शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भार्इंदर पाण्याखाली? बेकायदा भरावाकडे पालिकेची डोळेझाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 06:37 IST

मीरा-भार्इंदरमध्ये माती, डेब्रिजचा भराव करणाऱ्या माफियांनी हैदोस घातला असून शहरात चाललेल्या सरकारी व खाजगी जागेतील वारेमाप भरावामुळे येत्या पावसाळ्यात शहर पाण्याखाली जाणार, हे स्पष्ट आहे.

मीरा रोड   -  मीरा-भार्इंदरमध्ये माती, डेब्रिजचा भराव करणाऱ्या माफियांनी हैदोस घातला असून शहरात चाललेल्या सरकारी व खाजगी जागेतील वारेमाप भरावामुळे येत्या पावसाळ्यात शहर पाण्याखाली जाणार, हे स्पष्ट आहे. शहरात पाणी साचण्यासह पर्यावरणाचा मोठा ºहास होत असून या माफियांना काही लोकप्रतिनिधींसह विविध सरकारी यंत्रणांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष आशीर्वाद असल्याने दिवसाढवळ्या व रात्री खुलेआम चालणाºया भरावास लगाम घातला जात नाही. पालिकेने नेमलेले मातीभरावविरोधी पथकही कूचकामी ठरले आहे.मीरा-भार्इंदर हे उत्तर व दक्षिणेस खाडीने वेढलेले आहे. तर, पश्चिमेस समुद्र असून पूर्वेला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची डोंगररांग आहे. पावसाळ्यात डोंगरांवरून मोठ्या प्रमाणात येणारे पाणी हे नैसर्गिक ओढे-नाले व खाडीमार्गे बाहेर पडायचे. किनारपट्टी परिसरात व अंतर्गत असलेली पाणथळ, कांदळवनाचे जंगल, मिठागरे, सीआरझेड व नाविकास क्षेत्रही पावसाचे पाणी सामावून घेणारी व पाण्याचा निचरा होणारी नैसर्गिक अशी महत्त्वाची क्षेत्रे होती. मात्र, काही वर्षांपासून शहरातील या नैसर्गिक पावसाळी व भरतीचे पाणी साठवण्याची क्षमता असलेल्या क्षेत्रांमध्ये कोणत्याही प्रकाराचा भराव, बांधकामास मनाई असतानाही सर्रास बेकायदा कचरा, दगड-माती व डेब्रिजचा भराव होत आहे. पाण्याचे नैसर्गिक प्रवाह भराव व बांधकामांमुळे बंद झाले आहेत.याविरोधात ठोस भूमिका घेण्याऐवजी लोकप्रतिनिधी, महापालिका, महसूल, पोलीस व मीठ विभाग हे एकमेकांकडे बोटे दाखवत आहेत. परिणामी, पावसाळ्यात डोंगरावरून येणाºया पाण्याच्या लोंढ्यामुळे काशिमीरा व परिसर पूर्ण जलमय करून पूरस्थिती निर्माण होते. अनेक भागांमध्ये पाणी साचत असल्याने नागरिकांना फटका बसत आहे. त्यातही पालिकेने या नैसर्गिक ओढे-खाड्यांना नाले ठरवत त्यांचे काँक्रिटीकरण चालवले आहे. बंदिस्त नाले प्लास्टिक, गाळाने तुंबत असताना त्यांची सफाई केली जात नाही.विविध प्रकल्पांमधून निघणारे दगड-माती, गाळ टाकण्यासाठी मीरा-भार्इंदर व वसई-विरार हे डम्पिंग यार्ड ठरले आहे. शिवाय, नाले, तलाव सफाई तसेच खाजगी कामातून निघणारी दगड-माती, गाळही पाणी साठवण्याच्या वा पाणी वाहून जाणाºया प्रवाहात टाकले जात आहे. डेब्रिजही सर्रास पाणथळ, कांदळवन भागात टाकले जाते. सरकारी जागेत चालणाºया भरावाकडेही कानाडोळा केला जात आहे. अर्थपूर्ण हित साध्य होत असल्याने माफियांचे थेट काही लोकप्रतिनिधी, पालिका, महसूल, मीठ विभाग व पोलीस यांच्याशी साटंलोटं असल्याच्या आरोपांना बळ मिळत आहे. नोव्हेंबर २०१७ मध्ये तत्कालीन आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी माती व डेब्रिजचा भराव रोखण्यासाठी दोन पथके नेमली होती. यात मुकादमांसह स्वच्छता निरीक्षक यांचा समावेश केला. त्यांना स्वतंत्र वाहने देण्यात आली. पथकाला भराव आढळल्यास गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते.बांधकामे होत असलेली ठिकाणेकनकिया, हाटकेश, नेमिनाथ हाइट्स - टाकी परिसर, काशिगाव परिसर, घोडबंदर, रेतीबंदर, वरसावे, एक्स्प्रेस ईन हॉटेलमागील परिसर, चेणे नदी, चेणे - काजूपाडा, माशाचापाडा - डाचकुलपाडा, महाजनवाडी, पेणकरपाडा, सृष्टी, मीरागाव परिसर, पूनम सागर - जाफरी खाडी, शांतीनगर, आरएनपी पार्क, जेसल पार्क, सरस्वतीनगर - शिवशक्तीनगर, नवघरगाव, इंद्रलोक, भार्इंदर पश्चिमेस उड्डाणपुलाखालील रेल्वे मार्गाजवळचा परिसर, राधास्वामी सत्संग व परिसर, नाझरेथ झोपडपट्टी, शास्त्री व नेहरूनगर, मुर्धा खाडी, रेव आगर, सदानंदनगर, मुर्धा बांध, राई - शिवनेरी, मोर्वा गाव व आरके क्रीडांगण परिसर, तारोडी ते चौक धक्का, डोंगरी ते कोपरा, उत्तन, भार्इंदर पश्चिम धक्का ते जय अंबे, गणेश देवल, बजरंगनगर, क्रांतीनगर.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक