शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

मिरा-भाईंदर मनपा : सत्ताधाऱ्यांनी अर्थसंकल्पात तब्बल 603 कोटींची केली वाढ, आकडेवारीत घोटाळ्याचा विरोधकांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 02:04 IST

Mira Bhayander Municipal Corporation budget News : मीरा- भाईंदर महापालिकेचा २०२० - २१ चा अर्थसंकल्प १ हजार २६५ कोटी ८६ लाखांपर्यंतच आटोपला असताना सत्ताधारी भाजपने मात्र २०२१ - २०२२ चा अर्थसंकल्प मात्र तब्बल २ हजार ११२ कोटींचा मंजूर केला आहे.

मीरा रोड : मीरा- भाईंदर महापालिकेचा २०२० - २१ चा अर्थसंकल्प १ हजार २६५ कोटी ८६ लाखांपर्यंतच आटोपला असताना सत्ताधारी भाजपने मात्र २०२१ - २०२२ चा अर्थसंकल्प मात्र तब्बल २ हजार ११२ कोटींचा मंजूर केला आहे. प्रशासनाने सादर केलेल्या १ हजार ५०९ कोटींच्या अर्थसंकल्पात सत्ताधाऱ्यांनी तब्बल ६०३ कोटींची वाढ केली आहे . सत्ताधाऱ्यांनी महसुली उत्पन्नापेक्षा अर्थसंकल्प अव्वाच्या सव्वा फुगवला असतानाच दुसरीकडे काँग्रेस व शिवसेनेने स्थायी समितीच्या आकडेवारीत घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. मीरा- भाईंदर महापालिकेचा २०२१ - २०२२ चा प्रशासकीय अर्थसंकल्प आयुक्त दिलीप ढोले यांनी स्थायी समितीला सादर केला होता . तो अर्थसंकल्प १५०९ कोटी १७ लाखांचा होता. परंतु स्थायी समितीत या अर्थसंकल्पात मोठी वाढ करून तब्बल २०६२ कोटी ६५ लाखांवर नेऊन ठेवला. मंगळवारी झालेल्या महासभेत त्यामध्ये आणखी वाढ करून अर्थसंकल्प २ हजार ११२ कोटींचा केला. स्थायी समितीचा अर्थसंकल्प सत्ताधारी भाजपसह शिवसेना, काँग्रेस नगरसेवकांनी मिळून सर्वांनुमते मंजूर केल्याचे सांगितले जात असताना काँग्रेस व शिवसेनेने मात्र आकडेवारीत घोटाळा झाल्याची तक्रार आयुक्तांना केली आहे. काँग्रेसचे नगरसेवक अनिल सावंत आणि शिवसेनेच्या स्नेहा पांडे यांनी दिलेल्या पत्रात स्थायी समिती मध्ये जी आकडेवारी मंजूर झालेली होती त्यात परस्पर बदल केला असून त्याची रेकॉर्डिंग तपासण्यात यावी. ही गंभीर बाब असल्याने कारवाईची मागणी सावंत व पांडे यांनी केली आहे.  काँग्रेसचे गटनेते जुबेर इनामदार यांनी परिवहन सेवेत सध्या ५३ बस सुरु असताना समितीसाठी तब्बल २० कोटी देण्याची मंजुरी म्हणजे कंत्राटदाराला पोसण्यासाठी नागरिकांच्या पैशांची लूट सत्ताधारी भाजपने चालवल्याचा आरोप केला आहे. विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील यांनीही सत्ताधारी भाजपने अर्थसंकल्प फुगवून अनावश्यक कामे काढून टेंडर - टक्केवारीसाठी पैशांचा दुरुपयोग चालवल्याचा आरोप केला आहे. सभापती दिनेश जैन म्हणाले की, आकडेवारीबाबत सावंत यांचा गैरसमज झाला होता तो दूर केला आहे. सत्ताधारी म्हणून शहराचा विकास आणि नागरिकांचे हित लक्षात घेऊनच अर्थसंकल्प केला आहे. विरोधक नाहक खोटे आरोप करत आहेत.  सत्ताधाऱ्यांनी कुठे फुगवले उत्पन्न कोरोनामुळे अर्थसंकल्प कोलमडले असताना सत्ताधाऱ्यांनी सूर्या पाणी योजनेसाठी सरकारकडून मिळणारे अनुदानाच्या अपेक्षित रकमेत तब्बल २९५ कोटींनी वाढ धरली आहे. या योजनेसाठी कर्ज घेण्याच्या रकमेतही ५५ कोटींची वाढ केली आहे. मालमत्ता कराचे उत्पन्न तब्बल ४७ कोटींनी तर मालमत्ता हस्तांतरणाचे उत्पन्न ४० कोटींनी वाढवले आहे. मोकळ्या जागेच्या कराची वसुली होत नसतानाही उत्पन्न ३० कोटींनी तर इमारत विकास आकार उत्पन्न ४० कोटींनी वाढवले आहे. मुद्रांक शुल्क अधिभाराच्या उत्पन्नात तब्बल १० कोटींनी तर जाहिरात फलक उत्पन्न ५ कोटींनी वाढवले आहे. मुदत ठेवींवरील व्याज पाच कोटींनी वाढवले आहे. कुठे वाढवला  खर्चसत्ताधाऱ्यांनी नगरसेवक, प्रभाग समिती, स्वेच्छा निधी, आदरातिथ्य भत्ते याच्या तरतुदीत वाढ केली आहे. बांधकाम विभागाच्या खर्चात १२४ कोटींनी तर  विकास आराखडा अंमलबजावणीच्या नावाखाली बांधकाम आदी विभागाच्या खर्चात १२ कोटींनी वाढ केली आहे. पाणी पुरवठा विभागाच्या खर्चात ४०८ कोटींची वाढ केली आहे . वृक्ष प्राधिकरणाच्या खर्चात कपात केली आहे.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMira Bhayanderमीरा-भाईंदर