शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

पालिका कनिष्ठ अभियंत्याच्या वाहन भत्यात १०० टक्के वाढ; पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2018 18:29 IST

स्थायी समितीत आणण्यात आला प्रस्ताव

भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेत कार्यरत असलेल्या ७ कनिष्ठ अभियंत्यांसह दोन वयोमानानुसार थेट पात्र ठरलेल्या ९ कनिष्ठ अभियंत्यांच्या वाहन भत्यात यंदा तब्बल १०० टक्के वाढ होणार असून तसा प्रस्तावच आजच्या स्थायी समिती बैठकीत मान्यतेसाठी आणण्यात आला आहे. हा वाहन भत्ता वाढीचा लाभ केवळ व्यावसायिक परिक्षा उत्तीर्ण झालेल्या कनिष्ठ अभियंत्यांनाच मिळणार आहे. परिक्षेत अनुत्तीर्ण झालेल्यांना मात्र यापासून वंचित राहावे लागणार आहे.पालिकेत सुमारे १६ कनिष्ठ अभियंता कार्यरत आहेत. यातील बहुतांशी अभियंत्यांनी गेल्या वर्षी व्यावसायिक परिक्षा दिली होती. त्यात काही उत्तीर्ण झाले, तर काही अनुत्तीर्ण झाले. दोन कनिष्ठ अभियंत्यांचे वय ४५ वर्षांपेक्षा अधिक असल्याने त्यांना परिक्षेतून सूट देण्यात आली. उत्तीर्ण झालेल्या ७ कनिष्ठ अभियंत्यांच्या वाहन भत्यात यंदा १० हजार रुपयांहून २० हजार रुपये अशी १०० टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. यासाठी त्या कनिष्ठ अभियंत्यांनी प्रशासनाकडे मागणी केल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच त्यांनी सेवेत १२ वर्षे पूर्ण केल्याचा कांगावासुद्धा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. या उत्तीर्ण कनिष्ठ अभियंत्यांखेरीज काही कनिष्ठ अभियंतेदेखील उत्तीर्ण झाले असले तरी त्यांनी सेवेत १२ वर्षे पूर्ण केली नसल्याचा दावा करण्यात येत असल्याने त्यांना वाहन भत्ता वाढीतून वगळण्यात आले आहे. अशा प्रकारे अनुत्तीर्ण झालेल्या ७ कनिष्ठ अभियंत्यांना मात्र या वाढीतून हेतूपुरस्सर वगळण्यात आले आहे. हे अभियंतेसुद्धा उत्तीर्ण झालेल्यांसारखेच समान काम करत आहेत. तसेच त्यांतील काहींची सेवा सुद्धा १२ वर्षांपेक्षा जास्त झाली असताना त्यांना या वाहन भत्याच्या वाढीतून वगळणे कितपत योग्य ठरते, अशी चर्चा त्या त्या कनिष्ठ अभियंत्यांत सुरू झाली आहे. 

उत्तीर्ण कनिष्ठ अभियंत्यांना उप अभियंता पदाची वेतनश्रेणी लागू करण्यात आली आहे. मात्र त्यांना त्या पदावर पदोन्नती दिलेली नाही. काही वरीष्ठ अधिकारी आपल्या मर्जीतील कनिष्ठ अधिकाऱ्यांवर मेहेरबान असल्यानेच मर्जीत नसलेल्यांना डावलले जात असल्याचा आरोपदेखील केला जात आहे. पेट्रोल, डिझेल, वाहन चालकाचा पगार व वाहन दुरुस्तीच्या नावाखाली दिली जाणारी १०० टक्के वाहन भत्ता वाढ उर्वरीत कनिष्ठ अभियंत्यांच्या गुणवत्तेवर आधारित कशी काय ठरू शकते, असा प्रश्नदेखील उपस्थित होऊ लागला आहे. यावर सत्ताधारी योग्य भूमिका घेऊन वंचितांना लाभ मिळवून देतील, असा विश्वास वाहन भत्ता वाढीतून वगळलेल्या कनिष्ठ अभियंत्यांनी व्यक्त केला आहे. 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक