शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

येत्या महिनाभरात होणार मिरा-भार्इंदर मनपा आयुक्तांची उचलबांगडी?; आ. नरेंद्र मेहतांची आयुक्तांविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2018 20:27 IST

- राजू काळे भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिका आयुक्त डॉ. नरेश गीते यांचा कारभार आक्षेपार्ह असल्याची तक्रार स्थानिक भाजपा आ. नरेंद्र मेहता यांनी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. त्याची दखल घेत येत्या महिनाभरात आयुक्तांची उचलबांगडी होण्याची शक्यता सुत्रांकडुन वर्तविली जात आहे.आयुक्तांनी अद्याप कराची वसुली प्रभावीपणे ...

- राजू काळे 

भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिका आयुक्त डॉ. नरेश गीते यांचा कारभार आक्षेपार्ह असल्याची तक्रार स्थानिक भाजपा आ. नरेंद्र मेहता यांनी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. त्याची दखल घेत येत्या महिनाभरात आयुक्तांची उचलबांगडी होण्याची शक्यता सुत्रांकडुन वर्तविली जात आहे.

आयुक्तांनी अद्याप कराची वसुली प्रभावीपणे केलेली नाही. गतवर्षीची वसुली व यंदाची वसुली यात मोठी तफावत असुन यंदा कर वसुलीपेक्षा इतर कामांत आयुक्त व्यस्त असल्याचा आरोप सत्ताधाय््राांकडुन केला जात आहे. त्यांनी बार व लॉजिंग-बोर्डींगवर केलेली तोडक कारवाई ठोसपणे केलेली नाही. त्यामुळे तोडण्यात आलेले बार व लॉजिंग-बोर्डींग पुन्हा जोमाने सुरु झाल्याचा दावा करण्यात येत आहे. आयुक्तांनी आपल्या कार्यकाळात एकही नवीन विकास काम केलेले नाही. त्यांच्याकडुन ज्या विकासाच्या गप्पा ठोकल्या जात आहेत. त्या तत्कालिन आयुक्तांच्या कार्यकाळात झालेल्या असल्याचा दावा केला जात आहे. एकीकडे बांधकाम परवानग्या देताना त्यातील सर्व त्रुटी दुर करण्याच्या सुचना अधिकाय््राांना दिल्या जातात. तर दुसरीकडे आयुक्त नगरविकास विभागातच ठाण मांडून बांधकाम परवानग्या देत असल्याचा आरोप केला जात आहे. आठवड्यातून अनेकदा ते आपल्या दालनात अनुपस्थित राहतात. त्यांनी त्याची कल्पना महापौरांना देणे अपेक्षित असतानाही ते त्याला छेद देत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. सत्ताधाय््राांच्या विकासाच्या मुद्यावर ते अनेकदा असहमती दर्शवित असल्यानेच त्यांच्या एकतर्फी कारभारात पदसिद्ध अधिकाय््राांच्या उपस्थितीची आवश्यकताच नसल्याने दालनांना टाळे ठोकण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सत्ताधाय््राांकडुन सांगण्यात आले. त्याची कल्पना थेट मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी सत्ताधाय््राांनी प्रयत्न केला असता ते बाहेरगावी गेल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातुन मुख्यमंत्र्यांना संपर्क साधुन त्यांना आयुक्तांच्या एकतर्फी कारभाराची माहिती देण्यात आली. त्यावर मुख्यमंत्री परतल्यानंतरच निर्णय होणार असल्याचे सांगण्यात येत असले तरी येत्या महिनाभरात आयुक्तांची उचलबांगडी होणार असल्याचे सुत्राकडुन सांगण्यात येत आहे. 

आयुक्तांसोबत आमचे कोणतेही वैयक्तिक मतभेद नाहीत. आम्ही विकासाच्या मुद्यावर भांडत आहोत. पण ते आम्हाला सहकार्य करीत नाहीत. त्यांचा कारभार संथगतीने सुरु असुन त्यात पालिकेचे नुकसान होत आहे. हे टाळण्यासाठीच आम्ही दालनांना कुलूप ठोकले आहे. आयुक्तांना कारभार सुधारण्यासाठी आठवड्याची मुदत दिली आहे. त्यात सुधारणा न झाल्यास पुढील निर्णय घेऊ.  - आ. नरेंद्र मेहता 

 

प्रशासन विकासाच्या मुद्यावर काम करीत आहे व करीत राहणार. यात कोणतेही दुमत नाही. प्रत्येक लोकप्रतिनिधींचा सन्मान करणे प्रशासकीय अधिकाय््राांचे कर्तव्य आहे, तशा सुचना देखील देण्यात आल्या आहेत. मात्र त्यात काही त्रुटी असतील तर चर्चेद्वारे त्या दुर करण्यात येतील. त्यामुळे त्यात कोणताही गैरसमज होऊ नये.  - आयुक्त डॉ. नरेश गीते 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMira Bhayanderमीरा-भाईंदर