पण रोज उघड्या डोळ्यांना दिसणारी बेकायदा कचराकुंडी आणि दुर्गंधाचे काय, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.परिसरातील तरुण कार्यकर्ता सुनील कदम यांनी डिसेंबरपासून ‘आपलं सरकार’ पोर्टलवर आतापर्यंत तब्बल सहा वेळा तक्रार केली आहे. यातील केवळ तीन तक्रारींचे उत्तर पालिकेचे मुख्य स्वच्छता निरीक्षक राजकुमार कांबळे यांनी कदम यांना दिले आहे. वास्तविक दुपारच्या वेळी कचºयाची गाडी कचरा घेऊन जात असल्याचे सांगण्यात आले; परंतु कचरा टाकणे थांबले नसताना पालिका मात्र खोटे उत्तर देऊन हात झटकते आहे.स्वच्छतेच्या नावाखाली गैरप्रकार चालत असून ‘आपलं सरकार’ पोर्टलवर तक्रारी करूनही काहीच कारवाई होत नाही. कचरा टाकण्यास कायमचे बंद करण्याऐवजी पालिका केवळ दिशाभूल करत खोटी उत्तरे देत आहे. या प्रकरणी कचरा टाकणारे तसेच जबाबदारी असणाºया अधिकाºयांवर कारवाई केली पाहिजे. शहराची कचरपट्टी केली जात आहे.- सुनील कदम ( स्थानिक रहिवासी )आपलं शहर कचराकुंडीमुक्त शहर असून सदर ठिकाणी कचरा टाकणाºयांविरोधात कारवाई केली जाईल. रोज गोळा टाकला जाणारा कचरा बंद करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करू. स्वच्छता निरीक्षकास कारवाईचे निर्देश दिले आहेत.- डॉ. संभाजी पानपट्टे ( उपायुक्त, मुख्यालय )

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक