शहरं
Join us  
Trending Stories
1
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
2
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
3
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
5
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
6
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
7
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
8
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
9
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
10
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
11
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
12
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
13
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
14
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
15
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
16
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
17
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
18
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
19
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
20
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ

मिरा-भाईंदर महापालिकेला लागले एनसीसीचे वेध, स्थानिक परिवहन सेवा चालविण्याचा पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2018 17:05 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेने २६ जून २०१७ च्या स्थायी समिती बैठकीत स्थानिक परिवहन सेवा जीसीसी (ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट) तत्वावर सुरु करण्यासाठी कंत्राटदाराच्या नियुक्तीला मान्यता देण्यात आली. जीसीसी तत्वावरील सेवा तोट्यात जाणार असल्याचा साक्षात्कार प्रशासनाला झाल्याने त्यांना आता एनसीसी (नेट कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट) तत्वावर सेवा सुरु करण्याचे वेध लागले आहेत. 

- राजू काळे  भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेने २६ जून २०१७ च्या स्थायी समिती बैठकीत स्थानिक परिवहन सेवा जीसीसी (ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट) तत्वावर सुरु करण्यासाठी कंत्राटदाराच्या नियुक्तीला मान्यता देण्यात आली. जीसीसी तत्वावरील सेवा तोट्यात जाणार असल्याचा साक्षात्कार प्रशासनाला झाल्याने त्यांना आता एनसीसी (नेट कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट) तत्वावर सेवा सुरु करण्याचे वेध लागले आहेत. 

जीसीसी तत्वानुसार स्थानिक परिवहन सेवेवरील नियंत्रण पुर्णपणे पालिकेकडे राहणार असुन केवळ कंत्राटदाराला मनुष्यबळ पुरवावे लागणार आहे. त्याच्या वेतनासह बसची देखभाल, दुरुस्तीची खर्च पालिकेला अदा करावा लागणार आहे. त्यावर वर्षाकाठी सुमारे १२ कोटींचा तोटा होणार असल्याचे प्रशासनाकडुन निश्चित करण्यात आले होते. तर एनसीसी तत्वानुसार सेवा पुर्णपणे कंत्राटदाराकडुन चालविली जाणार असुन त्यापोटी कंत्राटदाराला होणारा तोटा पालिकेडुन भरुन दिला जाणार आहे.  त्यामुळे प्रशासनाने सुरुवातीला जीसीसी तत्वारील सेवा चालविण्यास प्राधान्य देत निविदा प्रक्रीया सुरु केली. प्राप्त निविदेला पालिकेच्या निविदा समितीने मान्यता देत ती अंतिम मान्यतेसाठी २६ जून २०१७ च्या स्थायी समिती बैठकीत सादर करण्यात आली. त्याला भाजपा सदस्यांनी विरोध केल्यानंतरही स्थायीने त्याला मान्यता दिली. त्यामुळे प्रशासनाने कंत्राटदारासोबत सामंजस्य करार केला. त्याला त्यावेळच्या विरोधकांमधील भाजपाची मान्यता मिळावी, यासाठी कंत्राटदाराने भाजपा नेतृत्व आ. नरेंद्र मेहता यांना २५ लाखांची लाच दिल्याप्रकरणी त्यात बेकायदेशीर मार्गाचा अवलंब झाल्याचा आरोप सुरु झाला. त्यामुळे प्रशासनाने कंत्राटदारासोबत केलेला सामंजस्य करार रद्द केला. परंतु, स्थायीने मंजुर केलेला ठराव जैसे थे असतानाही प्रशासनाला आता एनसीसीचे वेध लागले आहेत. एनसीसी तत्ववारील सेवा जीसीसी पेक्षा कमी तोट्याची असल्याने ती परवडणारी असल्याचा साक्षात्कार प्रशासनाला झाल्याचा दावा केला जात आहे. मात्र यात राजकीय डाव असल्याचा आरोप विरोधकांकडुन केला जात आहे. जीसीसीवर पालिकेचे नियंत्रण राहणार असल्याने त्यात होणारा तोटा देखील पालिकेच्या नियंत्रणात राहणार असल्याने होणाय््राा तोट्यावर पालिका नियंत्रण ठेऊ शकत असल्याचा दावा केला जात आहे. परंतु, एनसीसीवरील सेवा पुर्णपणे कंत्राटदाराच्या नियंत्रणात राहणार असल्याने त्यात राजकीय तोटा भरुन काढला जाणार असल्याचा आरोप विरोधकांकडुन केला जात आहे. पालिकेने २००५ मध्ये सुरु केलेली कंत्राटी परिवहन सेवा देखील राजकीय मंडळींच्या निकटवर्तीयांना चालविण्यास दिली होती. त्यात पालिकेला भरमसाठ तोटा होऊ लागल्याने ती बंद करुन २०१० मध्ये पीपीपी (पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशीप) तत्वावर सेवा सुरु केली. यावेळी पालिकेने कंत्राटदारासोबत केलेल्या करारानुसार बस आगाराची सोय प्रशासनाने राजकीय हस्तक्षेपामुळे शेवटपर्यंत उपलब्ध करुन दिली नाही. कारण त्यात देवाण-घेवाणाची तडजोड निश्चित होत नसल्यानेच त्याला खो घालण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सेवेतील बसची दुरुस्ती व पार्कींग थेट रस्त्यावर सुरु झाली. परिणामी कंत्राटदार तोट्यात गेल्याने सेवा कोलमडून पडली. यंदा हि सेवा एनसीसीऐवजी जीसीसी तत्वावर सुरु करण्यासाठी प्रशासनाने सुरुवातीला मान्यता दिली. मात्र अचानक एनसीसी तत्वावर सेवा चालविण्यासाठी प्रशासनाने कार्यवाही सुरु केल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हि सेवा प्रामुख्याने सत्ताधाय््राांच्या हितासाठीच असल्याने त्याला प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप विरोधकांकडुन केला जात आहे. या सेवेमुळे प्रशासनाची सत्ताधाय््राांमधील वाढलेली दरी कमी होण्यास मदत होणार असल्याचा टोला  देखील विरोधकांकडुन लगावण्यात आला आहे. 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक