शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मिरा भाईंदर पालिका कर्मचारी हक्काच्या घरांपासून वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 17:36 IST

महापालिकेतील २५ वर्ष सेवा झालेले सफाई कर्मचारी तसेच मरण पावलेल्या सफाई कर्मचारयांचे वारस गेली अनेक वर्ष हक्काच्या घरांपासून वंचीत असताना महापालिका प्रशासनाने देखील १७५ कर्मचारी पात्र असताना केवळ ८५ जणांचीच यादी पाठवण्याचा उपद्व्याप केला आहे.

मीरारोड - महापालिकेतील २५ वर्ष सेवा झालेले सफाई कर्मचारी तसेच मरण पावलेल्या सफाई कर्मचारयांचे वारस गेली अनेक वर्ष हक्काच्या घरांपासून वंचीत असताना महापालिका प्रशासनाने देखील १७५ कर्मचारी पात्र असताना केवळ ८५ जणांचीच यादी पाठवण्याचा उपद्व्याप केला आहे. त्या मुळे संतप्त झालेल्या कर्मचारयांसह मीरा भार्इंदर कामगार सेनेने सामान्य प्रशासन विभागा सह उपायुक्त मुख्यालय यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.शासनाने २००८ साली आदेश काढुन सफाई कामगारांसाठी मालकी हक्काची घरं उपब्ध करुन देण्याचे आदेश काढले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजने अंतर्गत २५ वर्ष सेवा पुर्ण झालेल्या व सेवेत असताना मयत झालेल्या कर्मचारयांच्या वारसांना या योजने अंतर्गत मोफत घरं द्यायची आहेत.कामगार संघटनेने सातत्याने केलेल्या पाठपुराव्या नंतर १५ आॅगस्ट २०१५ रोजी तत्कालिन महापौर गीता जैन यांच्या हस्ते पालिकेतील ६८ कर्मचारी वा त्यांच्या वारसांना मीरारोडच्या पुनम कॉम्पलेक्स भागात मालकीच्या उपलब्ध सदनिका दिल्या .परंतु त्या नंतर उर्वरीत कर्मचारयांना सदनिका देण्याची कार्यवाहीच प्रस्तावित केली नाही. त्यामुळे अशा पात्र कर्मचारी वा त्यांच्या वारसांना सदनिका देण्याची मागणी सातत्याने मीरा भार्इंदर कामगार सेनेने चालवली होती.या प्रकरणी अतिरीक्त आयुक्त माधव कुसेकर यांच्या कडे झालेल्या २ जुन रोजीच्या सुनावणी वेळी देखील ठाण्याच्या समाजकल्याण विभागा कडे पात्र सफाई कर्मचारयांच्या घरांचा प्रस्ताव पाठवला जात नसल्याचा मुद्दा मांडण्यात आला होता. त्यावेळी सुध्दा सुमारे १५० पात्र कर्मचारी वा त्यांचे वारस असल्याचे कामगार सेनेच्या पदाधिकारयांनी निदर्शनास आणुन दिले होते. त्यावेळी स्वत: उपायुक्त मुख्यालय विजयकुमार म्हसाळ हे उपस्थित होते.अतिरीक्त आयुक्तां कडे झालेली बैठक त्यातच पालिकेचे हे पात्र कर्मचारी वा त्यांचे वारस हक्काच्या घरां पासुन वंचीत असताना संबंधित पालिका अधिकारयांनी मात्र १८ जुन रोजी समाजकल्याण विभागाला फक्त ६५ पात्र कर्मचारी व २० मयत कर्मचारयांच्या वारसांची मिळुन ८५ नावांचीच यादी पाठवली.या प्रकाराने कर्मचारयां मध्ये संताप व्यक्त होत असुन कामगार सेनेने देखील आयुक्ता बालाजी खतगावकर यांच्या कडे तक्रार केली आहे. तक्रारी सोबत संघटनेने पात्र असलेल्या १३३ कर्मचारी व ४२ मयत कर्मचारयांची यादीच सोबत जोडुन दिली आहे.२ जुनच्या बैठकीत या बाबत चर्चा होऊन सर्व काही स्पष्ट असताना देखील ते धाब्यावर बसवत उपायुक्त मुख्यालय विजयकुमार म्हसाळ व सामान्य प्रशासन विभागातील संबंधित अधिकारी यांनी फक्त ८५ जणांचीच यादी पाठवली आहे. समाजकल्याण विभागास वंचीत ठेवलेल्या कर्मचारयांची पण नावं पाठवण्याची मागणी केली आहे.पात्र सफाई कर्मचारयांना त्यांच्या हक्काच्या घरां पासुन वंचीत ठेवतानाच शासन आदेशाचे उल्लंघन केले गेले आहे . असा चुकीचा, दिशाभुल करणारा प्रस्ताव तयार करणारे व त्यावर बिनडोक स्वाक्षरया करणारयांवर कारवाईची मागणी देखील तक्रारीत केली आहे. या प्रकरणी म्हसाळ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.सुलतान पटेल ( सरचीटणीस, मीरा भार्इंदर कामगार सेना ) - पात्र कर्मचारयांना हक्काच्या घरां पासुन वंचीत ठेवणारया या अधिकारयांवर कारवाई झालीच पाहिजे. कोणाच्या इशारयावरुन हा प्रकार केला गेला हे आयुक्तांनी चौकशी करुन जाहिर करावे . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरHomeघर