शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मीरा-भार्इंदर पाण्याखाली? बेकायदा भरावाकडे पालिकेची डोळेझाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 06:37 IST

मीरा-भार्इंदरमध्ये माती, डेब्रिजचा भराव करणाऱ्या माफियांनी हैदोस घातला असून शहरात चाललेल्या सरकारी व खाजगी जागेतील वारेमाप भरावामुळे येत्या पावसाळ्यात शहर पाण्याखाली जाणार, हे स्पष्ट आहे.

मीरा रोड   -  मीरा-भार्इंदरमध्ये माती, डेब्रिजचा भराव करणाऱ्या माफियांनी हैदोस घातला असून शहरात चाललेल्या सरकारी व खाजगी जागेतील वारेमाप भरावामुळे येत्या पावसाळ्यात शहर पाण्याखाली जाणार, हे स्पष्ट आहे. शहरात पाणी साचण्यासह पर्यावरणाचा मोठा ºहास होत असून या माफियांना काही लोकप्रतिनिधींसह विविध सरकारी यंत्रणांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष आशीर्वाद असल्याने दिवसाढवळ्या व रात्री खुलेआम चालणाºया भरावास लगाम घातला जात नाही. पालिकेने नेमलेले मातीभरावविरोधी पथकही कूचकामी ठरले आहे.मीरा-भार्इंदर हे उत्तर व दक्षिणेस खाडीने वेढलेले आहे. तर, पश्चिमेस समुद्र असून पूर्वेला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची डोंगररांग आहे. पावसाळ्यात डोंगरांवरून मोठ्या प्रमाणात येणारे पाणी हे नैसर्गिक ओढे-नाले व खाडीमार्गे बाहेर पडायचे. किनारपट्टी परिसरात व अंतर्गत असलेली पाणथळ, कांदळवनाचे जंगल, मिठागरे, सीआरझेड व नाविकास क्षेत्रही पावसाचे पाणी सामावून घेणारी व पाण्याचा निचरा होणारी नैसर्गिक अशी महत्त्वाची क्षेत्रे होती. मात्र, काही वर्षांपासून शहरातील या नैसर्गिक पावसाळी व भरतीचे पाणी साठवण्याची क्षमता असलेल्या क्षेत्रांमध्ये कोणत्याही प्रकाराचा भराव, बांधकामास मनाई असतानाही सर्रास बेकायदा कचरा, दगड-माती व डेब्रिजचा भराव होत आहे. पाण्याचे नैसर्गिक प्रवाह भराव व बांधकामांमुळे बंद झाले आहेत.याविरोधात ठोस भूमिका घेण्याऐवजी लोकप्रतिनिधी, महापालिका, महसूल, पोलीस व मीठ विभाग हे एकमेकांकडे बोटे दाखवत आहेत. परिणामी, पावसाळ्यात डोंगरावरून येणाºया पाण्याच्या लोंढ्यामुळे काशिमीरा व परिसर पूर्ण जलमय करून पूरस्थिती निर्माण होते. अनेक भागांमध्ये पाणी साचत असल्याने नागरिकांना फटका बसत आहे. त्यातही पालिकेने या नैसर्गिक ओढे-खाड्यांना नाले ठरवत त्यांचे काँक्रिटीकरण चालवले आहे. बंदिस्त नाले प्लास्टिक, गाळाने तुंबत असताना त्यांची सफाई केली जात नाही.विविध प्रकल्पांमधून निघणारे दगड-माती, गाळ टाकण्यासाठी मीरा-भार्इंदर व वसई-विरार हे डम्पिंग यार्ड ठरले आहे. शिवाय, नाले, तलाव सफाई तसेच खाजगी कामातून निघणारी दगड-माती, गाळही पाणी साठवण्याच्या वा पाणी वाहून जाणाºया प्रवाहात टाकले जात आहे. डेब्रिजही सर्रास पाणथळ, कांदळवन भागात टाकले जाते. सरकारी जागेत चालणाºया भरावाकडेही कानाडोळा केला जात आहे. अर्थपूर्ण हित साध्य होत असल्याने माफियांचे थेट काही लोकप्रतिनिधी, पालिका, महसूल, मीठ विभाग व पोलीस यांच्याशी साटंलोटं असल्याच्या आरोपांना बळ मिळत आहे. नोव्हेंबर २०१७ मध्ये तत्कालीन आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी माती व डेब्रिजचा भराव रोखण्यासाठी दोन पथके नेमली होती. यात मुकादमांसह स्वच्छता निरीक्षक यांचा समावेश केला. त्यांना स्वतंत्र वाहने देण्यात आली. पथकाला भराव आढळल्यास गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते.बांधकामे होत असलेली ठिकाणेकनकिया, हाटकेश, नेमिनाथ हाइट्स - टाकी परिसर, काशिगाव परिसर, घोडबंदर, रेतीबंदर, वरसावे, एक्स्प्रेस ईन हॉटेलमागील परिसर, चेणे नदी, चेणे - काजूपाडा, माशाचापाडा - डाचकुलपाडा, महाजनवाडी, पेणकरपाडा, सृष्टी, मीरागाव परिसर, पूनम सागर - जाफरी खाडी, शांतीनगर, आरएनपी पार्क, जेसल पार्क, सरस्वतीनगर - शिवशक्तीनगर, नवघरगाव, इंद्रलोक, भार्इंदर पश्चिमेस उड्डाणपुलाखालील रेल्वे मार्गाजवळचा परिसर, राधास्वामी सत्संग व परिसर, नाझरेथ झोपडपट्टी, शास्त्री व नेहरूनगर, मुर्धा खाडी, रेव आगर, सदानंदनगर, मुर्धा बांध, राई - शिवनेरी, मोर्वा गाव व आरके क्रीडांगण परिसर, तारोडी ते चौक धक्का, डोंगरी ते कोपरा, उत्तन, भार्इंदर पश्चिम धक्का ते जय अंबे, गणेश देवल, बजरंगनगर, क्रांतीनगर.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक