शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

येत्या महिनाभरात होणार मिरा-भार्इंदर मनपा आयुक्तांची उचलबांगडी?; आ. नरेंद्र मेहतांची आयुक्तांविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2018 20:27 IST

- राजू काळे भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिका आयुक्त डॉ. नरेश गीते यांचा कारभार आक्षेपार्ह असल्याची तक्रार स्थानिक भाजपा आ. नरेंद्र मेहता यांनी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. त्याची दखल घेत येत्या महिनाभरात आयुक्तांची उचलबांगडी होण्याची शक्यता सुत्रांकडुन वर्तविली जात आहे.आयुक्तांनी अद्याप कराची वसुली प्रभावीपणे ...

- राजू काळे 

भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिका आयुक्त डॉ. नरेश गीते यांचा कारभार आक्षेपार्ह असल्याची तक्रार स्थानिक भाजपा आ. नरेंद्र मेहता यांनी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. त्याची दखल घेत येत्या महिनाभरात आयुक्तांची उचलबांगडी होण्याची शक्यता सुत्रांकडुन वर्तविली जात आहे.

आयुक्तांनी अद्याप कराची वसुली प्रभावीपणे केलेली नाही. गतवर्षीची वसुली व यंदाची वसुली यात मोठी तफावत असुन यंदा कर वसुलीपेक्षा इतर कामांत आयुक्त व्यस्त असल्याचा आरोप सत्ताधाय््राांकडुन केला जात आहे. त्यांनी बार व लॉजिंग-बोर्डींगवर केलेली तोडक कारवाई ठोसपणे केलेली नाही. त्यामुळे तोडण्यात आलेले बार व लॉजिंग-बोर्डींग पुन्हा जोमाने सुरु झाल्याचा दावा करण्यात येत आहे. आयुक्तांनी आपल्या कार्यकाळात एकही नवीन विकास काम केलेले नाही. त्यांच्याकडुन ज्या विकासाच्या गप्पा ठोकल्या जात आहेत. त्या तत्कालिन आयुक्तांच्या कार्यकाळात झालेल्या असल्याचा दावा केला जात आहे. एकीकडे बांधकाम परवानग्या देताना त्यातील सर्व त्रुटी दुर करण्याच्या सुचना अधिकाय््राांना दिल्या जातात. तर दुसरीकडे आयुक्त नगरविकास विभागातच ठाण मांडून बांधकाम परवानग्या देत असल्याचा आरोप केला जात आहे. आठवड्यातून अनेकदा ते आपल्या दालनात अनुपस्थित राहतात. त्यांनी त्याची कल्पना महापौरांना देणे अपेक्षित असतानाही ते त्याला छेद देत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. सत्ताधाय््राांच्या विकासाच्या मुद्यावर ते अनेकदा असहमती दर्शवित असल्यानेच त्यांच्या एकतर्फी कारभारात पदसिद्ध अधिकाय््राांच्या उपस्थितीची आवश्यकताच नसल्याने दालनांना टाळे ठोकण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सत्ताधाय््राांकडुन सांगण्यात आले. त्याची कल्पना थेट मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी सत्ताधाय््राांनी प्रयत्न केला असता ते बाहेरगावी गेल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातुन मुख्यमंत्र्यांना संपर्क साधुन त्यांना आयुक्तांच्या एकतर्फी कारभाराची माहिती देण्यात आली. त्यावर मुख्यमंत्री परतल्यानंतरच निर्णय होणार असल्याचे सांगण्यात येत असले तरी येत्या महिनाभरात आयुक्तांची उचलबांगडी होणार असल्याचे सुत्राकडुन सांगण्यात येत आहे. 

आयुक्तांसोबत आमचे कोणतेही वैयक्तिक मतभेद नाहीत. आम्ही विकासाच्या मुद्यावर भांडत आहोत. पण ते आम्हाला सहकार्य करीत नाहीत. त्यांचा कारभार संथगतीने सुरु असुन त्यात पालिकेचे नुकसान होत आहे. हे टाळण्यासाठीच आम्ही दालनांना कुलूप ठोकले आहे. आयुक्तांना कारभार सुधारण्यासाठी आठवड्याची मुदत दिली आहे. त्यात सुधारणा न झाल्यास पुढील निर्णय घेऊ.  - आ. नरेंद्र मेहता 

 

प्रशासन विकासाच्या मुद्यावर काम करीत आहे व करीत राहणार. यात कोणतेही दुमत नाही. प्रत्येक लोकप्रतिनिधींचा सन्मान करणे प्रशासकीय अधिकाय््राांचे कर्तव्य आहे, तशा सुचना देखील देण्यात आल्या आहेत. मात्र त्यात काही त्रुटी असतील तर चर्चेद्वारे त्या दुर करण्यात येतील. त्यामुळे त्यात कोणताही गैरसमज होऊ नये.  - आयुक्त डॉ. नरेश गीते 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMira Bhayanderमीरा-भाईंदर