शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

मिरा-भाईंदर महापालिकेला लागले एनसीसीचे वेध, स्थानिक परिवहन सेवा चालविण्याचा पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2018 17:05 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेने २६ जून २०१७ च्या स्थायी समिती बैठकीत स्थानिक परिवहन सेवा जीसीसी (ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट) तत्वावर सुरु करण्यासाठी कंत्राटदाराच्या नियुक्तीला मान्यता देण्यात आली. जीसीसी तत्वावरील सेवा तोट्यात जाणार असल्याचा साक्षात्कार प्रशासनाला झाल्याने त्यांना आता एनसीसी (नेट कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट) तत्वावर सेवा सुरु करण्याचे वेध लागले आहेत. 

- राजू काळे  भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेने २६ जून २०१७ च्या स्थायी समिती बैठकीत स्थानिक परिवहन सेवा जीसीसी (ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट) तत्वावर सुरु करण्यासाठी कंत्राटदाराच्या नियुक्तीला मान्यता देण्यात आली. जीसीसी तत्वावरील सेवा तोट्यात जाणार असल्याचा साक्षात्कार प्रशासनाला झाल्याने त्यांना आता एनसीसी (नेट कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट) तत्वावर सेवा सुरु करण्याचे वेध लागले आहेत. 

जीसीसी तत्वानुसार स्थानिक परिवहन सेवेवरील नियंत्रण पुर्णपणे पालिकेकडे राहणार असुन केवळ कंत्राटदाराला मनुष्यबळ पुरवावे लागणार आहे. त्याच्या वेतनासह बसची देखभाल, दुरुस्तीची खर्च पालिकेला अदा करावा लागणार आहे. त्यावर वर्षाकाठी सुमारे १२ कोटींचा तोटा होणार असल्याचे प्रशासनाकडुन निश्चित करण्यात आले होते. तर एनसीसी तत्वानुसार सेवा पुर्णपणे कंत्राटदाराकडुन चालविली जाणार असुन त्यापोटी कंत्राटदाराला होणारा तोटा पालिकेडुन भरुन दिला जाणार आहे.  त्यामुळे प्रशासनाने सुरुवातीला जीसीसी तत्वारील सेवा चालविण्यास प्राधान्य देत निविदा प्रक्रीया सुरु केली. प्राप्त निविदेला पालिकेच्या निविदा समितीने मान्यता देत ती अंतिम मान्यतेसाठी २६ जून २०१७ च्या स्थायी समिती बैठकीत सादर करण्यात आली. त्याला भाजपा सदस्यांनी विरोध केल्यानंतरही स्थायीने त्याला मान्यता दिली. त्यामुळे प्रशासनाने कंत्राटदारासोबत सामंजस्य करार केला. त्याला त्यावेळच्या विरोधकांमधील भाजपाची मान्यता मिळावी, यासाठी कंत्राटदाराने भाजपा नेतृत्व आ. नरेंद्र मेहता यांना २५ लाखांची लाच दिल्याप्रकरणी त्यात बेकायदेशीर मार्गाचा अवलंब झाल्याचा आरोप सुरु झाला. त्यामुळे प्रशासनाने कंत्राटदारासोबत केलेला सामंजस्य करार रद्द केला. परंतु, स्थायीने मंजुर केलेला ठराव जैसे थे असतानाही प्रशासनाला आता एनसीसीचे वेध लागले आहेत. एनसीसी तत्ववारील सेवा जीसीसी पेक्षा कमी तोट्याची असल्याने ती परवडणारी असल्याचा साक्षात्कार प्रशासनाला झाल्याचा दावा केला जात आहे. मात्र यात राजकीय डाव असल्याचा आरोप विरोधकांकडुन केला जात आहे. जीसीसीवर पालिकेचे नियंत्रण राहणार असल्याने त्यात होणारा तोटा देखील पालिकेच्या नियंत्रणात राहणार असल्याने होणाय््राा तोट्यावर पालिका नियंत्रण ठेऊ शकत असल्याचा दावा केला जात आहे. परंतु, एनसीसीवरील सेवा पुर्णपणे कंत्राटदाराच्या नियंत्रणात राहणार असल्याने त्यात राजकीय तोटा भरुन काढला जाणार असल्याचा आरोप विरोधकांकडुन केला जात आहे. पालिकेने २००५ मध्ये सुरु केलेली कंत्राटी परिवहन सेवा देखील राजकीय मंडळींच्या निकटवर्तीयांना चालविण्यास दिली होती. त्यात पालिकेला भरमसाठ तोटा होऊ लागल्याने ती बंद करुन २०१० मध्ये पीपीपी (पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशीप) तत्वावर सेवा सुरु केली. यावेळी पालिकेने कंत्राटदारासोबत केलेल्या करारानुसार बस आगाराची सोय प्रशासनाने राजकीय हस्तक्षेपामुळे शेवटपर्यंत उपलब्ध करुन दिली नाही. कारण त्यात देवाण-घेवाणाची तडजोड निश्चित होत नसल्यानेच त्याला खो घालण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सेवेतील बसची दुरुस्ती व पार्कींग थेट रस्त्यावर सुरु झाली. परिणामी कंत्राटदार तोट्यात गेल्याने सेवा कोलमडून पडली. यंदा हि सेवा एनसीसीऐवजी जीसीसी तत्वावर सुरु करण्यासाठी प्रशासनाने सुरुवातीला मान्यता दिली. मात्र अचानक एनसीसी तत्वावर सेवा चालविण्यासाठी प्रशासनाने कार्यवाही सुरु केल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हि सेवा प्रामुख्याने सत्ताधाय््राांच्या हितासाठीच असल्याने त्याला प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप विरोधकांकडुन केला जात आहे. या सेवेमुळे प्रशासनाची सत्ताधाय््राांमधील वाढलेली दरी कमी होण्यास मदत होणार असल्याचा टोला  देखील विरोधकांकडुन लगावण्यात आला आहे. 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक