शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

पालिका कनिष्ठ अभियंत्याच्या वाहन भत्यात १०० टक्के वाढ; पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2018 18:29 IST

स्थायी समितीत आणण्यात आला प्रस्ताव

भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेत कार्यरत असलेल्या ७ कनिष्ठ अभियंत्यांसह दोन वयोमानानुसार थेट पात्र ठरलेल्या ९ कनिष्ठ अभियंत्यांच्या वाहन भत्यात यंदा तब्बल १०० टक्के वाढ होणार असून तसा प्रस्तावच आजच्या स्थायी समिती बैठकीत मान्यतेसाठी आणण्यात आला आहे. हा वाहन भत्ता वाढीचा लाभ केवळ व्यावसायिक परिक्षा उत्तीर्ण झालेल्या कनिष्ठ अभियंत्यांनाच मिळणार आहे. परिक्षेत अनुत्तीर्ण झालेल्यांना मात्र यापासून वंचित राहावे लागणार आहे.पालिकेत सुमारे १६ कनिष्ठ अभियंता कार्यरत आहेत. यातील बहुतांशी अभियंत्यांनी गेल्या वर्षी व्यावसायिक परिक्षा दिली होती. त्यात काही उत्तीर्ण झाले, तर काही अनुत्तीर्ण झाले. दोन कनिष्ठ अभियंत्यांचे वय ४५ वर्षांपेक्षा अधिक असल्याने त्यांना परिक्षेतून सूट देण्यात आली. उत्तीर्ण झालेल्या ७ कनिष्ठ अभियंत्यांच्या वाहन भत्यात यंदा १० हजार रुपयांहून २० हजार रुपये अशी १०० टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. यासाठी त्या कनिष्ठ अभियंत्यांनी प्रशासनाकडे मागणी केल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच त्यांनी सेवेत १२ वर्षे पूर्ण केल्याचा कांगावासुद्धा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. या उत्तीर्ण कनिष्ठ अभियंत्यांखेरीज काही कनिष्ठ अभियंतेदेखील उत्तीर्ण झाले असले तरी त्यांनी सेवेत १२ वर्षे पूर्ण केली नसल्याचा दावा करण्यात येत असल्याने त्यांना वाहन भत्ता वाढीतून वगळण्यात आले आहे. अशा प्रकारे अनुत्तीर्ण झालेल्या ७ कनिष्ठ अभियंत्यांना मात्र या वाढीतून हेतूपुरस्सर वगळण्यात आले आहे. हे अभियंतेसुद्धा उत्तीर्ण झालेल्यांसारखेच समान काम करत आहेत. तसेच त्यांतील काहींची सेवा सुद्धा १२ वर्षांपेक्षा जास्त झाली असताना त्यांना या वाहन भत्याच्या वाढीतून वगळणे कितपत योग्य ठरते, अशी चर्चा त्या त्या कनिष्ठ अभियंत्यांत सुरू झाली आहे. 

उत्तीर्ण कनिष्ठ अभियंत्यांना उप अभियंता पदाची वेतनश्रेणी लागू करण्यात आली आहे. मात्र त्यांना त्या पदावर पदोन्नती दिलेली नाही. काही वरीष्ठ अधिकारी आपल्या मर्जीतील कनिष्ठ अधिकाऱ्यांवर मेहेरबान असल्यानेच मर्जीत नसलेल्यांना डावलले जात असल्याचा आरोपदेखील केला जात आहे. पेट्रोल, डिझेल, वाहन चालकाचा पगार व वाहन दुरुस्तीच्या नावाखाली दिली जाणारी १०० टक्के वाहन भत्ता वाढ उर्वरीत कनिष्ठ अभियंत्यांच्या गुणवत्तेवर आधारित कशी काय ठरू शकते, असा प्रश्नदेखील उपस्थित होऊ लागला आहे. यावर सत्ताधारी योग्य भूमिका घेऊन वंचितांना लाभ मिळवून देतील, असा विश्वास वाहन भत्ता वाढीतून वगळलेल्या कनिष्ठ अभियंत्यांनी व्यक्त केला आहे. 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक