शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

मीरा भाईंदर महानगरपालिकेची केंद्र व राज्य सरकार सोबत देखील फसवाफसवी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2020 19:52 IST

Mira Bhayander News : भाईंदर पश्चिमेस रेल्वे स्थानका बाहेर आधीच मोठी वाहन कोंडी होत असताना तेथे तब्बल ८ कोटीचे सुशोभीकरणाच्या कामाचा अट्टहास मीरा भाईंदर महापालिकेने चालविल्याने येथील वाहतूक समस्या गंभीर बनणार आहे .

वाहतुकीची कोंडी होत असताना ८ कोटीचे सुशोभीकरण प्रकरण 

 मीरारोड - भाईंदर पश्चिमेस रेल्वे स्थानका बाहेर आधीच मोठी वाहन कोंडी होत असताना तेथे तब्बल ८ कोटीचे सुशोभीकरणाच्या कामाचा अट्टहास मीरा भाईंदर महापालिकेने चालविल्याने येथील वाहतूक समस्या गंभीर बनणार आहे . पालिकेने  कामाचा खर्च आधी २ कोटी असल्याचे शासनाला सांगत जागेची मालकी पालिकेची असल्याचे लेखी कळवले होते .  तर केंद्र सरकारच्या मीठ विभागाला जागेचा मोबदला दिलेला नसताना देखील मोबदला दिल्याची खोटी टिप्पणी पालिकेने बनवल्याचे उघड झाले आहे . 

मीरा भाईंदर महापालिकेचा घोटाळेबाज कारभार आणि करदात्या नागरिकांच्या घामाच्या पैशांची मनमानी उधळपट्टीचा भाईंदर पूर्व आणि पश्चिम रेल्वे स्थानक बाहेरील सुशोभीकरण हा आणखी एक प्रकार सुरु आहे . कोरोनाच्या संक्रमणा मुळे आर्थिक उत्पन्न घटले असताना दुसरीकडे कोट्यवधी रुपयांची अनावश्यक कामे टेंडर टक्केवारीसाठी रेटली जात असल्याचे आरोप होत आहेत . 

 २९ जून २०१७ रोजी महापालिकेने नगरविकास विभागाला पाठवलेल्या प्रस्तावात भाईंदर पश्चिमेच्या सुशोभीकरण कामासाठी २ कोटी तर पूर्वेच्या कामासाठी १ कोटी अंदाजित खर्च म्हटले होते . तसेच सदर जागा पालिकेच्या मालकीची नसताना देखील चक्क पालिका मालकीची जागा असल्याचे लिहले होते . 

२ कोटी भाईंदर पूर्व आणि १ कोटी भाईंदर पश्चिम ह्या खर्चास शासना कडून मंजुरी दिली . परंतु  फेब्रुवारी २०१८ च्या महासभेत मात्र २ कोटीचे काम तब्बल  ८ कोटी ७५ हजार रुपयांचे आणि १ कोटीचे  काम तब्बल ५ कोटी वर नेण्यात आले. महासभेत सत्ताधारी भाजपाने बहुमताने सुधारित अंदाजपत्रकातील तरतुदीस आर्थिक व प्रशासकीय मान्यता दिली . 

पूर्व व पश्चिम सुशोभीकरणाच्या कामाचा खर्च तब्बल १३ कोटींचा वाढवण्यात आल्याने यात मोठा गैरप्रकार झाल्याचे आरोप होत आहेत . तर शासन केवळ ३ कोटी देणार व उर्वरित १० कोटी ७५ हजारचा खर्च पालिका करणार ह्या प्रस्तावा वर मुख्यलेखापरीक्षक ह्यांनी ११ जुलै २०१७ च्या शासन आदेश नुसार १०० टक्के अनुदानातून खर्च पडणार असल्याने शासनाची जास्त खर्चास मान्यता घेऊन निविदा काढावी असा शेरा मारला . तरी देखील बांधकाम विभागाने निविदा काढली . सदर कामाची ६ महिन्यांची मुदत मार्च मध्येच संपून गेली  असून काम अजूनही रखडलेले आहे . 

वास्तविक २०१७ साली पालिकेनेच भाईंदर पश्चिम रेल्वे स्थानका बाहेर रस्ता रुंदीकरण म्हणून येथील जुनी बांधकामे तसेच मीठ विभागाचे बांधकाम नियमबाह्यपणे तोडले होते . मीठ विभागाने कार्यकारी अभियंता दीपक खांबित सह पालिका अंधकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला . पण रस्ता रुंदीकरण नावाखाली आता चक्क सुशोभीकरणाचे अवाढव्य बांधकाम पालिकेने चालवले आहे . 

त्यातच गुन्हा दाखल असताना सुद्धा पालिकेने मीठ विभागाच्या जागेत बळजबरी सुशोभीकरणाचे काम चालवले . मीठ उपअधीक्षक ह्यांनी जानेवारी पासून आयुक्तांना २ पत्र देऊन सदर काम बंद करण्यास सांगितले . परंतु काम बंद करणे तर सोडाच बांधकाम विभागाने चक्क टिपणी मध्ये मीठ विभागाला जागेचा मोबदला दिल्याचे तद्दन खोटे नमूद केले . मीठ उपअधीक्षक ह्यांनी पुन्हा आयुक्तांना पत्र देतानाच पालिकेने मोबदला दिल्याचे म्हणणे खोटे असल्याचे  स्पष्ट सांगितले .

भाईंदर स्थानक बाहेर पश्चिम व पूर्वेस सार्वजनिक उपक्रमाच्या बससेवा , खाजगी बस , रिक्षा सह खाजगी वाहनांची मोठी वर्दळ असते . ह्या ठिकाणी वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असते आणि नागरिक सुद्धा मोठ्या संख्येने ये जा करतात . त्यातच सुशोभीकरणाच्या काम मुळे येथील रस्ते व परिसर अरुंद होऊन लोकांची मोठी गरसोय होणार असून वाहतूक कोंडी आणखी भयंकर होणार आहे . महत्वाचे म्हणजे पालिकेने स्थानिक पोलीस आणि वाहतूक पोलिसांची परवानगी सुद्धा घेतलेली नसल्याचे सूत्रांनी सांगितले .

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMira Bhayanderमीरा-भाईंदर