शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

मीरा भाईंदर महालिकेच्या ५३८ कर्मचाऱ्यांना वारसा हक्क मिळून देण्याचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2019 15:34 IST

नगरपालिका काळात रोजंदारीवर लागलेल्या आणि २००० साली शासनो विशेष बाब म्हणुन कायम केलेल्या मीरा भार्इंदर महापालिकेतील ५३८ सफाई कर्मचाऱ्यांचा वारसा हक्क मिळवण्यासाठीचा संघर्ष आजही मीरा भार्इंदर कामगारसेनेच्या माध्यमातुन सुरुच आहे.

मीरारोड - नगरपालिका काळात रोजंदारीवर लागलेल्या आणि २००० साली शासनो विशेष बाब म्हणुन कायम केलेल्या मीरा भार्इंदर महापालिकेतील ५३८ सफाई कर्मचाऱ्यांचा वारसा हक्क मिळवण्यासाठीचा संघर्ष आजही मीरा भार्इंदर कामगारसेनेच्या माध्यमातुन सुरुच आहे. आता सदर कर्मचारायांना वारसा हक्क मिळवुन देण्यास शासनास भाग पाडु असे आश्वासन महाराष्ट्र राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी दिले आहे. मंगळवारी नगरभवन येथे कामगार सेनेने आयोजित कर्मचारायांच्या मेळाव्यात बोलत होते.भार्इंदर पश्चिमेच्या नगरभवन येथे झालेल्या मेळाव्यात संघटनेचे सरचिटणीस प्रकाश बने, सहसचिव वरेश कमाने, कोषाध्यक्ष मार्तंड द्राक्षे, आरोग्य विभाग संघटनेचे सचिव बाबाराम कदम, राज्य राखीव पोलीस बल संघटनेचे सरचिटणीस सुभाष गोरे सह मिरा भार्इंदर कामगार सेनेचे युनिट अध्यक्ष गोविंद परब, सचिव कैलास शेवंते, मुत्तुपांडे पेरूमल, सुनील पाटील, देवानंद पाटील, उल्हास आंग्रे, सुलेमान मुलाणी, वसंत पेंढारे, विजय म्हात्रे, सुजित घोणे, किरण पाटील आदी पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.यावेळी गोविंद परब यांनी ५३८ कर्मचार्यांना न्याय मिळून देण्यासाठी आम्ही सर्वजण मध्यवर्ती संघटनेच्या पाठीशी उभे राहू अशी ग्वाही पठाण व सहकारायांना दिली. नगरपालिका काळात रोजंदारीवर ९१ - ९३ दरम्यान या ५३८ सफाई कर्मचारायांची भरती करण्यात आली होती. लाड व पांगे समितीच्या शिफारशी नुसार २००० साली शासनाने राज्य स्तरावर घेतलेल्या निर्णयात सदर सफाई कर्मचारी देखील पालिका सेवेत कायम झाले होते.परंतु सदर कर्मचारायांना पालिका सेवेत कायम स्वरुपी विशेष बाब म्हणुन सामावुन घेण्यात आल्याने निवृत्ती व निधना नंतर वारसा हक्क लागु राहणार नाही असे शासनाने स्पष्ट केले होते. तेव्हा पासुन या कर्मचारायांना वारसा हक्काचा लाभ मिळालेला नाही. ५३८ कर्मचारी पैकी ५० ते ६० कर्मचारी सेवा निवृत्त झाले आहेत तर ५० कर्मचारी मयत झाले आहेत. अशा कर्मचार्यांच्या वारसांना शासनाची मंजुरी मिळत नसल्याने पालिका सेवेते वारसा हक्काने घेता येत नाही. जेणे करुन काही कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे.सफाई कामगारांना लाड - पांगे समितीच्या शिफारस लागू असताना येथील कामगारांना वारसा हक्का सह सेवा ज्येष्ठतेचा लाभ का मिळत नाही असा सवाल करत सर्व कर्मचार्यांना एकच कायदा असताना येथील कर्मचार्यांना वेगळा न्याय का ? असे पठाण म्हणाले. कर्मचार्यांच्या आयुष्याची १० ते १२ वर्षे वाया जाऊ नये म्हणून त्यांना सेवा ज्येष्ठते मध्ये त्याचा लाभ मिळून देऊ. महानगरपालिका आस्थापने वरील सदर ५३८ सफाई कर्मचार्यांना वारसा हक्क लागू करणे तसेच अनुकंपा तत्वाचा न्याय मिळवुन देण्यास चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटना शासनास भाग पाडेल. वेळ पडल्यास आंदोलन करू. मंत्रालय बंद पाडू असा इशारा पठाण यांनी दिला.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकEmployeeकर्मचारी