शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

मीरा-भाईंदर मेट्रोचा अखेर श्रीगणेशा;  ठाणे, मुंबईला जोडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 00:33 IST

मेट्रोच्या कंत्राटदाराकडून भू-तांत्रिक तपासणीचे काम सुरू

भाईंदर : मीरा-भाईंदर शहरांतील नागरिकांच्या बहुप्रतीक्षित अशा मेट्रोच्या कामाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. ऐन गणेशोत्सव काळात मेट्रोच्या कामाचा श्रीगणेशा झाला आहे. रस्त्यावर बॅरिगेट्स लावून खोदकामाला सुरुवात झाल्याने येणारी विधानसभा निवडणूक पावली की गणपती बाप्पा पावला, अशी खुमासदार चर्चाही नागरिकांमध्ये रंगली आहे. २०१७ च्या पालिका निवडणुकीवेळी मीरा-भार्इंदरला मेट्रो मंजूर केल्याची घोषणा झाली. निवडणुकीत भाजप-शिवसेनेने त्याच्या श्रेयाचा प्रचारही केला. पण, ‘लोकमत’ने मात्र मेट्रोसाठी एमएमआरडीएने अंदाजपत्रकात तरतूदच केली नसल्याचे तसेच त्यांच्या संकेतस्थळावरही मेट्रोचा लवलेश नसल्याचे उघड केल्यानंतर श्रेय घेणाऱ्या सत्ताधारी भाजपची चांगली गोची झाली. सामाजिक संघटनांसह अन्य राजकीय पक्षांनीही महासभेत तसेच बाहेरही जाब विचारत आंदोलने केली. शिवसेनेने तर दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्री अशा सणांना मेट्रोसाठी आंदोलने केली.

काही महिन्यांनी दहिसर पूर्वेतून भाईंदर अशा मेट्रोमार्गासाठी राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यावर आर्थिक तरतूद तसेच निविदा प्रक्रिया सुरू केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन केले गेले, पण काम मात्र काहीच सुरू होत नव्हते. आ. सरनाईक यांनी मुख्यमंत्री आणि एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन १५ आॅगस्टपर्यंत कामास सुरुवात करा, अशी मागणी केली होती. पण, आॅगस्टअखेरीस काम सुरू करण्याचे आदेश त्यांना दिले होते.

मीरा-भाईंदर मेट्रोच्या मार्गावर सोमवारी कामाला सुरु वात झाली आहे. काशिमीरानाका, झंकार कंपनी, साईबाबानगर, दीपक रुग्णालय येथे कामाला सुरु वात झाली आहे. या कामासाठी बॅरिगेट्स लावले आहेत. तीन ठिकाणी भू-तांत्रिक तपासणीचे कामही सुरू झाले आहे, असे सांगत खºया अर्थाने मीरा-भार्इंदर मेट्रोच्या कामाचा श्रीगणेशा झाला आहे, असे सरनाईक यांनी सांगितले.

मीरा-भाईंदरला मेट्रोने जोडावे, अशी मागणी आ. सरनाईक यांनी २००९ पासून शासनाकडे सातत्याने केली असून तत्कालीन आमदार मुझफ्फर हुसेन, तत्कालीन खासदार संजीव नाईक, खासदार राजन विचारे, तत्कालीन महापौर गीता जैन यांच्यानंतर आमदार नरेंद्र मेहता यांनीही मेट्रोची मागणी केली होती. मेट्रोसाठी शहरात विविध संघटनांनी मिळून आंदोलन उभारले होते. काँग्रेसने सह्यांची मोहीमही राबवली होती. ठाण्याची मेट्रो काशिमीराच्या शिवाजी महाराज चौकात दहिसर-मीरा-भार्इंदर मेट्रोला मिळणार आहे. त्यामुळे आता थेट ठाणे व मुंबईला मेट्रोने जोडले गेल्याने रेल्वे तसेच रस्ता वाहतुकीवरील ताण कमी होणार असल्याचे सरनाईक म्हणाले.भाईंदरपाडा, दहिसर येथे कारशेडजे. कुमार कंपनीला मेट्रोचे काम देण्यात आले असून मीरा-भार्इंदर मेट्रोसाठी सहा हजार ६०७ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. सुमारे ११ किमीचा मार्ग असणार आहे. त्यात दहिसर, पांडुरंगवाडी, मीरागाव, काशिगाव, साईबाबानगर, मेडतियानगर, शहीद भगतसिंग उद्यान, सुभाषचंद्र बोस मैदान अशी एकूण आठ स्थानके असणार आहेत. या मेट्रोमार्गासाठी भार्इंदरपाडा व दहिसर येथे कारशेड डेपो प्रस्तावित करण्यात आला आहे.

टॅग्स :Metroमेट्रोMira Bhayanderमीरा-भाईंदर