शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणात मीरा भाईंदर महापालिका ठाणे जिल्ह्यात अव्वल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 11:53 IST

लसींचा तुटवडा असून पुरवठा सुरळीत होत नसल्याने लसीकरण मोहिमेवर त्याचा परिणाम होत आहे .

मीरारोड - ४५ वर्षां वरील नागरिकांचे ३ मे पर्यंत ४३ टक्के इतके लसीकरण करून मीरा भाईंदर महापालिका जिल्ह्यात अव्वल क्रमांकावर आहे . लसींचा पुरवठा सुरळीत राहिल्यास शहरातील नागरिकांचे लसीकरण  वेगाने पूर्ण करण्याची तयारी महापालिकेची आहे. मीरा भाईंदर महापालिकेची लोकसंख्या १० लाख ४७ हजार ३४६ इतकी गृहीत धरण्यात आली आहे . लसीकरण केंद्रांसाठी पालिकेची १२ तर खाजगी ९ लसीकरण केंद्र सुरु केली आहेत . आणखी २७ नवीन लसीकरण केंद्र सुरु केली जाणार असून तसा मंजुरीचा प्रस्ताव पाठवला आहे . 

लसींचा तुटवडा असून पुरवठा सुरळीत होत नसल्याने लसीकरण मोहिमेवर त्याचा परिणाम होत आहे . तरी सुद्धा महापालिकेने ३ मे पर्यंत ४५ वर्षां वरील १ लाख ३५ हजार ४२३ नागरिकांचे पहिला डोस देऊन लसीकरण केले आहे . तर ३१ हजार ८८२ नागरिकांना लसीचा दुसरा डोस  आला आहे . शहरातील ४५ वयोगटा वरील नागरिकांची एकूण संख्या ३ लाख १४ हजार २०४ इतकी आहे . 

४५ वर्षां वरील ४३ टक्के नागरिकांचे लसीकरण करण्यात मीरा भाईंदर महापालिका हि ठाणे जिल्ह्यातील अव्वल महापालिका आहे . नवी मुंबई महापालिकेत हेच प्रमाण ३८ टक्के ; ठाणे महापालिका २९ टक्के ; कल्याण डोंबिवली २२ टक्के ; उल्हासनगर १८ टक्के तर भिवंडी निजामपूर महापालिकेने केवळ ११ टक्के इतकेच लसीकरण केले आहे. 

१ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरु करण्यात आले असले तरी लसींचा पुरवठा नसल्याने भाईंदरच्या भीमसेन जोशी रुग्णालयातच लसीकरण सुरु आहे . ह्यात सुद्धा मीरा भाईंदर महापालिकेने ३ मे पर्यंत १२८६ नागरिकांचे लसीकरण केले आहे . ह्या वयोगटातील नागरिकांची संख्या ४ लाख ३९ हजार ८८५ इतकी आहे . लस मिळाल्यास अन्य केंद्र सुरु करता येणार आहेत . 

वैद्यकीय व अत्यावश्यक सेवेतील लसीकरणात सुद्धा महापालिकेने आघाडी घेतली आहे . १७ हजार २९७ कर्मचाऱ्यांना पहिला डोस तर ८५४७ लोकांना दुसरा डोस दिला आहे . उद्दिष्टा पेक्षा जास्त लसीकरण केले आहे .  महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त डॉ . संभाजी वाघमारे , लसीकरण मोहिमेच्या प्रमुख डॉ . अंजली पाटील आणि लसीकरण केंद्रातील विविध कर्मचारी आदींच्या प्रयत्नांना मिळत असलेले यश मानले जात आहे. लसीकरण केंद्र व त्यासाठी आवश्यक कर्मचारी आणि व्यवस्थेचे नियोजन महापालिकेने केलेले आहे . शासना कडून लसींचा पुरवठा सुरळीत झाल्यास नागरिकांचे वेगाने लसीकरण पूर्ण करता येईल असा विश्वास महापालिका प्रशासनाला आहे .

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसthaneठाणेMira Bhayanderमीरा-भाईंदरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस