शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

मीरा भाईंदर महालिकेच्या ५३८ कर्मचाऱ्यांना वारसा हक्क मिळून देण्याचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2019 15:34 IST

नगरपालिका काळात रोजंदारीवर लागलेल्या आणि २००० साली शासनो विशेष बाब म्हणुन कायम केलेल्या मीरा भार्इंदर महापालिकेतील ५३८ सफाई कर्मचाऱ्यांचा वारसा हक्क मिळवण्यासाठीचा संघर्ष आजही मीरा भार्इंदर कामगारसेनेच्या माध्यमातुन सुरुच आहे.

मीरारोड - नगरपालिका काळात रोजंदारीवर लागलेल्या आणि २००० साली शासनो विशेष बाब म्हणुन कायम केलेल्या मीरा भार्इंदर महापालिकेतील ५३८ सफाई कर्मचाऱ्यांचा वारसा हक्क मिळवण्यासाठीचा संघर्ष आजही मीरा भार्इंदर कामगारसेनेच्या माध्यमातुन सुरुच आहे. आता सदर कर्मचारायांना वारसा हक्क मिळवुन देण्यास शासनास भाग पाडु असे आश्वासन महाराष्ट्र राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी दिले आहे. मंगळवारी नगरभवन येथे कामगार सेनेने आयोजित कर्मचारायांच्या मेळाव्यात बोलत होते.भार्इंदर पश्चिमेच्या नगरभवन येथे झालेल्या मेळाव्यात संघटनेचे सरचिटणीस प्रकाश बने, सहसचिव वरेश कमाने, कोषाध्यक्ष मार्तंड द्राक्षे, आरोग्य विभाग संघटनेचे सचिव बाबाराम कदम, राज्य राखीव पोलीस बल संघटनेचे सरचिटणीस सुभाष गोरे सह मिरा भार्इंदर कामगार सेनेचे युनिट अध्यक्ष गोविंद परब, सचिव कैलास शेवंते, मुत्तुपांडे पेरूमल, सुनील पाटील, देवानंद पाटील, उल्हास आंग्रे, सुलेमान मुलाणी, वसंत पेंढारे, विजय म्हात्रे, सुजित घोणे, किरण पाटील आदी पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.यावेळी गोविंद परब यांनी ५३८ कर्मचार्यांना न्याय मिळून देण्यासाठी आम्ही सर्वजण मध्यवर्ती संघटनेच्या पाठीशी उभे राहू अशी ग्वाही पठाण व सहकारायांना दिली. नगरपालिका काळात रोजंदारीवर ९१ - ९३ दरम्यान या ५३८ सफाई कर्मचारायांची भरती करण्यात आली होती. लाड व पांगे समितीच्या शिफारशी नुसार २००० साली शासनाने राज्य स्तरावर घेतलेल्या निर्णयात सदर सफाई कर्मचारी देखील पालिका सेवेत कायम झाले होते.परंतु सदर कर्मचारायांना पालिका सेवेत कायम स्वरुपी विशेष बाब म्हणुन सामावुन घेण्यात आल्याने निवृत्ती व निधना नंतर वारसा हक्क लागु राहणार नाही असे शासनाने स्पष्ट केले होते. तेव्हा पासुन या कर्मचारायांना वारसा हक्काचा लाभ मिळालेला नाही. ५३८ कर्मचारी पैकी ५० ते ६० कर्मचारी सेवा निवृत्त झाले आहेत तर ५० कर्मचारी मयत झाले आहेत. अशा कर्मचार्यांच्या वारसांना शासनाची मंजुरी मिळत नसल्याने पालिका सेवेते वारसा हक्काने घेता येत नाही. जेणे करुन काही कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे.सफाई कामगारांना लाड - पांगे समितीच्या शिफारस लागू असताना येथील कामगारांना वारसा हक्का सह सेवा ज्येष्ठतेचा लाभ का मिळत नाही असा सवाल करत सर्व कर्मचार्यांना एकच कायदा असताना येथील कर्मचार्यांना वेगळा न्याय का ? असे पठाण म्हणाले. कर्मचार्यांच्या आयुष्याची १० ते १२ वर्षे वाया जाऊ नये म्हणून त्यांना सेवा ज्येष्ठते मध्ये त्याचा लाभ मिळून देऊ. महानगरपालिका आस्थापने वरील सदर ५३८ सफाई कर्मचार्यांना वारसा हक्क लागू करणे तसेच अनुकंपा तत्वाचा न्याय मिळवुन देण्यास चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटना शासनास भाग पाडेल. वेळ पडल्यास आंदोलन करू. मंत्रालय बंद पाडू असा इशारा पठाण यांनी दिला.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकEmployeeकर्मचारी