शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
2
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
3
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
4
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
5
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
6
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
7
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
8
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
9
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
10
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
11
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
12
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
13
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
14
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
15
'आयटीआय'मध्ये मंत्र शिकवणार अन् कुंभमेळ्यात पौरोहित्य करणार; नवा अभ्यासक्रम सुरू
16
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
17
विक्रमी वाढ, चांदी १,९५,००० रुपयांवर, इतिहासात प्रथमच एका दिवसात १५,००० रुपयांनी महागली
18
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
19
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
20
Ratnagiri: खेडमध्ये वारकरी गुरुकुलमध्येच मुलींसोबत नको ते 'कृत्य'; कोकरे महाराज आणि कदमवर गुन्हा

मीरा-भाईंदर महापालिका ठेकेदाराच्या सर्वेक्षणात फेरीवाल्यांची संख्या तब्बल ७६७२

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2019 20:41 IST

मीरा-भाईंदरमध्ये फेरीवाल्यांचा आकडा तब्बल ७ हजार ६७२ इतकी असल्याचा महापालिकेने नेमलेल्या खासगी ठेकेदाराच्या सर्वेक्षणात नमूद करण्यात आला आहे.

मीरा रोड - मीरा-भाईंदरमध्ये फेरीवाल्यांचा आकडा तब्बल ७ हजार ६७२ इतकी असल्याचा महापालिकेने नेमलेल्या खासगी ठेकेदाराच्या सर्वेक्षणात नमूद करण्यात आला आहे. फेरीवाल्यांच्या कागदपत्रांची पडताळणी तसेच फेरीवाला समितीमध्ये मान्यतेनंतर यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याचे पालिका सूत्रांकडून सांगण्यात आले. तर दुसरीकडे फेरीवाला संघटनांनी सदर सर्वेक्षणाबद्दलच शंका उपस्थित केली असल्याने सदर सर्वेक्षण वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.मीरा-भाईंदरमधील फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणासाठी महापालिकेने मँगो इंटरप्रायझेस या ठेकेदारास कंत्राट दिले होते. प्रती फेरीवाल्याच्या सर्वेक्षणासाठी ११४ रुपये शुल्क पालिका ठेकेदारास अदा करणार आहे. मार्च २०१९ पासून ठेकेदाराने मोबाईल अ‍ॅपद्वारे सर्वेक्षण सुरू करून ते नोव्हेंबरमध्ये पूर्ण केले. फेरीवाल्यांकडून त्याचे आधार कार्ड व शिधावाटप पत्रिका पुरावा म्हणून घेण्यात आले आहे. आधार कार्डशी लिंक होत नसेल तर बायोमॅट्रिक यंत्राच्या सहाय्याने फेरीवाल्याच्या बोटांचे ठसे घेऊन आधारशी जोडण्यात आले आहे.फेरीवाल्याच्या बसण्याच्या जागेचे जिओ लोकेशन घेण्यात आले आहे. ७ हजार ६७२ फेरीवाल्यांची नोंदणी अ‍ॅपद्वारे करून त्याची माहिती थेट राज्य शासनाच्या पोर्टलला अपलोड केली गेली आहे, असे या सर्वेक्षणाशी संबंधित समन्वयकाकडून सांगण्यात आले. यातील सुमारे ३ हजार फेरीवाल्यांनी कागदपत्रे जमा केली आहेत. आधारशी लिंक व शासनाच्या पोर्टलवर माहिती अपलोड झाल्याने एकाच फेरीवाल्याची दोन वेगळ्या ठिकाणी नोंदणी होणार नसल्याचे सांगण्यात आले.सर्वेक्षणात आढळून आलेल्या फेरीवाल्यांची तसेच त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. त्यातील पात्र फेरीवाले ठरवले जाणार आहेत. परंतु सदर सर्वेक्षण करताना अनेक त्रुटी आणि गैरप्रकारांचे आरोप आझाद हॉकर्स युनियन आदी फेरीवाल्यांच्याच संघटनांनी केले होते. एखाद्या भागातील सर्वेक्षणाची माहिती आधीच दिली गेल्याने फेरीवाल्यांना बसवून नोंदणी करून घेतल्याच्या तक्रारी आहेत. तर न्यायालयाच्या आदेशानुसार १ मे २०१४ पर्यंतचे फेरीवाले पात्र असून, त्यांचा सक्षम पुरावा पडताळणी करून मगच त्यांना पात्र ठरवले गेले पाहिजे, असे युनियनचे जय सिंह यांनी सांगितले. पालिका, काही लोकप्रतिनधी, बाजार वसुली ठेकेदार आदी संबंधितांच्या संगनमताने या सर्वेक्षणात बोगस नोंदणीचा प्रकार असल्याचा आरोप त्यांनी केला.महत्त्वाचे म्हणजे सर्वेक्षण आहे म्हणून फेरीवाला बसला आहे का ? असा प्रश्न असून आठवडे बाजारात बसणा-या फेरीवाल्यांच्या नोंदी देखील केल्या गेल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वे स्थानक परिसरात १५० मीटर तर शैक्षणिक संकुल, धार्मिक स्थळ, रुग्णालय पासून १०० मीटर अंतरापर्यंत फेरीवाल्यांना बसण्यास मनाई केली असताना त्या मनाई क्षेत्रात बसणा-या फेरीवाल्यांची देखील नोंद केली गेली आहे.मीरा भाईंदरमध्ये फेरीवाल्यांचा प्रश्न गंभीर बनला असून, पालिकेने केलेली तात्पुरती मार्केट भलत्याच फेरीवाल्यांना बसवण्यासह अवास्तव शुल्क वसुलीमुळे वादग्रस्त ठरली आहे. त्यातच फेरीवाल्यांची संख्या वाढवण्यामागे बाजार वसुली करणा-या ठेकेदारांचे राजकीय लागेबांधे असल्याचे आरोप सतत होत आला आहे. त्यामुळे फेरीवाल्यांचे सर्वेक्षण आणि पडताळणी भविष्यात वादाचा विषय ठरण्याची शक्यता आहे. जुन्या फेरीवाल्यांना न्याय हक्क मिळाला पाहिजेच, पण इतक्या मोठ्या संख्येने असलेल्या फेरीवाल्यांचे नियोजन कसे करणार हा देखील प्रश्न निर्माण झाला आहे.