शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबूतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
7
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
8
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
9
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
10
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
11
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
12
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
13
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
14
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
15
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
16
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
17
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
18
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
19
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
20
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."

मीरा-भार्इंदरमध्ये बेकायदेशीर माती भरावाचा धुमाकूळ; सरकारी यंत्रणांचे मात्र दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 17:14 IST

मीरा-भार्इंदर शहरातील ५० टक्यांहुन अधिक जागा सीआरझेड बाधित असुन त्यातील बहुतांशी जागांवर कांदळवन व काही काही जागा पाणथळ असल्याने त्यावर पर्यावरण विभागाच्या परवानगीखेरीज कोणतेही बांधकाम करता येत नाही.

- राजू काळे 

भार्इंदर  - मीरा-भार्इंदर शहरातील ५० टक्यांहुन अधिक जागा सीआरझेड बाधित असुन त्यातील बहुतांशी जागांवर कांदळवन व काही काही जागा पाणथळ असल्याने त्यावर पर्यावरण विभागाच्या परवानगीखेरीज कोणतेही बांधकाम करता येत नाही. परंतु, या परवानगीला छेद देत त्या क्षेत्रात मोठ्याप्रमाणात बेकायदेशीर मातीभराव सुरु असुन त्याकडे पालिकेसह महसुल विभाग व स्थानिक पोलिस या सरकारी यंत्रणांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरीकांकडुन केला जात आहे.

राज्य सरकारने २००० मध्ये जाहिर केलेला सीआरझेड आराखडा २००५ मध्ये शहरासाठी अमलात आणला गेला. यानुसार शहरातील निम्याहुन अधिक जागा सीआरझेड बाधित असल्याचे नमुद करण्यात आले. यामुळे २००५ पुर्वीची बांधकामे सुद्धा सीआरझेड बाधित ठरल्याने त्यांचा पुर्नविकास व दुरुस्ती पर्यावरण विभागाच्या परवानगीत अडकली जात आहे. परंतु, ज्या सीआरझेड बाधित मोकळ्या जागा आहेत. त्या भुमाफीया व बांधकाम माफीयांच्या रडावर आल्या आहेत. त्यातच शहराच्या पश्चिमेस समुद्र किनारा तर उत्तर व दक्षिणेला खाडीकिनारा असल्याने तेथील पाणथळ जागांतील बांधकामांना सुद्धा खो घालण्यात आला आहे. तसेच किनारा व कांदळवन क्षेत्रापासुन सुमारे १०० मीटर अंतरावर पर्यावरण विभागाच्या मान्यतेखेरीज बांधकाम करण्यास मनाई असल्याचे सांगण्यात येत आहे. याखेरीज नाल्यांलगतच्या बांधकामांना देखील पर्यावरण विभागाची परवानगी आवश्यक असताना शहरातील अनेक नाले मात्र बेकायदेशीर मातीभरावात गायब करण्यात आले आहेत. सध्या त्यावर अनेक बांधकामे उभी करण्यात आली आहेत. हा प्रकार राजरोसपणे सुरु झाला असुन कांदळवनाची दिवसाढवळ्या कत्तल केली जात आहे. यावर पर्यावरणवाद्यांनी सरकारी यंत्रणांकडे पाठपुरावा करुन संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे अपेक्षित असताना तसे न झाल्यास भुमाफीयांना मोकळे रान मिळते. शहरातील कनाकिया, हाटकेश व वरसावे येथील कांदळवनाची झाडे बिनदिक्कत तोडुन त्या क्षेत्रात मोठ्याप्रमाणात मातीभराव केला जात आहे. यावर पोलिसांत तक्रार केल्यासच पोलिस कारवाईचा बडगा उचलून आपले कर्तव्य पार पाडतात. महसुल विभागही तक्रारीनुसारच बेकायदेशीर मातीभरावाचा पंचनामा करुन वरीष्ठांपुढे कारवाईचे कागदी घोडे नाचवतात. परंतु, मातीभराव करणाय््राांवर एमआरटीपीचा गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जाते. त्यातच एखादी राजकीय व्यक्ती असल्यास कारवाईचे सोपस्कार पार पाडण्यास सरकारी यंत्रणांकडुन विलंब लावला जात असल्याचा आरोप केला जात आहे. सीआरझेड व कांदळवनाची झाडे तोडुन त्या क्षेत्रात बांधकाम होऊ नये, यासाठी पालिकेने जिल्हाप्रशासनाच्या आदेशावरुन लाखे रुपये खर्चुन कांदळवन क्षेत्राला तारेचे कुंपण घातले आहे. या मागे कांदळवनाचे संरक्षण करण्याचा हेतु असला तरी तो केवळ फलक लावण्यापुरताच मर्यादित आहे कि काय, असा प्रश्न नागरीकांकडुन उपस्थित केला जात आहे. यात मात्र पालिकेचा लाखोंचा निधी वाया जात असला तरी महसुल विभागाने देखील त्याकडे गांभीर्याने पाहणे अत्यावश्यक असल्याचे मतही नागरीकांकडुन व्यक्त केले जात आहे. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर