शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

हरीत मिरा भार्इंदरच्या वल्गना पोकळच, रोपांच्या संरक्षणासाठी लावलेल्या पिंज-यांची मोडतोड  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 19:04 IST

मीरा भार्इंदर महापालिकेचे पर्यावरण प्रेम बेगडी असल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे. पालिकेने मोठा गाजावाजा करत लावलेल्या रोपांची व त्याच्या संरक्षणा साठी लावलेल्या लोखंडी पिंज-यांची सर्रास मोडतोड केली जात आहे.

मीरारोड - मीरा भार्इंदर महापालिकेचे पर्यावरण प्रेम बेगडी असल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे. पालिकेने मोठा गाजावाजा करत लावलेल्या रोपांची व त्याच्या संरक्षणा साठी लावलेल्या लोखंडी पिंज-यांची सर्रास मोडतोड केली जात आहे. परंतु या कडे पालिका व लोकप्रतिनिधींचे लक्षच नसल्याचे दिसत आहे. वृक्षा रोपणाच्या नावाखाली केले जाणारे काही कोटी रुपयांचा खर्च या अशा प्रकारां मुळे फुकट जात असुन वृक्षांची वाढ होत नसल्याने हरीत मीरा भार्इंदरच्या केवळ भुलथापा ठरल्या आहेत.पावसाळा येणार त्या आधी महापालिकेने वृक्षा रोपणाची जोरदार तयारी केली आहे. रोपांची लागवड करताना महापौर, आमदार आदी पदाधिकारी , नगरसेवक तसेच महापालिका अधिकारी व कर्मचारी रोपांची लागवड करताना आवर्जुन छायाचित्र काढुन सोशल मिडीयावर कौतुक करुन घेत असतात.परंतु नंतर मात्र लावलेली रोपं, त्याच्या संरक्षणासाठी लावलेले लोखंडी पिंजरे , रोपांना नियमीत पाणी व खत मिळतंय की नाही, रोपं जगली की नाही आदी बाबींकडे ढुंकुनही कोणी बघत नाहीत. परिणामी रोपं व पिंजरे भार्इंदर पोलीस ठाण्याच्या आवारात पडुन राहण्याच्या प्रकारा पासुन ठिकठिकांणी पिंजरे नसणे वा ते काढून नेणे, पाणी - खत नसल्याने रोपं सुकुन मरुन जाणे या सारखे प्रकार जागोजागी दिसुन येतात.भार्इंदर पुर्वेच्या इंद्रलोक - न्यु गोल्डन नेस्ट मार्गावर तर पालिका व लोकप्रतिनिधींनी मोठ्या दिमाखात लावलेल्या रोपांची व संरक्षण पिंजरयांची दुरावस्था झालेली आहे.पालिकेच्या ठेकेदाराच्या कचरयाच्या गाड्या वा अन्य वाहनं उभी करताना सर्रास या पिंजरयांची मोडतोड केली आहे. काही पिंजरे तर खाली पडले आहेत. पिंजरयांची मोडतोड झाली आहेच शिावाय यातील रोपांची सुध्दा हानी झालेली आहे. काही रोपं तर सुकुन गेली आहेत.वास्तविक महापालिकेने लावलेली रोपं, संरक्षित पिंजरे यांची काळजी घेण्याची जबाबदारी महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांची आहेच. पण त्याच सोबत नगरसेवक, आमदार यांच्या सह राजकिय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांची सुध्दा आहे. परंतु वृक्षा रोपणा वेळी चमकोगीरी करणारी ही मंडळी राजरोसपणे होणारया पिंजरयांची मोडतोड व सुकणारया रोपां कडे मात्र ढुंकुनही पाहताना दिसत नाही.डॉ. संभाजी पानपट्टे ( उपायुक्त ) - त्वरीत अधिकारी पाठवुन माहिती घेऊ. रोपं व पिंजरयांचे झालेले नुकसान प्रकरणी कारवाई केली जाईल.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMira Bhayanderमीरा-भाईंदरnewsबातम्या